शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अंबरनाथ नगरपालिकेला हवा पूर्णवेळ मुख्याधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:38 IST

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे. एवढेच ...

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे. एवढेच नव्हेतर, अंबरनाथला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने पालिकेचा कारभार सांभाळणे अवघड झाले आहे.

वर्षभरापूर्वी अंबरनाथमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण पालिका प्रशासन कोरोना नियंत्रणावर काम करीत होते. अशा परिस्थितीत शहरातील इतर सर्व विकासकामांवर दुर्लक्षदेखील झाले. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवणे हेच सर्वांचे लक्ष झाल्याने त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. कोरोनावर प्रभावीपणे काम करण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांची अंबरनाथ नगरपालिकेत नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली कोरोनावर कामही करण्यात आले. कोरोनाची लाट कमी झाल्यानंतर प्रशासकीय कामांकडे अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. मात्र, आता महिन्याभरापासून कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने कोरोना नियंत्रणासाठी पुन्हा अधिकाऱ्यांची फळी कामाला लावणे गरजेचे ठरले आहे. मात्र, मुख्याधिकारी रसाळ यांच्याकडे अंबरनाथ पालिकेचा तात्पुरता पदभार देण्यात आल्याने त्यांना अंबरनाथ शहराच्या कोरोनावरील कामकाजासाठी पूर्ण वेळ देणे शक्य होत नाही. रसाळ यांची बदली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पावर करण्यात आल्याने त्या ठिकाणी सर्वाधिक वेळ देणे बंधनकारक झाले आहे.

तो पदभार सांभाळून अंबरनाथ पालिकेचा अतिरिक्त कारभार त्यांना सांभाळावा लागत आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे कामकाज पाहणे अवघड झाले आहे. अंबरनाथमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अंबरनाथ शहरात पूर्णवेळ मुख्य अधिकाऱ्यांची गरज भासणार असून, प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.