शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

प.रे.वरील उपनगरीय रेल्वेतून दूध, भाजीपाला वाहतुकीला परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 00:45 IST

डहाणू-वैतरणा प्रवासी संस्थेची मागणी : ग्राहकांना मिळेल दिलासा

n लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर जिल्ह्यातील दूध, भाजीपाला आणि मासे यासारख्या अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तूंना उपनगरीय रेल्वेतून वाहतुकीची परवानगी मिळावी, अशी मागणी डहाणू-वैतरणा प्रवासी संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोजगार मिळविण्यासाठी सर्वत्र फिरणाऱ्या व्यावसायिकांची मोठी कुचंबणा झाली असून त्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला पोहोचली आहे. सर्वात जास्त झळ ही हातावर पोट असणाऱ्या गरीबवर्गाला बसली असून महिलावर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

जिल्ह्यात डहाणू ते वसईदरम्यान ११२ किमीच्या किनारपट्टीवर मत्स्योत्पादन व बागायती क्षेत्रावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात असून शेकडो महिला इथला पिकविलेला भाजीपाला, दूध, मासे मुंबईमध्ये विक्रीला नेत असतात. परंतु, मुंबईला जाण्यासाठी पश्चिम रेल्वेची रेल्वे सेवा बंद असल्याने आपल्या कुटुंबीयांच्या उदारनिर्वाहासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महिलांची आर्थिककोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरिओम ही स्तुत्य संकल्पना मांडली. त्यानुसार, टप्प्याटप्प्याने सर्वसमावेशक तसेच सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. अशा परिस्थितीत या महिलांचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू रोड ते वैतरणा यादरम्यान राहणाऱ्या शेतकरी बांधवांना आपला भाजीपाला व दूध, त्याचप्रमाणे मच्छीमार बांधवांना मासेविक्रीसाठी निश्चित स्थळापर्यंत पोहोचविण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात त्यांचा अमूल्य वेळ व पैसा वाया जात आहे. याचा विचार मुख्यमंत्री व रेल्वे प्रशासनाने करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.रस्तेमार्गावर अगोदरच वाहतूककोंडी, वाहतुकीसाठी लागणारा अधिकचा वेळ तसेच अवाढव्य खर्च यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आलेला आहे. कमी गर्दीच्या वेळी उपनगरीय रेल्वेतील सामान कक्षामधून नियोजन पद्धतीने या नाशवंत वस्तूची वाहतूक करण्याची परवानगी मिळाल्यास गरीब शेतकरी व मच्छीमार बांधवांना त्याचा खूप फायदा होईल. या नाशवंत वस्तू कमी वेळेत, कमी खर्चात जर ग्राहकांना मिळाल्या तर नक्कीच त्याचा लाभ दोघांनीदेखील होईल, असे म्हटले आहे. ग्राहक आणि विक्रेता या दोघांनाही या निर्णयाचा फायदा होऊ शकतो म्हणूनच या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून परवानगी द्यावी, अशी विनंती प्रवासी संस्थेने केली आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारthaneठाणेlocalलोकल