शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

रेशीम उद्योग कार्यालयाला नेहमीच कुलूप

By admin | Updated: July 27, 2015 22:59 IST

तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन प्रकल्प राबवून शेतीला उत्तम जोडधंदा मिळावा म्हणून रेशीम विकास प्रकल्प पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागात

जव्हार : तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन प्रकल्प राबवून शेतीला उत्तम जोडधंदा मिळावा म्हणून रेशीम विकास प्रकल्प पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागात महाराष्ट्र शासनाने राबविला. त्यासाठी रेशीम संचालनालयाचे जिल्हा रेशीम उद्योग कार्यालय जव्हार येथे सुरू करण्यात आले आहे. याचा मोठा फायदा या आदिवासी शेतकऱ्यांना व्हावा व त्यांच्या उत्पन्नात भर पडून विकास व्हावा. मात्र, या जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयातील रेशीम अधिकारी कार्यालयात बसत नाही, त्याला सतत टाळे असते.पालघर जिल्ह्यातील रेशीम उद्योग कोष व तुती लागवड हे रेशीम उद्योग जिल्हा कार्यालय जव्हारमध्ये आहे. परंतु, जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथील बऱ्याच आदिवासी शेतकऱ्यांना हे रेशीम उद्योग कार्यालय कुठे आहे, हे माहीत नाही. हे जिल्हा रेशीम उद्योग कार्यालय एका खाजगी इमारतीमध्ये आहे. मात्र, कार्यालयाच्या बाहेर बोर्डही नाही. तशात हे रेशीम उद्योग कार्यालय सतत बंद असल्याने ते शोधूनही सापडत नाही. या जिल्ह्याच्या रेशीम उद्योग कार्यालयात जिल्हा रेशीम अधिकारी प्रिया नाईक आहेत. मात्र, या अधिकारी या कार्यालयात कधीच बसत नाहीत. त्यांच्याकडे काही काम असल्यास कार्यालयाच्या बंद दरवाजावर संपर्क नंबर लिहून ठेवला आहे. त्यामुळे या रेशीम उद्योगाचा गलथान कारभार उजेडात आला आहे. म्हणून येथील शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग करायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या तालुक्यात फक्त ३० शेतकरी रेशीम उद्योग करीत आहेत. कार्यालयात अधिकारीच बसत नसल्याने शेतकऱ्यांना याविषयी काही माहिती मिळत नाही. तर येथील जास्तीतजास्त शेतकरी अशिक्षित असल्याने हे कार्यालय कुठे आहे, हेही सापडत नाही. त्यामुळे येथील आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम विकास अधिकारी यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)नियुक्त अधिकारी आहेत कुठे?जव्हार येथील जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयात जिल्हा रेशीम उद्योग अधिकाऱ्यांसह एकूण ५ कर्मचारी नियुक्त आहेत. परंतु, यापैकी १ क्लर्क व १ शिपाई असे दोघे जण कधीतरी येथे उपस्थित राहतात. जिल्हा रेशीम अधिकारी हे कधीच येत नाहीत. तर त्यांची कार्यालयीन कामे व इतर कामे त्यांच्या घरी ठाणे येथे जाऊन करून घ्यावी लागत आहे. जिल्हा रेशीम विकास अधिकारी यांना भेटण्याचा वारंवार प्रयत्न गरजू शेतकऱ्यांनी केला, मात्र ते कधीच दिसले व भेटले नाही. त्यामुळे येथील शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. वरिष्ठच बेपत्ता रहात असल्याने त्यांच्या हाताखालच्या मंडळींचीही दांडीयात्रा नित्य सुरू असते.माझ्याकडे पालघर व ठाणे या दोन जिल्ह्यांचा कार्यालयीन कारभार असल्याने माझी धावपळ होत आहे. तरी मी माझ्या पद्धतीने या भागातील शेतकऱ्यांना जास्तीतजास्त सहकार्य व मदत करीत आहे. - प्रिया नाईक, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जव्हार