शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अंबरनाथ - बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:00 IST

पावसाच्या विश्रांतीनंतर कामाला वेग; पाच महिन्यांत होणार पूर्ण

- पंकज पाटील अंबरनाथ/ बदलापूर : मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या होम फलाटाचे काम सुरू करण्यात आले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १ ला समांतर फलाट बांधला जात आहे. मात्र पावसामुळे या कामात अडथळा येत होता. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यावर या कामाला गती देण्यात आली आहे. पाच महिन्यांत हे काम पूर्ण करुन प्रवाशांसाठी तो सुरु करण्यात येणार आहे.अंबरनाथ आणि बदलापूर शहराची लोकसंख्या वाढत असताना त्याचा ताण दोन्ही स्थानकांवर पडत आहे. अंबरनाथ स्थानकाचा विचार करता या स्थानकात फलाट क्रमांक १ आणि २ वर एकत्रित लोकल आल्यावर उतरणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच एकाच पादचारी पुलावर प्रवाशांची गर्दी होत असल्याने त्या ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याची भीती निर्माण होते. यावर तोडगा काढण्यासाठी अंबरनाथ स्थानकात होम फलाटाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यासाठी आवश्यक जागाही रेल्वेच्या ताब्यात असल्याने प्रशासनाने हे काम सुरु केले होते. मात्र पावसामुळे कामात व्यत्यय येत असल्याने फलाटाचे काम संथ गतीने सुरु होते.आता पावसाने विश्रांती घेताच पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी वाहणारा स्वामीनगरचा नाला अडचण निर्माण करत असल्याने त्या ठिकाणी पालिकेने आरसीसी भिंत उभारुन रेल्वे प्रशासनाच्या कामाला हातभारही लावला आहे. १२ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक असलेल्या फलाट उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.बदलापूरमध्ये होम फलाटाचा प्रस्ताव मंजूर होऊन वर्ष उलटले होते. मात्र ज्या ठिकाणी स्थानकाचे काम करण्याची गरज होती ती जागा व्यापाऱ्यांची असल्याने ती ताब्यात घेण्यासाठी कसरत करावी लागली. व्यापाºयांचा विरोध क्षमविण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले. तर रेल्वे प्रशासनानेही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. होम फलाट साकारताना व्यापाºयांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांची जागा या कामासाठी जाणार आहे, त्यांना भरपाई देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात अडचणी दूर होण्यास मदत झाली आहे.रस्त्याला समांतर बसवले पत्रेदुसरीकडे बदलापूर होम फलाटाचे काम करण्यासाठी पूर्व भागातील रस्त्याला समांतर असे पत्र बसविण्यात आले आहे. ते काम करत असताना अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. आता पावसाने विश्रांती घेतल्याने या कामालाही वेग आला आहे. चार ते पाच महिन्यात हे काम पूर्ण करुन प्रवाशांसाठी सुरु करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनामार्फत सुरु आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे