शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

रजिस्टार कार्यालयात कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन; दस्त नोंदणीचे हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 14:14 IST

सदनशीर मार्गाने या आधी आंदोलने, धरणे धरुनही शासनाने या कर्मचारी ,अधिकाऱ्यांच्या मागण्या विचारात घेतल्या नाही.

ठाणे : येथील नोंदणी व मुद्रांक कार्यालयाच्या (रजिस्टार) कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे.यामुळे विविध प्रकारचे महत्वपूर्ण दस्त नोंदणीसह विवाह रजिस्ट्रेशन,  प्रमाणपत्र आदीसाठी आलेल्यांचे हाल होत आहे. अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेले आंदोलन राज्य भरातील रजिस्टर कार्यालयात सुरु असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

सदनशीर मार्गाने या आधी आंदोलने, धरणे धरुनही शासनाने या कर्मचारी ,अधिकाऱ्यांच्या मागण्या विचारात घेतल्या नाही. यामुळे संतापलेल्या या कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद आंदोलन छेडले. ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण रजिस्टर कार्यालयां तील कामकाज बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये मनस्ताप व्यक्त होत आहे. कोरोनाच्या या महामारीत, ऐन पावसात रजिस्टर कार्यालय गाठलेल्या या नागरिकांना लेखणी बंद आंदोलना ला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. येथील गडकरी रंगायतनजवळ असलेल्या या कार्यालयातील कर्मचारी उपस्थित असून ते लेखणी बंद आंदोलनात सहभागी असल्यामुळे काम करीत नाही.

बदलापूर, उल्हासनगर, कल्याण आदी ठिकाणच्या कार्यालयातील ही खरेदी, विक्रीच्या दस्त ऐवजांची नोंदणी बंद आहे. याप्रमाणेच मुंबई शहर जिल्हा 100% सहभागी असून पालघर जिल्ह्याचा लेखणीबंद आंदोलनात १००℅ सहभाग आहे. पुणे ग्रामीण बंद आहे. उस्मानाबाद, नागपूर, गडचिरोली, नांदेड,  नागपूर विभाग, हिंगोली जिल्हा, रायगड जिल्हा, अहमदनगर जिल्हा येथेही लेखणी बंद आहे.  

दुय्यम निबंधक नेवासा येथे नजरचुकीने कालचा दस्त आज नोंदणी केल्याचे या आंदोलकांनी निदर्शनात आणून दिले.  तर आज एकही नवीन दस्त नोंदणी नाही. कोल्हापूर जिल्ह्यात एका ही दस्तऐवजाची नोंदणी झालेली नाही,  शंभर टक्के सहभागी, लातूर जिल्हा, लातूर विभाग, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वाशिम जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी लेखनीबंद आंदोलनात सहभागी असल्याचे येथील नोंदणी व मुद्रांक कार्यालय अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे ठाणे शहरी- ग्रामीण अध्यक्ष विजय चव्हाण, सचिव प्रविण गिरी यांनी सांगितले.  या लेखणी बंद आंदोलनाची दखल राज्य शासनाने वेळीच घेणे आवश्यक आहे.

अन्यथा  4 आँगस्टपासून बेमुदत संपाचा आंदोलकांनी दिला आहे. तत्पूर्वी त्यांनी मंगळवारी हा एक दिवशीय लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. या काम बंद आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी सर्व संवर्गाच्या रखडलेल्या पदोन्न त्या तत्काळ कराव्यात याव्या या प्रमुख मागणीसह अन्य ही मागण्या लाऊन धरल्या आहेत. या आंदोलकांनी प्रमुख मागण्यामध्ये मुंबई विभागातील मुद्रांक जिल्हाधिकारी पदे विभागातून पदोन्नतीने भरावी, कोरोनामुळे दगावलेल्यांच्या परिवारास 50 लाखांची मदत तत्काळ देऊन परिवारातील एकास नोकरीला घ्यावे.

सर्व कर्मचाऱ्यां ना 50 लाखांचा विमा कवच लागू करा. पीएमएची रक्कम कार्यालय व जनतेच्या सुविधेसाठी वापरण्यात यावी. रेरा अंतर्गत झालेल्या कारवायांना मागे घेण्यात यावे, सह दुय्यम निबंधक वर्ग 2 व दुय्यम निबंधक श्रेणी 1 या पदांचे एकत्रीकरण करा. हार्डवेअर चे साहित्य उच्च दर्जाचे द्या आदी मागण्यासाठी या कर्मचाऱ्यांकडून लेखणी बंद,  काम बंद आंदोलन अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली छेडण्यात येत आहे. 

टॅग्स :thaneठाणे