शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेवर भाजपाचा विश्वासघाताचा आरोप

By admin | Updated: May 22, 2016 01:38 IST

अंबरनाथ तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत शिवसेना विरुध्द भाजपा अशीच लढत झाली आहे. निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करतांना शिवसेनेने युतीचा धर्म न पाळता परस्पर निर्णय घेतले

पंकज पाटील, अंबरनाथ अंबरनाथ तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत शिवसेना विरुध्द भाजपा अशीच लढत झाली आहे. निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करतांना शिवसेनेने युतीचा धर्म न पाळता परस्पर निर्णय घेतले. तेव्हा त्यांना युतीधर्म आठवला नाही. आता विधान परिषदेच्या निवडणुकीवेळीच का आठवला, अशी टीका करत भाजपाच्या गोटातील नगरसेवकांनी शिवसेनेवर विश्वासघाताचा आरोप केला आहे. युतीतील या वादाचा परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीवर होण्याची भीती आहे. भाजपाला विश्वासात घेत नसल्याने या निवडणुकीत वेगळ्या विचाराने निर्णय घेण्याची शक्यताही त्या पक्षाच्या नगरसेवकांनी व्यक्त आहे. कुळगांव-बदलापूर नगरपालिकाते सत्ता स्थापन करतांना भाजपाने युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र शिवसेनेने तो प्रस्ताव फेटाळत स्वबळावर सत्ता स्थापन केली. असाच प्रकार अंबरनाथमध्येही घडला. अंबरनाथमध्ये सत्तेची गणिते रचतांना शिवसेनेने भाजपाला बाजुला सारुन राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीला सत्तेचा भागीदार करित भाजपाला टाळण्याचा प्रयत्न केला. या दोन घटनांसोबतच अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीची निवडणूक ही दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. त्यातही सत्ता स्थापन करतांना भाजपाला बाजुला सारुन शिवसेनेने सत्ता स्थापन केली. अंबरनाथ तालुक्यात तिन्ही निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला बाजुला सारले. त्याचा संताप भाजपा नेत्यांत आहे. हाच राग येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीत निघण्याची शक्यता आहे. वरवर ‘युतीचा धर्म पाळा’ असा संदेश असला तरी स्थानिक पातळीवर नगरसेवकांचा शिवसेनेला विरोध दिसत आहे. हा विरोध शमविण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.