शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

अंबरनाथ नगरपालिकेला हवा पूर्णवेळ मुख्याधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:38 IST

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे. एवढेच ...

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे. एवढेच नव्हेतर, अंबरनाथला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने पालिकेचा कारभार सांभाळणे अवघड झाले आहे.

वर्षभरापूर्वी अंबरनाथमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण पालिका प्रशासन कोरोना नियंत्रणावर काम करीत होते. अशा परिस्थितीत शहरातील इतर सर्व विकासकामांवर दुर्लक्षदेखील झाले. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवणे हेच सर्वांचे लक्ष झाल्याने त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. कोरोनावर प्रभावीपणे काम करण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांची अंबरनाथ नगरपालिकेत नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली कोरोनावर कामही करण्यात आले. कोरोनाची लाट कमी झाल्यानंतर प्रशासकीय कामांकडे अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. मात्र, आता महिन्याभरापासून कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने कोरोना नियंत्रणासाठी पुन्हा अधिकाऱ्यांची फळी कामाला लावणे गरजेचे ठरले आहे. मात्र, मुख्याधिकारी रसाळ यांच्याकडे अंबरनाथ पालिकेचा तात्पुरता पदभार देण्यात आल्याने त्यांना अंबरनाथ शहराच्या कोरोनावरील कामकाजासाठी पूर्ण वेळ देणे शक्य होत नाही. रसाळ यांची बदली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पावर करण्यात आल्याने त्या ठिकाणी सर्वाधिक वेळ देणे बंधनकारक झाले आहे.

तो पदभार सांभाळून अंबरनाथ पालिकेचा अतिरिक्त कारभार त्यांना सांभाळावा लागत आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे कामकाज पाहणे अवघड झाले आहे. अंबरनाथमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अंबरनाथ शहरात पूर्णवेळ मुख्य अधिकाऱ्यांची गरज भासणार असून, प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.