शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

शहापूरच्या लेनाडसह हिव, रास येथेही कृषिसमृद्धी केंद्र; समृद्धी महामार्गासाठी हरकती, सूचना मागविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 02:14 IST

या २४ कृषिसमृद्धी केंद्रांच्या विकासात अडथळा येऊ नये, म्हणून राज्य शासनाने यापूर्वीच त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार काढून त्यांच्या नगरनियोजनाचे अधिकार रस्ते विकास महामंडळास बहाल केले आहेत

नारायण जाधव ठाणे : बहुचर्चित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील एकूण २४ कृषिसमृद्धी (टाउनशिप) केंद्रांपैकी ठाणे जिल्ह्णातील समृद्धी केंद्रासाठी शहापूर तालुक्यातील मौजे लेनाडसह हिव आणि रास या दोन गावांच्या जमिनीही नगरविकास विभागाने आरक्षित केल्या आहेत. यासाठी स्थानिक ग्रामस्थांकडून एका महिन्याच्या हरकती आणि सूचना मागविल्या असून, त्या ऐकून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

नगरविकास विभागाने ५ जून, २०१७ रोजी समृद्धी महामार्गावरील ठाणे जिल्ह्णातील ज्या गावांच्या जमिनी कृषिसमृद्धी केंद्रासाठी आरक्षित केल्या होत्या. त्यातील ५० टक्के जमिनी वनविभागात असल्याचे लक्षात आल्याने, पुणे येथील नगररचना संचालकांचा सल्ला घेऊन आता शहापूर तालुक्यातील लेनाडसह हिव आणि रास या गावांच्या जमिनीही कृषिसमृद्धी केंद्रासाठी आरक्षित करण्यात येणार आहेत.

एकूण २४ टाउनशिपया संपूर्ण महामार्गावर एकूण २४ कृषिसमृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. दोन कृषिसमृद्धी केंद्रांतील अंतर साधारणत: २० ते ४० किमी राहणार असून, प्रत्येकाचे क्षेत्र ४०० ते ५०० हेक्टर राहणार आहे. त्या ठिकाणी गरज आणि संभाव्य क्षमता लक्षात घेऊन कृषिपूरक उद्योग, पर्यटन, शैक्षणिक सुविधा केंद्र, वैद्यकीय सुविधा निर्माण करून रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय फूड मॉल, पेट्रोलपंप, मनोरंजन मॉल, शीतगृहे, वखारींची साखळी आणि सर्वांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. यावर टाउनशिपमधील पायाभूत सुविधांवर रस्ते विकास महामंडळ २,४०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

समृद्धी केंद्रांचे अधिकार एमएसआरडीसीलाया २४ कृषिसमृद्धी केंद्रांच्या विकासात अडथळा येऊ नये, म्हणून राज्य शासनाने यापूर्वीच त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार काढून त्यांच्या नगरनियोजनाचे अधिकार रस्ते विकास महामंडळास बहाल केले आहेत. शिवाय, गेल्याच महिन्यात इमारतरेषा व नियंत्रणरेषा यांच्या अंतरामधील जनतेच्या मनातील संभ्रम टाळण्यासाठी व सर्व परवानग्यांत एकसूत्रता येण्यासाठी पथकिनारवर्ती नियमात बदल करून, त्याबाबतच्या सुधारणा आपल्या विकास नियंत्रण नियमावलीत करण्याचे आदेश सर्वच नियोजन प्राधिकरणांना ५ आॅगस्ट रोजी दिले आहेत.मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी महामंडळांकडून साडेपाच हजार कोटींचे कर्ज घेतल्यानंतर, भारतीय स्टेट बँकेकडून चार हजार कोटी आणि एलआयसी अर्थात, भारतीय आयुर्विमा महामंडळ, कॅनरा बँक, हुडको आणि पंजाब नॅशनल बँक अशा चार वित्त संस्थांकडून १३ हजार कोटींचे कर्ज घेण्यात येणार असून, त्याची हमी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे.