शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

अग्निशमन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: June 2, 2017 05:21 IST

प्रलंबित मागण्यांसंदर्भात वारंवार लक्ष वेधूनही सापत्न वागणूक मिळत असल्याच्या निषेधार्थ केडीएमसीतील अग्निशमन दलातील

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : प्रलंबित मागण्यांसंदर्भात वारंवार लक्ष वेधूनही सापत्न वागणूक मिळत असल्याच्या निषेधार्थ केडीएमसीतील अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काळ्या फिती लावून काम सुरू केले आहे. त्यांचे हे आंदोलन १५ जूनपर्यंत चालणार आहे. त्याची दखल न घेतल्यास २६ जूनला सामूहिक रजा आंदोलनाचा छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. विविध मागण्यांसंदर्भात आतापर्यंत वारंवार महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. संघटनेच्या माध्यमातूनही बैठका झाल्या आहेत. मात्र, मागण्या मान्य झालेल्या नाहीत. परिणामी, कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अग्निशमन दलाचे काम जिकिरीचे असते. परंतु, या कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप संघटनेचे केडीएमसी युनिट अध्यक्ष व माजी सभागृहनेते कैलास शिंदे यांनी केला आहे. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काळ्या फिती लावून कर्मचारी काम करतील. त्यानंतरही त्याची दखल न घेतल्यास २६ जूनला सामूहिक रजा आंदोलन केले जाईल, असे शिंदे म्हणाले.अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे त्यांना स्वत:च्या जीवावर उदार होऊन सेवा बजावावी लागते. महापौर राजेंद्र देवळेकर आणि तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांच्याप्रमुख उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सहा महिन्यांपूर्वी झाली होती. यात कर्मचाऱ्यांना धोकाभत्ता, नवीन भरती, जादा कामाचा मोबदला, सुटीच्या दिवशी जादा काम केल्याचा मोबदला आदी मागण्या तसेच समस्यांवर चर्चा झाली होती. मात्र, प्रशासनाने अजूनही त्याची कार्यवाही केलेली नाही, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशीदेखील नुकतीच चर्चा करून प्रशासनाच्या नकारात्मक धोरणाचा निषेध म्हणून संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. संघटनेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावल्याचे चित्र डोंबिवली एमआयडीसी, कल्याण आधारवाडी, ‘ड’ आणि ‘ह’ प्रभाग कार्यालये, अशा चारही केंद्रांवर पाहायला मिळाले. हे आंदोलन यापुढेही सुरू राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. प्रशासनाचे पत्र : अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांसंदर्भात योग्य कार्यवाही सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन मागे घ्यावे, असे पत्र महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने संघटनेचे युनिट अध्यक्ष शिंदे यांना गुरुवारी पाठवले. मात्र, वारंवार बैठका घेऊनही प्रशासनाला जाग येत नसेल,तर आंदोलन सुरू ठेवण्यावाचून पर्याय नाही, अशी प्रतिक्रि या शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली. आताही दखल न घेतल्यास यापुढचे आंदोलन अधिक तीव्र असेल, असेही ते म्हणाले. नागरिकांना वेठीला धरणार नाहीकर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन छेडले असले, तरी नागरिकांना वेठीला धरले जाणार नाही. नागरिकांच्या मदतीचे, आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी आलेले कॉल स्वीकारले जातील.प्रशासनाने आमच्या समस्यांची गंभीरपणे दखल घ्यावी आणि पुढील सामूहिक रजा आंदोलन कसे टळेल, याबाबत खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.