शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

शहापूरच्या लेनाडसह हिव, रास येथेही कृषिसमृद्धी केंद्र; समृद्धी महामार्गासाठी हरकती, सूचना मागविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 02:14 IST

या २४ कृषिसमृद्धी केंद्रांच्या विकासात अडथळा येऊ नये, म्हणून राज्य शासनाने यापूर्वीच त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार काढून त्यांच्या नगरनियोजनाचे अधिकार रस्ते विकास महामंडळास बहाल केले आहेत

नारायण जाधव ठाणे : बहुचर्चित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील एकूण २४ कृषिसमृद्धी (टाउनशिप) केंद्रांपैकी ठाणे जिल्ह्णातील समृद्धी केंद्रासाठी शहापूर तालुक्यातील मौजे लेनाडसह हिव आणि रास या दोन गावांच्या जमिनीही नगरविकास विभागाने आरक्षित केल्या आहेत. यासाठी स्थानिक ग्रामस्थांकडून एका महिन्याच्या हरकती आणि सूचना मागविल्या असून, त्या ऐकून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

नगरविकास विभागाने ५ जून, २०१७ रोजी समृद्धी महामार्गावरील ठाणे जिल्ह्णातील ज्या गावांच्या जमिनी कृषिसमृद्धी केंद्रासाठी आरक्षित केल्या होत्या. त्यातील ५० टक्के जमिनी वनविभागात असल्याचे लक्षात आल्याने, पुणे येथील नगररचना संचालकांचा सल्ला घेऊन आता शहापूर तालुक्यातील लेनाडसह हिव आणि रास या गावांच्या जमिनीही कृषिसमृद्धी केंद्रासाठी आरक्षित करण्यात येणार आहेत.

एकूण २४ टाउनशिपया संपूर्ण महामार्गावर एकूण २४ कृषिसमृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. दोन कृषिसमृद्धी केंद्रांतील अंतर साधारणत: २० ते ४० किमी राहणार असून, प्रत्येकाचे क्षेत्र ४०० ते ५०० हेक्टर राहणार आहे. त्या ठिकाणी गरज आणि संभाव्य क्षमता लक्षात घेऊन कृषिपूरक उद्योग, पर्यटन, शैक्षणिक सुविधा केंद्र, वैद्यकीय सुविधा निर्माण करून रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय फूड मॉल, पेट्रोलपंप, मनोरंजन मॉल, शीतगृहे, वखारींची साखळी आणि सर्वांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. यावर टाउनशिपमधील पायाभूत सुविधांवर रस्ते विकास महामंडळ २,४०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

समृद्धी केंद्रांचे अधिकार एमएसआरडीसीलाया २४ कृषिसमृद्धी केंद्रांच्या विकासात अडथळा येऊ नये, म्हणून राज्य शासनाने यापूर्वीच त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार काढून त्यांच्या नगरनियोजनाचे अधिकार रस्ते विकास महामंडळास बहाल केले आहेत. शिवाय, गेल्याच महिन्यात इमारतरेषा व नियंत्रणरेषा यांच्या अंतरामधील जनतेच्या मनातील संभ्रम टाळण्यासाठी व सर्व परवानग्यांत एकसूत्रता येण्यासाठी पथकिनारवर्ती नियमात बदल करून, त्याबाबतच्या सुधारणा आपल्या विकास नियंत्रण नियमावलीत करण्याचे आदेश सर्वच नियोजन प्राधिकरणांना ५ आॅगस्ट रोजी दिले आहेत.मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी महामंडळांकडून साडेपाच हजार कोटींचे कर्ज घेतल्यानंतर, भारतीय स्टेट बँकेकडून चार हजार कोटी आणि एलआयसी अर्थात, भारतीय आयुर्विमा महामंडळ, कॅनरा बँक, हुडको आणि पंजाब नॅशनल बँक अशा चार वित्त संस्थांकडून १३ हजार कोटींचे कर्ज घेण्यात येणार असून, त्याची हमी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे.