शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसर नटणार हिरवाईने

By admin | Updated: July 6, 2017 05:55 IST

ठाणे जिल्हा हिरवागार करण्याचे स्वप्न घेऊन अफाट जनसमुदायाच्या साथीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी श्रीमलंग गड

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : ठाणे जिल्हा हिरवागार करण्याचे स्वप्न घेऊन अफाट जनसमुदायाच्या साथीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी श्रीमलंग गड परिसरातील मांगरूळ गावात एक लाख रोपे लावण्याचे महाअभियान यशस्वी केले. अतिशय जल्लोषात शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या वृक्षारोपण अभियानात १५ हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला.राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे गौरवोद्गार युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढले. उन-पावसाचा खेळ सुरू असल्याने उपक्रमास निसर्गानेही साथ दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले. केवळ वृक्षारोपण करून थांबणार नसून ही रोपे जगवून पाच वर्षांत या परिसराचे रूपांतर मानवनिर्मित देखण्या वनराईत करण्याची ग्वाहीही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या वेळी दिली. याप्रसंगी आदित्य ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, दिव्यज्योती ट्रस्ट, सीए असोसिएशन, एनएनएसचे विद्यार्थी, विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, महिला बचत गट, प्रजापिता ब्रह्मकुमारीचे साधक, ज्येष्ठ नागरिक संघ, अंगणवाडी स्वयंसेविका आदी सहभागी झाले होते.आज प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. प्रतिव्यक्ती झाडांचे प्रमाण भारतापेक्षा चीनमध्ये जास्त आहे. निदान याबाबतीत तरी चीनच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न करूयात, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.उपमुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी मांगरूळ येथे ८५ एकर जागा उपलब्ध करून दिली. ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालय आणि आनंद विश्व गुरु कुल महाविद्यालयाच्या ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून योगदान दिले. ‘महाराष्ट्र नेचर पार्क’चे उपसंचालक अविनाश कुबल यांचे या अभियानाला सहकार्य लाभले.या प्रसंगी आमदार सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणीकर, महापौर राजेंद्र देवळेकर, मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपमुख्य वन संरक्षक रामगावकर, मांगरूळच्या सरपंच नंदिता पाटील, अभिनेते संतोष जुवेकर, मंगेश देसाई, उदय सबनीस, दिग्दर्शक विजू माने आदी उपस्थित होते.खंबाळपाड्यातही वृक्षारोपण राज्य सरकारच्या चार कोटी वृक्षारोपणाच्या अभियानाचा एक भाग म्हणून बुधवारी खांबाळपाडा येथे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सावित्रीबाई फुले कलामंदिर ते पत्रीपूलदरम्यानच्या तीन किलोमीटरच्या रस्त्यांच्या दुतर्फा रोपे लावण्यात आली.केडीएमसी हद्दीत एक लाख रोपांची लागवड आणि त्यांची देखभाल करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात खांबाळपाडा परिसरात गुलमोहराची झाडे लावली आहेत. उन्हाळा, हिवाळा, पावसाळ््यात बहरणाऱ्या व फुलणाऱ्या विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्याचा मानस आहे.त्यामुळे सर्व ऋतूंमध्ये फुले फुललेली दिसतील, अशा प्रकारचे नियोजन केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या वेळी भाजपाचे नगरसेवक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.