शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

‘हिंदुत्वाच्या विचारावर युती व्हावी’

By admin | Updated: February 28, 2017 03:31 IST

मुंबई, ठाणे, उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या वेळी शिवसेना-भाजपाने काडीमोड घेत युती तोडली.

डोंबिवली : मुंबई, ठाणे, उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या वेळी शिवसेना-भाजपाने काडीमोड घेत युती तोडली. निवडणुका स्वबळावर लढवल्या. मात्र, आता हिंदुत्वाचा विचार करून दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, अशी इच्छा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तसे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. संघाच्या जनकल्याण समितीने गोळवलकर गुरुजी पुरस्कार सोहळ्याची माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनीही हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत ही इच्छा व्यक्त केली. शिवसेना व भाजपा यांनी एकत्र यावे की नाही, या प्रश्नावर महाराष्ट्र प्रांत जनकल्याण समितीचे अध्यक्ष रवींद्र साताळकर यांनी थेट उत्तर देणे टाळले असले तरी हिंदुत्ववादी पक्षांनी एकत्रित यावे, अशी इच्छा व्यक्त केली. आधीच मा.गो. वैद्य यांनी शिवसेना-भाजापाने एकत्र येण्याची भूमिका मांडण्यास आणि महापौरपद अडीचअडीच वर्षे वाटून घ्यावे, असे सुचवण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर साताळवकर यांच्या या वक्तव्याचा अर्थ हा शिवसेना-भाजपाने एकत्रित राहावे, असाच काढला गेला.महापालिकांमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा-शिवसेनेत चढाओढ लागली होती. भाजपाला त्यात चांगले यश आले. त्याला केवळ ठाणे महापालिका अपवाद ठरली आहे. परंतु, दोन्ही पक्ष सत्तेच्या स्पर्धेत उतरले असले, तरी त्यांचा विचार हा सम आहे. हिंदुत्वाचा मुद्दा दोन्ही पक्षांकडे समानत्वाचा आहे. सत्ता ही जरी शिवसेना-भाजपामध्ये भेद निर्माण करणारी ठरली असली, तरी हिंदुत्व हे त्यांना पुन्हा एकत्रित आणू शकते, अशी संघ कार्यकर्त्यांची भूमिका आहे. तीच या पत्रकार परिषदेत व्यक्त झाली. (प्रतिनिधी)