शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

अंबरनाथसह २७ गावांच्या शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:59 IST

जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या विविध समस्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

ठाणे : जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या विविध समस्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आता त्यात कल्याण डोंबिवली मनपा परिसरातील २७ गावे आणि अंबरनाथ तालुक्यातील नऊ गावे यातील सुमारे शंभरपेक्षा अधिक शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, तरीही या शिक्षकांनी बदलीच्या ठिकाणी हजर होण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे हा शिक्षकवर्गही संभ्रमावस्थेत सापडला आहे.जिल्हा परिषदेच्या या आॅनलाइन बदल्या विविध कारणांखाली गाजत आहेत. अन्याय सहन करून घ्यायचा नाही, या मानसिकतेतील शिक्षकवर्ग अन्यायाविरोधात न्यायालयात धाव घेत आहे. बनावट कागदपत्रे, सेवाज्येष्ठता डावलल्याने, वैद्यकीय कागदपत्रे बनावट दिल्यामुळे या बदल्यांमध्ये आधीच अडथळे येत आहेत. त्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेत ठेवण्याची मागणी २७ गावांमधील शिक्षकांनी आधीच केली आहे. यात ८० ते ८५ शिक्षकांचा समावेश आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नऊ गांवामधील शिक्षकांनीदेखील नगरपालिकेत राहण्याचे मागणी लावून धरली आहे. यामुळे या शिक्षकांनी न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केल्या आहेत. पण त्यास न जुमानता या शिक्षकांनी बदली झालेल्या शाळांवर हजर होण्याची अपेक्षा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून व्यक्त होत आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेमधील २७ गावांच्या शाळा जिल्हा परिषदेत वर्ग न करता त्या महापालिकेतच ठेवाव्यात. यासाठी भाल, व्दारली, वसार, चिंचपाडा आदी २७ गावांच्या शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांची सुनावणी ४ जून रोजी आहे. तर जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील नऊ गावांच्या शाळा अंबरनाथ नगरपालिकेकडे वर्ग झालेल्या नाही. यामध्ये पाले, चिखलोली, जावसई, फॉरेस्टनाका आणि जांभवली आदी या नऊ गावाचा समावेश आहे. या शिक्षकांनादेखील २७ गावांच्या शिक्षकांप्रमाणे ३० टक्के घरभाडे लागू आहे. यामुळे या नऊ गावांमधील प्राथमिक शिक्षकांनी न्यायालयात धाव घेऊन या आॅनलाइन बदल्यांविरोध स्थगिती मिळवली आहे.याप्रकरणी सुनावणी ७ जून रोजी उच्च न्यायालयात आहे. न्यायालयात धाव घेऊन या शिक्षकांनी या आॅनलाइन बदल्यांना स्थगिती मिळवलेली आहे. पण या शिक्षकांनी वेळीच हजर होण्याची अपेक्षा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून व्यक्त होत असल्यामुळे या शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यावर शिक्षण विभागाकडून बोलणे टाळले जात आहे. त्यामुळे एकूण शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे.बदलीच्या शाळांवर हजर व्हा!सर्व शिक्षकांच्या बदल्या आॅनलाइन झालेल्या आहेत. २७ गावांमधील शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांनी बदली शाळांवर हजर व्हायला पाहिजे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे