शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उद्योग कार्यालयाला नेहमीच कुलूप

By admin | Updated: July 27, 2015 22:59 IST

तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन प्रकल्प राबवून शेतीला उत्तम जोडधंदा मिळावा म्हणून रेशीम विकास प्रकल्प पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागात

जव्हार : तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन प्रकल्प राबवून शेतीला उत्तम जोडधंदा मिळावा म्हणून रेशीम विकास प्रकल्प पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागात महाराष्ट्र शासनाने राबविला. त्यासाठी रेशीम संचालनालयाचे जिल्हा रेशीम उद्योग कार्यालय जव्हार येथे सुरू करण्यात आले आहे. याचा मोठा फायदा या आदिवासी शेतकऱ्यांना व्हावा व त्यांच्या उत्पन्नात भर पडून विकास व्हावा. मात्र, या जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयातील रेशीम अधिकारी कार्यालयात बसत नाही, त्याला सतत टाळे असते.पालघर जिल्ह्यातील रेशीम उद्योग कोष व तुती लागवड हे रेशीम उद्योग जिल्हा कार्यालय जव्हारमध्ये आहे. परंतु, जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथील बऱ्याच आदिवासी शेतकऱ्यांना हे रेशीम उद्योग कार्यालय कुठे आहे, हे माहीत नाही. हे जिल्हा रेशीम उद्योग कार्यालय एका खाजगी इमारतीमध्ये आहे. मात्र, कार्यालयाच्या बाहेर बोर्डही नाही. तशात हे रेशीम उद्योग कार्यालय सतत बंद असल्याने ते शोधूनही सापडत नाही. या जिल्ह्याच्या रेशीम उद्योग कार्यालयात जिल्हा रेशीम अधिकारी प्रिया नाईक आहेत. मात्र, या अधिकारी या कार्यालयात कधीच बसत नाहीत. त्यांच्याकडे काही काम असल्यास कार्यालयाच्या बंद दरवाजावर संपर्क नंबर लिहून ठेवला आहे. त्यामुळे या रेशीम उद्योगाचा गलथान कारभार उजेडात आला आहे. म्हणून येथील शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग करायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या तालुक्यात फक्त ३० शेतकरी रेशीम उद्योग करीत आहेत. कार्यालयात अधिकारीच बसत नसल्याने शेतकऱ्यांना याविषयी काही माहिती मिळत नाही. तर येथील जास्तीतजास्त शेतकरी अशिक्षित असल्याने हे कार्यालय कुठे आहे, हेही सापडत नाही. त्यामुळे येथील आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम विकास अधिकारी यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)नियुक्त अधिकारी आहेत कुठे?जव्हार येथील जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयात जिल्हा रेशीम उद्योग अधिकाऱ्यांसह एकूण ५ कर्मचारी नियुक्त आहेत. परंतु, यापैकी १ क्लर्क व १ शिपाई असे दोघे जण कधीतरी येथे उपस्थित राहतात. जिल्हा रेशीम अधिकारी हे कधीच येत नाहीत. तर त्यांची कार्यालयीन कामे व इतर कामे त्यांच्या घरी ठाणे येथे जाऊन करून घ्यावी लागत आहे. जिल्हा रेशीम विकास अधिकारी यांना भेटण्याचा वारंवार प्रयत्न गरजू शेतकऱ्यांनी केला, मात्र ते कधीच दिसले व भेटले नाही. त्यामुळे येथील शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. वरिष्ठच बेपत्ता रहात असल्याने त्यांच्या हाताखालच्या मंडळींचीही दांडीयात्रा नित्य सुरू असते.माझ्याकडे पालघर व ठाणे या दोन जिल्ह्यांचा कार्यालयीन कारभार असल्याने माझी धावपळ होत आहे. तरी मी माझ्या पद्धतीने या भागातील शेतकऱ्यांना जास्तीतजास्त सहकार्य व मदत करीत आहे. - प्रिया नाईक, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जव्हार