शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

कसारा, खोपोलीच्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि खोपोलीपर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीला जाण्यासाठी लोकल प्रवास करण्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि खोपोलीपर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीला जाण्यासाठी लोकल प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाची चेन ब्रेक होईल हे माहीत नाही; पण कर्जत, खोपोली, कसारा या परिसरातून कल्याण मुंबईत लहान मोठ्या नोकऱ्या करून उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो प्रवाशांचे कंबरडे मात्र साफ मोडून गेले आहे. कल्याण ते मुंबईदरम्यान रस्ते मार्ग प्रवास करता येतो. तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उपलब्ध आहेत. परंतु, कल्याण-कसारा व खोपोलीपर्यंतच्या नागरिकांना लोकलशिवाय दुसरा वाहतुकीचा सक्षम पर्याय नाही. अर्थचक्र सुरळीत ठेवण्याची भाषा करीत हजारो कुटुंबाची उपासमार करायची, हा कुठला न्याय आहे, असा सवाल संघटनेने केला आहे.

कल्याण-कसारा व खोपोली मार्गावरून कार्यालयीन वेळेत दुतर्फा एसटी बस सुविधा राज्य सरकार देऊच शकत नाही, हे मागच्या लॉकडाऊनमध्ये स्पष्ट झाले आहे. या लॉकडाऊनमध्ये या भागात आता उपासमारीचे बळी जाण्याची शक्यता आहे. तरी उर्वरित काळात कल्याणपुढील सर्व सरकारी व खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वैध ओळखपत्र वा अस्थापना

मालकाने दिलेले अधिकृत पत्र, यावर लोकलने प्रवास करण्याची परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार करून तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.

-------------