शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

आगरी महोत्सव समाजाभिमुख नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:28 IST

काळू कोमास्कर यांचा आरोप : हिशेबही दिला नाही, आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह

कल्याण : आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीतील क्रीडासंकुलात १५ वर्षांपासून आगरी महोत्सव भरवण्यात येत आहे. मात्र, हा महोत्सव समाजाभिमुख नाही. या महोत्सवाच्या नावाखाली गोळा करण्यात येणाऱ्या पैशांचा हिशेबही दिला जात नाही, असा मुद्दा आगरी समाजाचे व डोंबिवली लालबावटा रिक्षा युनियनचे प्रमुख काळू कोमास्कर यांनी उपस्थित केला आहे. कोमास्कर यांनी याविषयी मंगळवार, २७ नोव्हेंबरला समाजबांधवांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, या आरोपामुळे आगरी महोत्सवाच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

घरगुती उत्पादनांना बाजारपेठ, समाज-संस्कृतीचे संवर्धन, वैचारिक व्यासपीठ देणे, या उद्देशाने आगरी युथ फोरमने आगरी महोत्सवाला सुरुवात केली. महोत्सवासाठी विशेषत: त्यात सहभागी होणाºया व्यावसायिक स्टॉल्सकडून भाडे आकारले जाते. परंतु, महोत्सवासाठी समाजाने दिलेल्या निधीचा उपयोग हा समाजासाठीच झाला पाहिजे. हा पैसा आयोजन संस्थेचा नसून तो समाजाचा आहे. या निधीचा १५ वर्षांत हिशेब दिला गेलेला नाही, असा मुद्दा कोमास्कर यांनी उपस्थित केला आहे.

आगरी महोत्सव समाजाभिमुख असायला हवा. एखादी व्यक्ती अथवा संस्थेचा नसावा, याकडे कोमास्कर यांनी लक्ष वेधले आहे. आगरी समाजाचे नाव घेऊन एखादी व्यक्ती आपले स्वत:चे नाव मोठे करत असेल तसेच एखादी संस्था हा महोत्सव स्वत:ची मक्तेदारी समजत असेल, तर त्याला समाजाचा विरोध आहे, असे सांगून कोमास्कर यांनी आगरी युथ फोरम व त्याचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यावर निशाणा साधला आहे. महोत्सवाच्या समितीत समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जात नाही. वेगवेगळ्या तालुक्यांतील आगरी समाजबांधवांना सामावून घेतले जात नाही, असे मुद्देही कोमास्कर यांनी मांडले आहेत.

दरम्यान, या सर्व मुद्यांवर विचारविनिमय करण्यासाठी निळजे येथील ज्येष्ठ नागरिक भवनात २७ नोव्हेंबरला सायंकाळी ५ ते ७ दरम्यान बैठक होणार आहे. यावेळी माजी आमदार, मनसेचे नेते, केडीएमसीचे नगरसेवक, युवा मोर्चासह विविध गावांतील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. या सगळ्यांची त्यांना कल्पना देऊनच ही बैठक बोलावल्याचे कोमास्कर म्हणाले.

महोत्सवाचे होते लेखापरीक्षण - वझेआगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे म्हणाले, ‘आगरी युथ फोरमतर्फे भरवल्या जाणाºया आगरी महोत्सवाच्या जमाखर्चाचे लेखापरीक्षण केले जाते. त्यात, लपवाछपवी होत नाही. एका भाजपा नेत्याच्या पुढाकाराने महोत्सव भरवला जातो. त्याची समाजकार्यास मदत होत आहे. हीच पोटदुखी कोमास्कर यांना आहे. महोत्सव समाजाभिमुख नसल्याचा त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. पंधरा दिवसांपूर्वीच महोत्सव भरवण्यासाठी बैठक घेऊन विविध समाजांतील मान्यवरांच्या सूचना विचारात घेतल्या आहेत. दरवर्षी अशी बैठक घेतली जाते. चांगले व यशस्वी आयोजन हेच विरोधकांच्या डोळ्यांत खुपत असल्याने त्यांनी विविध निराधार मुद्दे उपस्थित करून आयोजनावर बोट ठेवले आहे. हे चुकीचे आहे.’