शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

अग्निशमन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: June 2, 2017 05:21 IST

प्रलंबित मागण्यांसंदर्भात वारंवार लक्ष वेधूनही सापत्न वागणूक मिळत असल्याच्या निषेधार्थ केडीएमसीतील अग्निशमन दलातील

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : प्रलंबित मागण्यांसंदर्भात वारंवार लक्ष वेधूनही सापत्न वागणूक मिळत असल्याच्या निषेधार्थ केडीएमसीतील अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काळ्या फिती लावून काम सुरू केले आहे. त्यांचे हे आंदोलन १५ जूनपर्यंत चालणार आहे. त्याची दखल न घेतल्यास २६ जूनला सामूहिक रजा आंदोलनाचा छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. विविध मागण्यांसंदर्भात आतापर्यंत वारंवार महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. संघटनेच्या माध्यमातूनही बैठका झाल्या आहेत. मात्र, मागण्या मान्य झालेल्या नाहीत. परिणामी, कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अग्निशमन दलाचे काम जिकिरीचे असते. परंतु, या कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप संघटनेचे केडीएमसी युनिट अध्यक्ष व माजी सभागृहनेते कैलास शिंदे यांनी केला आहे. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काळ्या फिती लावून कर्मचारी काम करतील. त्यानंतरही त्याची दखल न घेतल्यास २६ जूनला सामूहिक रजा आंदोलन केले जाईल, असे शिंदे म्हणाले.अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे त्यांना स्वत:च्या जीवावर उदार होऊन सेवा बजावावी लागते. महापौर राजेंद्र देवळेकर आणि तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांच्याप्रमुख उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सहा महिन्यांपूर्वी झाली होती. यात कर्मचाऱ्यांना धोकाभत्ता, नवीन भरती, जादा कामाचा मोबदला, सुटीच्या दिवशी जादा काम केल्याचा मोबदला आदी मागण्या तसेच समस्यांवर चर्चा झाली होती. मात्र, प्रशासनाने अजूनही त्याची कार्यवाही केलेली नाही, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशीदेखील नुकतीच चर्चा करून प्रशासनाच्या नकारात्मक धोरणाचा निषेध म्हणून संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. संघटनेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावल्याचे चित्र डोंबिवली एमआयडीसी, कल्याण आधारवाडी, ‘ड’ आणि ‘ह’ प्रभाग कार्यालये, अशा चारही केंद्रांवर पाहायला मिळाले. हे आंदोलन यापुढेही सुरू राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. प्रशासनाचे पत्र : अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांसंदर्भात योग्य कार्यवाही सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन मागे घ्यावे, असे पत्र महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने संघटनेचे युनिट अध्यक्ष शिंदे यांना गुरुवारी पाठवले. मात्र, वारंवार बैठका घेऊनही प्रशासनाला जाग येत नसेल,तर आंदोलन सुरू ठेवण्यावाचून पर्याय नाही, अशी प्रतिक्रि या शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली. आताही दखल न घेतल्यास यापुढचे आंदोलन अधिक तीव्र असेल, असेही ते म्हणाले. नागरिकांना वेठीला धरणार नाहीकर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन छेडले असले, तरी नागरिकांना वेठीला धरले जाणार नाही. नागरिकांच्या मदतीचे, आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी आलेले कॉल स्वीकारले जातील.प्रशासनाने आमच्या समस्यांची गंभीरपणे दखल घ्यावी आणि पुढील सामूहिक रजा आंदोलन कसे टळेल, याबाबत खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.