शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसर नटणार हिरवाईने

By admin | Updated: July 6, 2017 05:55 IST

ठाणे जिल्हा हिरवागार करण्याचे स्वप्न घेऊन अफाट जनसमुदायाच्या साथीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी श्रीमलंग गड

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : ठाणे जिल्हा हिरवागार करण्याचे स्वप्न घेऊन अफाट जनसमुदायाच्या साथीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी श्रीमलंग गड परिसरातील मांगरूळ गावात एक लाख रोपे लावण्याचे महाअभियान यशस्वी केले. अतिशय जल्लोषात शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या वृक्षारोपण अभियानात १५ हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला.राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे गौरवोद्गार युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढले. उन-पावसाचा खेळ सुरू असल्याने उपक्रमास निसर्गानेही साथ दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले. केवळ वृक्षारोपण करून थांबणार नसून ही रोपे जगवून पाच वर्षांत या परिसराचे रूपांतर मानवनिर्मित देखण्या वनराईत करण्याची ग्वाहीही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या वेळी दिली. याप्रसंगी आदित्य ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, दिव्यज्योती ट्रस्ट, सीए असोसिएशन, एनएनएसचे विद्यार्थी, विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, महिला बचत गट, प्रजापिता ब्रह्मकुमारीचे साधक, ज्येष्ठ नागरिक संघ, अंगणवाडी स्वयंसेविका आदी सहभागी झाले होते.आज प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. प्रतिव्यक्ती झाडांचे प्रमाण भारतापेक्षा चीनमध्ये जास्त आहे. निदान याबाबतीत तरी चीनच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न करूयात, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.उपमुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी मांगरूळ येथे ८५ एकर जागा उपलब्ध करून दिली. ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालय आणि आनंद विश्व गुरु कुल महाविद्यालयाच्या ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून योगदान दिले. ‘महाराष्ट्र नेचर पार्क’चे उपसंचालक अविनाश कुबल यांचे या अभियानाला सहकार्य लाभले.या प्रसंगी आमदार सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणीकर, महापौर राजेंद्र देवळेकर, मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपमुख्य वन संरक्षक रामगावकर, मांगरूळच्या सरपंच नंदिता पाटील, अभिनेते संतोष जुवेकर, मंगेश देसाई, उदय सबनीस, दिग्दर्शक विजू माने आदी उपस्थित होते.खंबाळपाड्यातही वृक्षारोपण राज्य सरकारच्या चार कोटी वृक्षारोपणाच्या अभियानाचा एक भाग म्हणून बुधवारी खांबाळपाडा येथे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सावित्रीबाई फुले कलामंदिर ते पत्रीपूलदरम्यानच्या तीन किलोमीटरच्या रस्त्यांच्या दुतर्फा रोपे लावण्यात आली.केडीएमसी हद्दीत एक लाख रोपांची लागवड आणि त्यांची देखभाल करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात खांबाळपाडा परिसरात गुलमोहराची झाडे लावली आहेत. उन्हाळा, हिवाळा, पावसाळ््यात बहरणाऱ्या व फुलणाऱ्या विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्याचा मानस आहे.त्यामुळे सर्व ऋतूंमध्ये फुले फुललेली दिसतील, अशा प्रकारचे नियोजन केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या वेळी भाजपाचे नगरसेवक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.