शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

रजिस्टार कार्यालयात कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन; दस्त नोंदणीचे हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 14:14 IST

सदनशीर मार्गाने या आधी आंदोलने, धरणे धरुनही शासनाने या कर्मचारी ,अधिकाऱ्यांच्या मागण्या विचारात घेतल्या नाही.

ठाणे : येथील नोंदणी व मुद्रांक कार्यालयाच्या (रजिस्टार) कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे.यामुळे विविध प्रकारचे महत्वपूर्ण दस्त नोंदणीसह विवाह रजिस्ट्रेशन,  प्रमाणपत्र आदीसाठी आलेल्यांचे हाल होत आहे. अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेले आंदोलन राज्य भरातील रजिस्टर कार्यालयात सुरु असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

सदनशीर मार्गाने या आधी आंदोलने, धरणे धरुनही शासनाने या कर्मचारी ,अधिकाऱ्यांच्या मागण्या विचारात घेतल्या नाही. यामुळे संतापलेल्या या कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद आंदोलन छेडले. ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण रजिस्टर कार्यालयां तील कामकाज बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये मनस्ताप व्यक्त होत आहे. कोरोनाच्या या महामारीत, ऐन पावसात रजिस्टर कार्यालय गाठलेल्या या नागरिकांना लेखणी बंद आंदोलना ला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. येथील गडकरी रंगायतनजवळ असलेल्या या कार्यालयातील कर्मचारी उपस्थित असून ते लेखणी बंद आंदोलनात सहभागी असल्यामुळे काम करीत नाही.

बदलापूर, उल्हासनगर, कल्याण आदी ठिकाणच्या कार्यालयातील ही खरेदी, विक्रीच्या दस्त ऐवजांची नोंदणी बंद आहे. याप्रमाणेच मुंबई शहर जिल्हा 100% सहभागी असून पालघर जिल्ह्याचा लेखणीबंद आंदोलनात १००℅ सहभाग आहे. पुणे ग्रामीण बंद आहे. उस्मानाबाद, नागपूर, गडचिरोली, नांदेड,  नागपूर विभाग, हिंगोली जिल्हा, रायगड जिल्हा, अहमदनगर जिल्हा येथेही लेखणी बंद आहे.  

दुय्यम निबंधक नेवासा येथे नजरचुकीने कालचा दस्त आज नोंदणी केल्याचे या आंदोलकांनी निदर्शनात आणून दिले.  तर आज एकही नवीन दस्त नोंदणी नाही. कोल्हापूर जिल्ह्यात एका ही दस्तऐवजाची नोंदणी झालेली नाही,  शंभर टक्के सहभागी, लातूर जिल्हा, लातूर विभाग, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वाशिम जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी लेखनीबंद आंदोलनात सहभागी असल्याचे येथील नोंदणी व मुद्रांक कार्यालय अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे ठाणे शहरी- ग्रामीण अध्यक्ष विजय चव्हाण, सचिव प्रविण गिरी यांनी सांगितले.  या लेखणी बंद आंदोलनाची दखल राज्य शासनाने वेळीच घेणे आवश्यक आहे.

अन्यथा  4 आँगस्टपासून बेमुदत संपाचा आंदोलकांनी दिला आहे. तत्पूर्वी त्यांनी मंगळवारी हा एक दिवशीय लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. या काम बंद आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी सर्व संवर्गाच्या रखडलेल्या पदोन्न त्या तत्काळ कराव्यात याव्या या प्रमुख मागणीसह अन्य ही मागण्या लाऊन धरल्या आहेत. या आंदोलकांनी प्रमुख मागण्यामध्ये मुंबई विभागातील मुद्रांक जिल्हाधिकारी पदे विभागातून पदोन्नतीने भरावी, कोरोनामुळे दगावलेल्यांच्या परिवारास 50 लाखांची मदत तत्काळ देऊन परिवारातील एकास नोकरीला घ्यावे.

सर्व कर्मचाऱ्यां ना 50 लाखांचा विमा कवच लागू करा. पीएमएची रक्कम कार्यालय व जनतेच्या सुविधेसाठी वापरण्यात यावी. रेरा अंतर्गत झालेल्या कारवायांना मागे घेण्यात यावे, सह दुय्यम निबंधक वर्ग 2 व दुय्यम निबंधक श्रेणी 1 या पदांचे एकत्रीकरण करा. हार्डवेअर चे साहित्य उच्च दर्जाचे द्या आदी मागण्यासाठी या कर्मचाऱ्यांकडून लेखणी बंद,  काम बंद आंदोलन अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली छेडण्यात येत आहे. 

टॅग्स :thaneठाणे