शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

आपत्तीग्रस्तांच्या वारसांना ३९ लाखांच्या मदतीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:05 IST

ठाणे जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली असताना दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीने तितक्याच प्रमाणात थैमान घातले. यामध्ये वित्तहानी झाली असून जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली असताना दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीने तितक्याच प्रमाणात थैमान घातले. यामध्ये वित्तहानी झाली असून जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या वारसांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने आतापर्यंत सुमारे ३९ लाखांची आर्थिक मदत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात अद्यापपर्यंत नैसर्गिक आपत्तीने बळी गेलेल्या २६ जणांपैकी ८ पात्र मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांप्रमाणे ३२ लाखांचे वाटप केले आहे. यामध्ये शहापूर तालुक्यात सर्वाधिक मदतीचे वाटप केले आहे.जून महिन्यापासून पावसाचा जिल्ह्यात चांगला जोर पाहण्यास मिळाला. त्यातच जुलै महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंदही झाली आहे. त्यातच नदीनाले वाहू लागले, तर जिल्ह्यातील धरणांची दारे बºयाच प्रमाणात उघडण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. तसेच आॅगस्टमध्ये पावसाने दमदार बॅटिंग केली. याचदरम्यान, जिल्ह्यात सात तालुक्यांत जीवितहानी व वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत. १ जूनपासून १३ आॅगस्टपर्यंत २६ जणांचा बळी गेलेला आहे. यामध्ये कल्याण आणि मुरबाड तालुक्यांतील प्रत्येकी दोघे असे चौघे वाहून गेले आहेत. शहापूरमध्ये चौघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ठाण्यात पाच मुले तलावात बुडाली आहेत. कल्याणमध्ये तिघे नदीत पाण्यात बुडाली आहेत. उल्हासनगरमध्ये एकाचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. शहापूरमध्ये एक सर्पदंशाने, १ तलावात, ३ पाण्याच्या प्रवाहामध्ये, १ धबधब्यात, १ नदीत तर १ धरणात बुडाला आहे. मात्र भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये बुडून किंवा वीज पडून कोणाचाही मृत्यू झालेला नाही.या २६ जणांपैकी ९ जण पात्र ठरले आहेत. परंतु, ८ जणांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांप्रमाणे एकूण ३२ लाखांचे आर्थिक मदतीचे वाटप झाले आहे. त्यामध्ये कल्याण-२, शहापूर-४, उल्हासनगर आणि मुरबाड येथील प्रति एकाला मदत दिली असून मुरबाडच्या एकाचे प्रकरण प्रलंबित आहे. मुरबाडमध्ये मोठ्या प्रमाणात दुधाळ जनावरे असून १७ शेळ्या आणि २२ कोंबड्या मरण पावल्या होत्या.