शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

अंबरनाथ नगरपालिका : बेकायदा इमारतीला अधिकाºयांचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 06:53 IST

बेकायदा झोपड्या आणि चाळी उभारणे, हे अंबरनाथ पालिका हद्दीत सहज शक्य आहे. मात्र, आता चाळींसोबत अंबरनाथमध्ये तीन मजली इमारत बेकायदा उभारण्यात आली आहे. रस्त्याला लागून ही इमारत उभारलेली असतानाही पालिकेचे अधिकारी कारवाईसाठी त्या ठिकाणी फिरकलेच नाही.

अंबरनाथ - बेकायदा झोपड्या आणि चाळी उभारणे, हे अंबरनाथ पालिका हद्दीत सहज शक्य आहे. मात्र, आता चाळींसोबत अंबरनाथमध्ये तीन मजली इमारत बेकायदा उभारण्यात आली आहे. रस्त्याला लागून ही इमारत उभारलेली असतानाही पालिकेचे अधिकारी कारवाईसाठी त्या ठिकाणी फिरकलेच नाही. अखेर, एका बड्या नेत्याने याप्रकरणी तोंडी तक्रार करताच कारवाईचा दिखावा करण्यात पालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग कुठेच कमी पडला नाही. इमारत तशीच ठेवत केवळ दोनचार भिंतींना भगदाड पाडून निघून गेले.अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाºया उड्डाणपुलाला लागूनच साईबाबा मंदिराशेजारी दोन इमारतींच्या मध्यभागी मोकळी जागा होती. रस्त्याला लागूनच असल्याने एका विकासकाने थेट ही जागा ताब्यात घेत त्या ठिकाणी पालिकेची कोणतीच परवानगी न घेता थेट तीन मजली इमारत उभी केली. अत्यंत अडचणीच्या ठिकाणी ही इमारत उभी केली आहे. या इमारतीला जिना हा शेजारील इमारतीतून देण्यात आला आहे.शहराला जोडणाºया महत्त्वाच्या रस्त्यावर मोठी इमारत उभी केली जात असताना नगरपालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत होता. ही इमारत बेकायदा उभी राहत असल्याची माहिती अतिक्रमण विभागाला असताना एकदाही या ठिकाणी कोणता अधिकारी फिरकला नाही. संपूर्ण इमारत उभी राहिल्यावर त्याची तक्रार अंबरनाथमधील एका बड्या राजकीय नेत्याने पालिका अधिकाºयांकडे केली.तक्रार आली तर कारवाई दाखवावी लागेल, या हेतूने पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने लागलीच त्या इमारतीच्या दोन ते तीन भिंतींना भगदाड पाडत कारवाईचा फार्स केला. कारवाई झाल्याची नोंद करून पालिकेचे अधिकारी निघून गेले.अतिक्रमणासंदर्भात तक्रार आल्यावर पालिकेने कारवाई करण्यासोबत संबंधितांवर गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने कारवाईचा फार्स करून संरक्षण देण्याचे काम केले आहे. तात्पुरती कारवाई झाल्यावर त्या इमारतीवर ठोस कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, ती कारवाईदेखील पालिकेने केलेली नाही. या अतिक्रमणाची कोणतीच माहिती नगररचना विभागाला देण्यात आलेली नाही. या इमारतीचा कोणताही प्रस्ताव मंजुरीसाठी पालिकेकडे नाही. असे असतानाही कारवाईसाठी केवळ चालढकल केली जात आहे. अतिक्रमणांबाबत योग्य कारवाई व्हावी, यासाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी अधिकाºयांची नेमणूक करून त्यांचे अधिकार निश्चित केले होते. त्यांच्या प्रभागात अतिक्रमण झाल्यास त्याला संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असे स्पष्ट केले होते. मात्र, अंबरनाथ पालिकेतील अतिक्रमण विभागाचे अधिकारी अतिक्रमण रोखणे तर दूरच त्या अतिक्रमणांना संरक्षण देण्याचेच काम करत आहेत. त्यामुळे या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :thaneठाणे