शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

...तर शेतक-यांप्रमाणे आंदोलन छेडले जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 16:49 IST

कल्याण: ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात डिसेंबर महिन्यात नागपूरहून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलची राज्यस्तरीय जनजागृती रॅली ही बुधवारी कल्याणमधून मार्गस्थ झाली. यावेळी ओबीसी समाजाच्या मागण्यांसदर्भात येत्या १४ एप्रिलपर्यंत योग्य तो तोडगा न निघाल्यास शेतकरी बांधवांप्रमाणे ओबीसी समाजही आंदोलन छेडेल असा इशारा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी दिला.

ठळक मुद्देओबीसी सेलचा सरकारला इशारा

कल्याण: ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात डिसेंबर महिन्यात नागपूरहून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलची राज्यस्तरीय जनजागृती रॅली ही बुधवारी कल्याणमधून मार्गस्थ झाली. यावेळी ओबीसी समाजाच्या मागण्यांसदर्भात येत्या १४ एप्रिलपर्यंत योग्य तो तोडगा न निघाल्यास शेतकरी बांधवांप्रमाणे ओबीसी समाजही आंदोलन छेडेल असा इशारा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी दिला.१९ डिसेंबरला या जनजागृती अभियान रॅलीला प्रारंभ झाला असून १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी याचा समारोप होणार आहे. बुधवारी कल्याणमार्गे ही रॅली पुढे मार्गस्थ झाली. यामध्ये कल्याणमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, राजेश शिंदे, राजेंद्र नांदोस्कर, प्रसन्न अचलकर, एकनाथ म्हात्रे, निरंजन भोसले आदि पदाधिका-यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीचे नेतृत्व ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष बाळबुधे करीत आहेत. मागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हयात वसतीगृह करावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना जाहीर करून त्यांना निती आयोगाकडून निधीची वेगळी तरतूद करावी, ओबीस आर्थिक विकास महामंडळाला ५ हजार कोटी रुपये भांडवल दयावे, उद्योग व्यवसायासाठी १० लाखांपर्यंत कर्ज मर्यादा वाढवावी, क्रिमिलेअरची अट रद्द करावी, स्वामीनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करा, मंडल कमीशनची १०० टकके अंमलबजावणी करा, शेतक-यांच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करा, शेतक-यांच्या तरूण मुलांना उद्योगासाठी शून्य व्याज दरावर कर्ज उपलब्ध करून दया, ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण आहे पण पुढे विधानसभा लोकसभेत ओबीसींना २७ टकके आरक्षण मिळाले पाहिजे, तीन वर्षापासून प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्रिशीप ताबडतोब अदा करण्यात यावी, स्पर्धा परिक्षेत महिलांना क्रिमीलीअरची जाचक अट रद्द करावी आणि देशामध्ये १६०० ओबीसी विद्यार्थी आयएएस झाले परंतू नानक्रिमीलिअरच्या अटीमुळे या प्रक्रियेतून त्यांना बाद ठरवले गेले त्यांना पुन्हा संधी दयावी आदि प्रमुख मागण्या ओबीसी सेलच्या असल्याकडे बाळबुधे यांनी लक्ष वेधले. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास शिळफाटा मार्गे कल्याण ग्रामीण भागात निघालेली ही अभियान रॅली पुढे मानपाडा, गोळवली, कल्याण पुर्वेकडील सूचक नाका, चककी नाका, तिसगांवचौक, काटेमानिवली, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक, वालधुनी उड्डाणपुला मार्गे कल्याण पश्चिमेकडील सुभाष चौक, पौर्णिमा चौक, बिर्ला महाविद्यालय, खडकपाडा चौक, आधारवाडी चौक, लालचौकी, पारनाका, टिळकचौक, महापालिका मुख्यालय, शिवाजीचौक, बाजारपेठ मार्गे नेहरू चौक यानंतर महात्मा फुले चौक मार्गे उल्हासनगरकडे या रॅलीचे प्रस्थान झाले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली