शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

अंबरनाथकरांनी गुडघ्यावर पाण्यातच काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. रात्रीदेखील पावसाचा जोर कायम राहिल्याने ...

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. रात्रीदेखील पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक वस्तीतील नागरिकांवर गुडघाभर पाणी असतानादेखील त्याच पाण्यात घराघरात रात्र काढण्याची वेळ आली होती. पालिका प्रशासनाने या नागरिकांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नागरिकांनी नकार दिल्याने पालिका प्रशासनदेखील हतबल झाले होते.

अंबरनाथमध्ये कमलाकरनगर, नालंदानगर, बुवा पाडा, गांधीनगर, भगतसिंगनगर आणि स्वामीनगर या भागातील नागरी वस्तीला पुराच्या पाण्याचा मोठा फटका सहन करावा लागला. त्यातील असंख्य भाग हा नाल्याच्या शेजारी असल्याने नाल्यातील पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले होते. दिवसभर भगतसिंगनगर परिसरात कमरेपर्यंत पाणी पोहोचले होते. अशा परिस्थितीतदेखील नागरिकांनी आपल्या घरातच राहणे पसंत केले. रात्री पाण्याची पातळी वाढण्याचा धोका असल्याने अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने या नागरिकांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या नागरिकांनी आपले घर सोडण्यास नकार दिला. पुराच्या वेळेस घर सोडल्यास घरातील सामानाची चोरी होते, या भीतीपोटी नागरिकांनी घरातच राहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हतबल झालेल्या नागरिकांना गुडघाभर पाण्यातच रात्र काढण्याची वेळ आली होती.

अशीच काहीशी परिस्थिती नालंदानगर आणि कमलाकरनगर परिसरात निर्माण झाली होती. अनेक चाळीतील घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू होता. मात्र, पावसाचा जोर ओसरत नसल्याने या भागातील नागरिकांनादेखील गुडघाभर पाण्यातच रात्र काढण्याची वेळ आली होती.