शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

छुप्या जीन्स वॉश कारखान्यांवर अंबरनाथ पालिकेची कारवाई; ना्ल्यात सोडत होते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:06 IST

वालधुनीसह नाल्यात सोडत होते पाणी : कंपन्यांना दिल्या होत्या नोटिसा

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात रासायनिक कंपन्यांसह, आनंदनगर एमआयडीसीला लागूनच पाच ठिकाणी जीन्स वॉश कारखाने सुरू असल्याचे नगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ अर्थात एमपीसीबीच्या संयुक्त कारवाईत समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे सर्वपक्षीय राजकीय आश्रयातूनच हे कारखाने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या जीन्स कारखान्यांवर कारवाई झाली असली तरी त्यांना संरक्षण देणाऱ्या पुढाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथमध्ये वालधुनीतील रासायनिक पाण्यातून उद्भवणारे जल आणि वायू प्रदूषणाच्या मुद्यामुळे एमपीसीबीकडून आनंदनगर एमआयडीसीतील कंपन्यांची झाडाझडती सुरू होती. गेल्या दोन महिन्यांत जवळपास ६८ कंपन्यांना एमपीसीबीने नोटिसा बजावल्या होत्या. या घटनेनंतर वालधुनीच्या पात्रात उग्र दर्प असलेले रसायन सोडल्याचे प्रकरण नुकतेच समोर आल्याने, रासायनिक कंपन्या आणि रसायन सोडणाऱ्या टँकर लॉबी एमपीसीबी आणि प्रशासकीय यंत्रणांना घाबरत नसल्याचे समोर आले होते. एकीकडे रासायनिक कंपन्या जल प्रदूषण करत असताना, दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपासून बंदी असलेले जीन्स वॉश कारखाने याच भागात बिनधास्त सुरू असून, जीन्स वॉशचे पाणी थेट वालधुनी आणि नाल्यांमध्ये सोडले जात आहेत. पर्यावरण सचिवांनी अंबरनाथमधील प्रदूषणाची पाहणी केल्यानंतर नगरपालिका हद्दीतील जीन्स वॉश कारखाने शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या आदेशानंतर उपमुख्याधिकारी धीरल चव्हाण, नरेंद्र संखे तसेच पालिका कर्मचारी आणि एमपीसीबीच्या कर्मचाऱ्यांनी अंबरनाथ येथील लोकनगरी, शिवाजीनगर, एमआयडीसी रोड, पेट्रोल पंपजवळ आणि दीपक नगरसह पाच ठिकाणी छुप्या पद्धतीने विनापरवाना सुरू असलेल्या जीन्स वॉश कारखान्यांवर छापा टाकत कारवाई केली आहे.

प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले नाल्यात

छापा टाकलेल्या कारखान्यांतून कुठलीही प्रक्रीया न करता सांडपाणी नाल्यात सोडले जात असून अनेक ठिकाणी हे पाणी जमिनीत मुरवले जात होते. या पाण्याचे नमुने एमपीसीबीने तपासासाठी घेतले आहे. ते तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. पाण्याच्या अहवालानंतर या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे एमपीसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले.