शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

सर्वच पक्षप्रमुखांची उल्हासनगरकडे पाठ

By admin | Updated: February 15, 2017 04:38 IST

अनेक समस्यांचे माहेरघर असलेल्या उल्हासनगरमधील अनेक प्रश्न गेल्या दहा वर्षांत सुटलेले नाहीत.

उल्हासनगर : अनेक समस्यांचे माहेरघर असलेल्या उल्हासनगरमधील अनेक प्रश्न गेल्या दहा वर्षांत सुटलेले नाहीत. त्याचा जाब द्यावा लागेल, या भीतीपोटी बहुतांश पक्षांच्या प्रमुखांनी प्रचारात उल्हासनगरकडे पाठ फिरवली आहे. येत्या पाच दिवसांतही मोठ्या नेत्यांच्या फारशा सभा होणार नाहीत, अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवरील नेते, स्थानिक नेत्यांच्याच खांद्यावर प्रचाराची भिस्त आहे. त्यातही अनेक नेत्यांनी ठाण्यातूनच उल्हासनगरलाही संबोधित केल्याने नेत्यांसाठी हे शहर अजूनही बहोत दूर आहे.त्यातही भाजपाने सत्तेच्या समीकरणांत उलथापालथ घडवल्याने राष्ट्रवादीला फटका बसला आहे. त्यामुळे त्या पक्षाचे प्रमुख नेते प्रचारापासून दूर आहेत. एकीकडे ओमी टीमला सोबत घेऊन पक्षाची बाजू मजबूत केली असली, तरी ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण’ या मुद्द्यावर कोंडी होऊ नये, म्हणून भाजपाचे प्रमुख नेते प्रचारासाठी येणार नाहीत. त्यातल्या त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बुधवारी चार चौकसभा ठेवण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.पालिकेवर सत्ता आपल्याच पक्षाची हवी, असे जरी प्रत्येक पक्षाला वाटते असले तरी येथील प्रश्नांवर भाष्य करण्यास कोणत्याही पक्षाला वेळ नसल्याचे चित्र आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, काँग्रेसचे दिग्गज नेते, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजीत पवार आदीच्या ठाण्यासोबत सभा होणार असे सांगितले जात होते. मात्र ठाण्यातील सभा झाल्यावरही प्रमुख नेते उल्हासनगरकडे फिरकले नाहीत. (प्रतिनिधी)