शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

अंबरनाथसह २७ गावांच्या शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:59 IST

जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या विविध समस्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

ठाणे : जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या विविध समस्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आता त्यात कल्याण डोंबिवली मनपा परिसरातील २७ गावे आणि अंबरनाथ तालुक्यातील नऊ गावे यातील सुमारे शंभरपेक्षा अधिक शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, तरीही या शिक्षकांनी बदलीच्या ठिकाणी हजर होण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे हा शिक्षकवर्गही संभ्रमावस्थेत सापडला आहे.जिल्हा परिषदेच्या या आॅनलाइन बदल्या विविध कारणांखाली गाजत आहेत. अन्याय सहन करून घ्यायचा नाही, या मानसिकतेतील शिक्षकवर्ग अन्यायाविरोधात न्यायालयात धाव घेत आहे. बनावट कागदपत्रे, सेवाज्येष्ठता डावलल्याने, वैद्यकीय कागदपत्रे बनावट दिल्यामुळे या बदल्यांमध्ये आधीच अडथळे येत आहेत. त्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेत ठेवण्याची मागणी २७ गावांमधील शिक्षकांनी आधीच केली आहे. यात ८० ते ८५ शिक्षकांचा समावेश आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नऊ गांवामधील शिक्षकांनीदेखील नगरपालिकेत राहण्याचे मागणी लावून धरली आहे. यामुळे या शिक्षकांनी न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केल्या आहेत. पण त्यास न जुमानता या शिक्षकांनी बदली झालेल्या शाळांवर हजर होण्याची अपेक्षा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून व्यक्त होत आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेमधील २७ गावांच्या शाळा जिल्हा परिषदेत वर्ग न करता त्या महापालिकेतच ठेवाव्यात. यासाठी भाल, व्दारली, वसार, चिंचपाडा आदी २७ गावांच्या शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांची सुनावणी ४ जून रोजी आहे. तर जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील नऊ गावांच्या शाळा अंबरनाथ नगरपालिकेकडे वर्ग झालेल्या नाही. यामध्ये पाले, चिखलोली, जावसई, फॉरेस्टनाका आणि जांभवली आदी या नऊ गावाचा समावेश आहे. या शिक्षकांनादेखील २७ गावांच्या शिक्षकांप्रमाणे ३० टक्के घरभाडे लागू आहे. यामुळे या नऊ गावांमधील प्राथमिक शिक्षकांनी न्यायालयात धाव घेऊन या आॅनलाइन बदल्यांविरोध स्थगिती मिळवली आहे.याप्रकरणी सुनावणी ७ जून रोजी उच्च न्यायालयात आहे. न्यायालयात धाव घेऊन या शिक्षकांनी या आॅनलाइन बदल्यांना स्थगिती मिळवलेली आहे. पण या शिक्षकांनी वेळीच हजर होण्याची अपेक्षा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून व्यक्त होत असल्यामुळे या शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यावर शिक्षण विभागाकडून बोलणे टाळले जात आहे. त्यामुळे एकूण शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे.बदलीच्या शाळांवर हजर व्हा!सर्व शिक्षकांच्या बदल्या आॅनलाइन झालेल्या आहेत. २७ गावांमधील शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांनी बदली शाळांवर हजर व्हायला पाहिजे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे