शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अंबरनाथ नगरपालिका : बेकायदा इमारतीला अधिकाºयांचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 06:53 IST

बेकायदा झोपड्या आणि चाळी उभारणे, हे अंबरनाथ पालिका हद्दीत सहज शक्य आहे. मात्र, आता चाळींसोबत अंबरनाथमध्ये तीन मजली इमारत बेकायदा उभारण्यात आली आहे. रस्त्याला लागून ही इमारत उभारलेली असतानाही पालिकेचे अधिकारी कारवाईसाठी त्या ठिकाणी फिरकलेच नाही.

अंबरनाथ - बेकायदा झोपड्या आणि चाळी उभारणे, हे अंबरनाथ पालिका हद्दीत सहज शक्य आहे. मात्र, आता चाळींसोबत अंबरनाथमध्ये तीन मजली इमारत बेकायदा उभारण्यात आली आहे. रस्त्याला लागून ही इमारत उभारलेली असतानाही पालिकेचे अधिकारी कारवाईसाठी त्या ठिकाणी फिरकलेच नाही. अखेर, एका बड्या नेत्याने याप्रकरणी तोंडी तक्रार करताच कारवाईचा दिखावा करण्यात पालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग कुठेच कमी पडला नाही. इमारत तशीच ठेवत केवळ दोनचार भिंतींना भगदाड पाडून निघून गेले.अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाºया उड्डाणपुलाला लागूनच साईबाबा मंदिराशेजारी दोन इमारतींच्या मध्यभागी मोकळी जागा होती. रस्त्याला लागूनच असल्याने एका विकासकाने थेट ही जागा ताब्यात घेत त्या ठिकाणी पालिकेची कोणतीच परवानगी न घेता थेट तीन मजली इमारत उभी केली. अत्यंत अडचणीच्या ठिकाणी ही इमारत उभी केली आहे. या इमारतीला जिना हा शेजारील इमारतीतून देण्यात आला आहे.शहराला जोडणाºया महत्त्वाच्या रस्त्यावर मोठी इमारत उभी केली जात असताना नगरपालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत होता. ही इमारत बेकायदा उभी राहत असल्याची माहिती अतिक्रमण विभागाला असताना एकदाही या ठिकाणी कोणता अधिकारी फिरकला नाही. संपूर्ण इमारत उभी राहिल्यावर त्याची तक्रार अंबरनाथमधील एका बड्या राजकीय नेत्याने पालिका अधिकाºयांकडे केली.तक्रार आली तर कारवाई दाखवावी लागेल, या हेतूने पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने लागलीच त्या इमारतीच्या दोन ते तीन भिंतींना भगदाड पाडत कारवाईचा फार्स केला. कारवाई झाल्याची नोंद करून पालिकेचे अधिकारी निघून गेले.अतिक्रमणासंदर्भात तक्रार आल्यावर पालिकेने कारवाई करण्यासोबत संबंधितांवर गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने कारवाईचा फार्स करून संरक्षण देण्याचे काम केले आहे. तात्पुरती कारवाई झाल्यावर त्या इमारतीवर ठोस कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, ती कारवाईदेखील पालिकेने केलेली नाही. या अतिक्रमणाची कोणतीच माहिती नगररचना विभागाला देण्यात आलेली नाही. या इमारतीचा कोणताही प्रस्ताव मंजुरीसाठी पालिकेकडे नाही. असे असतानाही कारवाईसाठी केवळ चालढकल केली जात आहे. अतिक्रमणांबाबत योग्य कारवाई व्हावी, यासाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी अधिकाºयांची नेमणूक करून त्यांचे अधिकार निश्चित केले होते. त्यांच्या प्रभागात अतिक्रमण झाल्यास त्याला संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असे स्पष्ट केले होते. मात्र, अंबरनाथ पालिकेतील अतिक्रमण विभागाचे अधिकारी अतिक्रमण रोखणे तर दूरच त्या अतिक्रमणांना संरक्षण देण्याचेच काम करत आहेत. त्यामुळे या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :thaneठाणे