शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसर नटणार हिरवाईने

By admin | Updated: July 6, 2017 05:55 IST

ठाणे जिल्हा हिरवागार करण्याचे स्वप्न घेऊन अफाट जनसमुदायाच्या साथीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी श्रीमलंग गड

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : ठाणे जिल्हा हिरवागार करण्याचे स्वप्न घेऊन अफाट जनसमुदायाच्या साथीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी श्रीमलंग गड परिसरातील मांगरूळ गावात एक लाख रोपे लावण्याचे महाअभियान यशस्वी केले. अतिशय जल्लोषात शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या वृक्षारोपण अभियानात १५ हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला.राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे गौरवोद्गार युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढले. उन-पावसाचा खेळ सुरू असल्याने उपक्रमास निसर्गानेही साथ दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले. केवळ वृक्षारोपण करून थांबणार नसून ही रोपे जगवून पाच वर्षांत या परिसराचे रूपांतर मानवनिर्मित देखण्या वनराईत करण्याची ग्वाहीही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या वेळी दिली. याप्रसंगी आदित्य ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, दिव्यज्योती ट्रस्ट, सीए असोसिएशन, एनएनएसचे विद्यार्थी, विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, महिला बचत गट, प्रजापिता ब्रह्मकुमारीचे साधक, ज्येष्ठ नागरिक संघ, अंगणवाडी स्वयंसेविका आदी सहभागी झाले होते.आज प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. प्रतिव्यक्ती झाडांचे प्रमाण भारतापेक्षा चीनमध्ये जास्त आहे. निदान याबाबतीत तरी चीनच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न करूयात, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.उपमुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी मांगरूळ येथे ८५ एकर जागा उपलब्ध करून दिली. ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालय आणि आनंद विश्व गुरु कुल महाविद्यालयाच्या ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून योगदान दिले. ‘महाराष्ट्र नेचर पार्क’चे उपसंचालक अविनाश कुबल यांचे या अभियानाला सहकार्य लाभले.या प्रसंगी आमदार सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणीकर, महापौर राजेंद्र देवळेकर, मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपमुख्य वन संरक्षक रामगावकर, मांगरूळच्या सरपंच नंदिता पाटील, अभिनेते संतोष जुवेकर, मंगेश देसाई, उदय सबनीस, दिग्दर्शक विजू माने आदी उपस्थित होते.खंबाळपाड्यातही वृक्षारोपण राज्य सरकारच्या चार कोटी वृक्षारोपणाच्या अभियानाचा एक भाग म्हणून बुधवारी खांबाळपाडा येथे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सावित्रीबाई फुले कलामंदिर ते पत्रीपूलदरम्यानच्या तीन किलोमीटरच्या रस्त्यांच्या दुतर्फा रोपे लावण्यात आली.केडीएमसी हद्दीत एक लाख रोपांची लागवड आणि त्यांची देखभाल करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात खांबाळपाडा परिसरात गुलमोहराची झाडे लावली आहेत. उन्हाळा, हिवाळा, पावसाळ््यात बहरणाऱ्या व फुलणाऱ्या विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्याचा मानस आहे.त्यामुळे सर्व ऋतूंमध्ये फुले फुललेली दिसतील, अशा प्रकारचे नियोजन केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या वेळी भाजपाचे नगरसेवक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.