शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

अंबरनाथकरांनी गुडघ्यावर पाण्यातच काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. रात्रीदेखील पावसाचा जोर कायम राहिल्याने ...

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. रात्रीदेखील पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक वस्तीतील नागरिकांवर गुडघाभर पाणी असतानादेखील त्याच पाण्यात घराघरात रात्र काढण्याची वेळ आली होती. पालिका प्रशासनाने या नागरिकांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नागरिकांनी नकार दिल्याने पालिका प्रशासनदेखील हतबल झाले होते.

अंबरनाथमध्ये कमलाकरनगर, नालंदानगर, बुवा पाडा, गांधीनगर, भगतसिंगनगर आणि स्वामीनगर या भागातील नागरी वस्तीला पुराच्या पाण्याचा मोठा फटका सहन करावा लागला. त्यातील असंख्य भाग हा नाल्याच्या शेजारी असल्याने नाल्यातील पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले होते. दिवसभर भगतसिंगनगर परिसरात कमरेपर्यंत पाणी पोहोचले होते. अशा परिस्थितीतदेखील नागरिकांनी आपल्या घरातच राहणे पसंत केले. रात्री पाण्याची पातळी वाढण्याचा धोका असल्याने अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने या नागरिकांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या नागरिकांनी आपले घर सोडण्यास नकार दिला. पुराच्या वेळेस घर सोडल्यास घरातील सामानाची चोरी होते, या भीतीपोटी नागरिकांनी घरातच राहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हतबल झालेल्या नागरिकांना गुडघाभर पाण्यातच रात्र काढण्याची वेळ आली होती.

अशीच काहीशी परिस्थिती नालंदानगर आणि कमलाकरनगर परिसरात निर्माण झाली होती. अनेक चाळीतील घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू होता. मात्र, पावसाचा जोर ओसरत नसल्याने या भागातील नागरिकांनादेखील गुडघाभर पाण्यातच रात्र काढण्याची वेळ आली होती.