शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

अंबरनाथ नगरपालिका : बेकायदा इमारतीला अधिकाºयांचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 06:53 IST

बेकायदा झोपड्या आणि चाळी उभारणे, हे अंबरनाथ पालिका हद्दीत सहज शक्य आहे. मात्र, आता चाळींसोबत अंबरनाथमध्ये तीन मजली इमारत बेकायदा उभारण्यात आली आहे. रस्त्याला लागून ही इमारत उभारलेली असतानाही पालिकेचे अधिकारी कारवाईसाठी त्या ठिकाणी फिरकलेच नाही.

अंबरनाथ - बेकायदा झोपड्या आणि चाळी उभारणे, हे अंबरनाथ पालिका हद्दीत सहज शक्य आहे. मात्र, आता चाळींसोबत अंबरनाथमध्ये तीन मजली इमारत बेकायदा उभारण्यात आली आहे. रस्त्याला लागून ही इमारत उभारलेली असतानाही पालिकेचे अधिकारी कारवाईसाठी त्या ठिकाणी फिरकलेच नाही. अखेर, एका बड्या नेत्याने याप्रकरणी तोंडी तक्रार करताच कारवाईचा दिखावा करण्यात पालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग कुठेच कमी पडला नाही. इमारत तशीच ठेवत केवळ दोनचार भिंतींना भगदाड पाडून निघून गेले.अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाºया उड्डाणपुलाला लागूनच साईबाबा मंदिराशेजारी दोन इमारतींच्या मध्यभागी मोकळी जागा होती. रस्त्याला लागूनच असल्याने एका विकासकाने थेट ही जागा ताब्यात घेत त्या ठिकाणी पालिकेची कोणतीच परवानगी न घेता थेट तीन मजली इमारत उभी केली. अत्यंत अडचणीच्या ठिकाणी ही इमारत उभी केली आहे. या इमारतीला जिना हा शेजारील इमारतीतून देण्यात आला आहे.शहराला जोडणाºया महत्त्वाच्या रस्त्यावर मोठी इमारत उभी केली जात असताना नगरपालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत होता. ही इमारत बेकायदा उभी राहत असल्याची माहिती अतिक्रमण विभागाला असताना एकदाही या ठिकाणी कोणता अधिकारी फिरकला नाही. संपूर्ण इमारत उभी राहिल्यावर त्याची तक्रार अंबरनाथमधील एका बड्या राजकीय नेत्याने पालिका अधिकाºयांकडे केली.तक्रार आली तर कारवाई दाखवावी लागेल, या हेतूने पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने लागलीच त्या इमारतीच्या दोन ते तीन भिंतींना भगदाड पाडत कारवाईचा फार्स केला. कारवाई झाल्याची नोंद करून पालिकेचे अधिकारी निघून गेले.अतिक्रमणासंदर्भात तक्रार आल्यावर पालिकेने कारवाई करण्यासोबत संबंधितांवर गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने कारवाईचा फार्स करून संरक्षण देण्याचे काम केले आहे. तात्पुरती कारवाई झाल्यावर त्या इमारतीवर ठोस कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, ती कारवाईदेखील पालिकेने केलेली नाही. या अतिक्रमणाची कोणतीच माहिती नगररचना विभागाला देण्यात आलेली नाही. या इमारतीचा कोणताही प्रस्ताव मंजुरीसाठी पालिकेकडे नाही. असे असतानाही कारवाईसाठी केवळ चालढकल केली जात आहे. अतिक्रमणांबाबत योग्य कारवाई व्हावी, यासाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी अधिकाºयांची नेमणूक करून त्यांचे अधिकार निश्चित केले होते. त्यांच्या प्रभागात अतिक्रमण झाल्यास त्याला संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असे स्पष्ट केले होते. मात्र, अंबरनाथ पालिकेतील अतिक्रमण विभागाचे अधिकारी अतिक्रमण रोखणे तर दूरच त्या अतिक्रमणांना संरक्षण देण्याचेच काम करत आहेत. त्यामुळे या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :thaneठाणे