शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

सर्वच पक्षप्रमुखांची उल्हासनगरकडे पाठ

By admin | Updated: February 15, 2017 04:38 IST

अनेक समस्यांचे माहेरघर असलेल्या उल्हासनगरमधील अनेक प्रश्न गेल्या दहा वर्षांत सुटलेले नाहीत.

उल्हासनगर : अनेक समस्यांचे माहेरघर असलेल्या उल्हासनगरमधील अनेक प्रश्न गेल्या दहा वर्षांत सुटलेले नाहीत. त्याचा जाब द्यावा लागेल, या भीतीपोटी बहुतांश पक्षांच्या प्रमुखांनी प्रचारात उल्हासनगरकडे पाठ फिरवली आहे. येत्या पाच दिवसांतही मोठ्या नेत्यांच्या फारशा सभा होणार नाहीत, अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवरील नेते, स्थानिक नेत्यांच्याच खांद्यावर प्रचाराची भिस्त आहे. त्यातही अनेक नेत्यांनी ठाण्यातूनच उल्हासनगरलाही संबोधित केल्याने नेत्यांसाठी हे शहर अजूनही बहोत दूर आहे.त्यातही भाजपाने सत्तेच्या समीकरणांत उलथापालथ घडवल्याने राष्ट्रवादीला फटका बसला आहे. त्यामुळे त्या पक्षाचे प्रमुख नेते प्रचारापासून दूर आहेत. एकीकडे ओमी टीमला सोबत घेऊन पक्षाची बाजू मजबूत केली असली, तरी ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण’ या मुद्द्यावर कोंडी होऊ नये, म्हणून भाजपाचे प्रमुख नेते प्रचारासाठी येणार नाहीत. त्यातल्या त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बुधवारी चार चौकसभा ठेवण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.पालिकेवर सत्ता आपल्याच पक्षाची हवी, असे जरी प्रत्येक पक्षाला वाटते असले तरी येथील प्रश्नांवर भाष्य करण्यास कोणत्याही पक्षाला वेळ नसल्याचे चित्र आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, काँग्रेसचे दिग्गज नेते, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजीत पवार आदीच्या ठाण्यासोबत सभा होणार असे सांगितले जात होते. मात्र ठाण्यातील सभा झाल्यावरही प्रमुख नेते उल्हासनगरकडे फिरकले नाहीत. (प्रतिनिधी)