शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

रजिस्टार कार्यालयात कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन; दस्त नोंदणीचे हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 14:14 IST

सदनशीर मार्गाने या आधी आंदोलने, धरणे धरुनही शासनाने या कर्मचारी ,अधिकाऱ्यांच्या मागण्या विचारात घेतल्या नाही.

ठाणे : येथील नोंदणी व मुद्रांक कार्यालयाच्या (रजिस्टार) कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे.यामुळे विविध प्रकारचे महत्वपूर्ण दस्त नोंदणीसह विवाह रजिस्ट्रेशन,  प्रमाणपत्र आदीसाठी आलेल्यांचे हाल होत आहे. अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेले आंदोलन राज्य भरातील रजिस्टर कार्यालयात सुरु असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

सदनशीर मार्गाने या आधी आंदोलने, धरणे धरुनही शासनाने या कर्मचारी ,अधिकाऱ्यांच्या मागण्या विचारात घेतल्या नाही. यामुळे संतापलेल्या या कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद आंदोलन छेडले. ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण रजिस्टर कार्यालयां तील कामकाज बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये मनस्ताप व्यक्त होत आहे. कोरोनाच्या या महामारीत, ऐन पावसात रजिस्टर कार्यालय गाठलेल्या या नागरिकांना लेखणी बंद आंदोलना ला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. येथील गडकरी रंगायतनजवळ असलेल्या या कार्यालयातील कर्मचारी उपस्थित असून ते लेखणी बंद आंदोलनात सहभागी असल्यामुळे काम करीत नाही.

बदलापूर, उल्हासनगर, कल्याण आदी ठिकाणच्या कार्यालयातील ही खरेदी, विक्रीच्या दस्त ऐवजांची नोंदणी बंद आहे. याप्रमाणेच मुंबई शहर जिल्हा 100% सहभागी असून पालघर जिल्ह्याचा लेखणीबंद आंदोलनात १००℅ सहभाग आहे. पुणे ग्रामीण बंद आहे. उस्मानाबाद, नागपूर, गडचिरोली, नांदेड,  नागपूर विभाग, हिंगोली जिल्हा, रायगड जिल्हा, अहमदनगर जिल्हा येथेही लेखणी बंद आहे.  

दुय्यम निबंधक नेवासा येथे नजरचुकीने कालचा दस्त आज नोंदणी केल्याचे या आंदोलकांनी निदर्शनात आणून दिले.  तर आज एकही नवीन दस्त नोंदणी नाही. कोल्हापूर जिल्ह्यात एका ही दस्तऐवजाची नोंदणी झालेली नाही,  शंभर टक्के सहभागी, लातूर जिल्हा, लातूर विभाग, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वाशिम जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी लेखनीबंद आंदोलनात सहभागी असल्याचे येथील नोंदणी व मुद्रांक कार्यालय अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे ठाणे शहरी- ग्रामीण अध्यक्ष विजय चव्हाण, सचिव प्रविण गिरी यांनी सांगितले.  या लेखणी बंद आंदोलनाची दखल राज्य शासनाने वेळीच घेणे आवश्यक आहे.

अन्यथा  4 आँगस्टपासून बेमुदत संपाचा आंदोलकांनी दिला आहे. तत्पूर्वी त्यांनी मंगळवारी हा एक दिवशीय लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. या काम बंद आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी सर्व संवर्गाच्या रखडलेल्या पदोन्न त्या तत्काळ कराव्यात याव्या या प्रमुख मागणीसह अन्य ही मागण्या लाऊन धरल्या आहेत. या आंदोलकांनी प्रमुख मागण्यामध्ये मुंबई विभागातील मुद्रांक जिल्हाधिकारी पदे विभागातून पदोन्नतीने भरावी, कोरोनामुळे दगावलेल्यांच्या परिवारास 50 लाखांची मदत तत्काळ देऊन परिवारातील एकास नोकरीला घ्यावे.

सर्व कर्मचाऱ्यां ना 50 लाखांचा विमा कवच लागू करा. पीएमएची रक्कम कार्यालय व जनतेच्या सुविधेसाठी वापरण्यात यावी. रेरा अंतर्गत झालेल्या कारवायांना मागे घेण्यात यावे, सह दुय्यम निबंधक वर्ग 2 व दुय्यम निबंधक श्रेणी 1 या पदांचे एकत्रीकरण करा. हार्डवेअर चे साहित्य उच्च दर्जाचे द्या आदी मागण्यासाठी या कर्मचाऱ्यांकडून लेखणी बंद,  काम बंद आंदोलन अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली छेडण्यात येत आहे. 

टॅग्स :thaneठाणे