शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

आगरी महोत्सव समाजाभिमुख नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:28 IST

काळू कोमास्कर यांचा आरोप : हिशेबही दिला नाही, आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह

कल्याण : आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीतील क्रीडासंकुलात १५ वर्षांपासून आगरी महोत्सव भरवण्यात येत आहे. मात्र, हा महोत्सव समाजाभिमुख नाही. या महोत्सवाच्या नावाखाली गोळा करण्यात येणाऱ्या पैशांचा हिशेबही दिला जात नाही, असा मुद्दा आगरी समाजाचे व डोंबिवली लालबावटा रिक्षा युनियनचे प्रमुख काळू कोमास्कर यांनी उपस्थित केला आहे. कोमास्कर यांनी याविषयी मंगळवार, २७ नोव्हेंबरला समाजबांधवांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, या आरोपामुळे आगरी महोत्सवाच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

घरगुती उत्पादनांना बाजारपेठ, समाज-संस्कृतीचे संवर्धन, वैचारिक व्यासपीठ देणे, या उद्देशाने आगरी युथ फोरमने आगरी महोत्सवाला सुरुवात केली. महोत्सवासाठी विशेषत: त्यात सहभागी होणाºया व्यावसायिक स्टॉल्सकडून भाडे आकारले जाते. परंतु, महोत्सवासाठी समाजाने दिलेल्या निधीचा उपयोग हा समाजासाठीच झाला पाहिजे. हा पैसा आयोजन संस्थेचा नसून तो समाजाचा आहे. या निधीचा १५ वर्षांत हिशेब दिला गेलेला नाही, असा मुद्दा कोमास्कर यांनी उपस्थित केला आहे.

आगरी महोत्सव समाजाभिमुख असायला हवा. एखादी व्यक्ती अथवा संस्थेचा नसावा, याकडे कोमास्कर यांनी लक्ष वेधले आहे. आगरी समाजाचे नाव घेऊन एखादी व्यक्ती आपले स्वत:चे नाव मोठे करत असेल तसेच एखादी संस्था हा महोत्सव स्वत:ची मक्तेदारी समजत असेल, तर त्याला समाजाचा विरोध आहे, असे सांगून कोमास्कर यांनी आगरी युथ फोरम व त्याचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यावर निशाणा साधला आहे. महोत्सवाच्या समितीत समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जात नाही. वेगवेगळ्या तालुक्यांतील आगरी समाजबांधवांना सामावून घेतले जात नाही, असे मुद्देही कोमास्कर यांनी मांडले आहेत.

दरम्यान, या सर्व मुद्यांवर विचारविनिमय करण्यासाठी निळजे येथील ज्येष्ठ नागरिक भवनात २७ नोव्हेंबरला सायंकाळी ५ ते ७ दरम्यान बैठक होणार आहे. यावेळी माजी आमदार, मनसेचे नेते, केडीएमसीचे नगरसेवक, युवा मोर्चासह विविध गावांतील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. या सगळ्यांची त्यांना कल्पना देऊनच ही बैठक बोलावल्याचे कोमास्कर म्हणाले.

महोत्सवाचे होते लेखापरीक्षण - वझेआगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे म्हणाले, ‘आगरी युथ फोरमतर्फे भरवल्या जाणाºया आगरी महोत्सवाच्या जमाखर्चाचे लेखापरीक्षण केले जाते. त्यात, लपवाछपवी होत नाही. एका भाजपा नेत्याच्या पुढाकाराने महोत्सव भरवला जातो. त्याची समाजकार्यास मदत होत आहे. हीच पोटदुखी कोमास्कर यांना आहे. महोत्सव समाजाभिमुख नसल्याचा त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. पंधरा दिवसांपूर्वीच महोत्सव भरवण्यासाठी बैठक घेऊन विविध समाजांतील मान्यवरांच्या सूचना विचारात घेतल्या आहेत. दरवर्षी अशी बैठक घेतली जाते. चांगले व यशस्वी आयोजन हेच विरोधकांच्या डोळ्यांत खुपत असल्याने त्यांनी विविध निराधार मुद्दे उपस्थित करून आयोजनावर बोट ठेवले आहे. हे चुकीचे आहे.’