शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

अंबरनाथ-बदलापूरची निवडणूक पुन्हा लांबणीवर; कोरोनाचा परिणाम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 00:37 IST

अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, त्याच काळात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने ती पुढे ढकलण्यात आली

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही शहरांत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने अशा परिस्थितीत निवडणूक घेणे अशक्य मानले जात आहे. त्यातच राज्य शासन यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यास तयार नसल्याने अनिश्चित काळासाठी ही निवडणूक पुढे जाण्याचे संकेत आहेत.

अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, त्याच काळात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने ती पुढे ढकलण्यात आली. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कोरोनारुग्णांची संख्या घटू लागल्याने फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, त्या काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्याने त्यावेळेसही अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगाने मतदारयादीचे काम हाती घेतले होते.

तेदेखील अंतिम टप्प्यात असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने हे कामदेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने मतदारयादी जाहीर न केल्याने आता पालिकेच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे जाणार, हे निश्चित झाले आहे. १७ मार्च रोजी अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेने आपल्या मतदारयाद्या निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केल्या आहेत. मतदारयादी जाहीर झाल्यानंतर निवडणूक होणे क्रमप्राप्त असल्याने आयोगाने ही मतदारयादी जाहीर केलेली नाही. ती जाहीर होत नसल्याने नेमकी निवडणूक होणार कधी, असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांना पडला आहे. खरेतर निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. माऋ, वर्ष उलटले तरी होत नसल्याने आता राजकीय पक्षदेखील निवडणूक प्रचारापासून लांब असलेले दिसत आहेत.