शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

आगरी महोत्सव समाजाभिमुख नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:28 IST

काळू कोमास्कर यांचा आरोप : हिशेबही दिला नाही, आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह

कल्याण : आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीतील क्रीडासंकुलात १५ वर्षांपासून आगरी महोत्सव भरवण्यात येत आहे. मात्र, हा महोत्सव समाजाभिमुख नाही. या महोत्सवाच्या नावाखाली गोळा करण्यात येणाऱ्या पैशांचा हिशेबही दिला जात नाही, असा मुद्दा आगरी समाजाचे व डोंबिवली लालबावटा रिक्षा युनियनचे प्रमुख काळू कोमास्कर यांनी उपस्थित केला आहे. कोमास्कर यांनी याविषयी मंगळवार, २७ नोव्हेंबरला समाजबांधवांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, या आरोपामुळे आगरी महोत्सवाच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

घरगुती उत्पादनांना बाजारपेठ, समाज-संस्कृतीचे संवर्धन, वैचारिक व्यासपीठ देणे, या उद्देशाने आगरी युथ फोरमने आगरी महोत्सवाला सुरुवात केली. महोत्सवासाठी विशेषत: त्यात सहभागी होणाºया व्यावसायिक स्टॉल्सकडून भाडे आकारले जाते. परंतु, महोत्सवासाठी समाजाने दिलेल्या निधीचा उपयोग हा समाजासाठीच झाला पाहिजे. हा पैसा आयोजन संस्थेचा नसून तो समाजाचा आहे. या निधीचा १५ वर्षांत हिशेब दिला गेलेला नाही, असा मुद्दा कोमास्कर यांनी उपस्थित केला आहे.

आगरी महोत्सव समाजाभिमुख असायला हवा. एखादी व्यक्ती अथवा संस्थेचा नसावा, याकडे कोमास्कर यांनी लक्ष वेधले आहे. आगरी समाजाचे नाव घेऊन एखादी व्यक्ती आपले स्वत:चे नाव मोठे करत असेल तसेच एखादी संस्था हा महोत्सव स्वत:ची मक्तेदारी समजत असेल, तर त्याला समाजाचा विरोध आहे, असे सांगून कोमास्कर यांनी आगरी युथ फोरम व त्याचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यावर निशाणा साधला आहे. महोत्सवाच्या समितीत समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जात नाही. वेगवेगळ्या तालुक्यांतील आगरी समाजबांधवांना सामावून घेतले जात नाही, असे मुद्देही कोमास्कर यांनी मांडले आहेत.

दरम्यान, या सर्व मुद्यांवर विचारविनिमय करण्यासाठी निळजे येथील ज्येष्ठ नागरिक भवनात २७ नोव्हेंबरला सायंकाळी ५ ते ७ दरम्यान बैठक होणार आहे. यावेळी माजी आमदार, मनसेचे नेते, केडीएमसीचे नगरसेवक, युवा मोर्चासह विविध गावांतील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. या सगळ्यांची त्यांना कल्पना देऊनच ही बैठक बोलावल्याचे कोमास्कर म्हणाले.

महोत्सवाचे होते लेखापरीक्षण - वझेआगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे म्हणाले, ‘आगरी युथ फोरमतर्फे भरवल्या जाणाºया आगरी महोत्सवाच्या जमाखर्चाचे लेखापरीक्षण केले जाते. त्यात, लपवाछपवी होत नाही. एका भाजपा नेत्याच्या पुढाकाराने महोत्सव भरवला जातो. त्याची समाजकार्यास मदत होत आहे. हीच पोटदुखी कोमास्कर यांना आहे. महोत्सव समाजाभिमुख नसल्याचा त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. पंधरा दिवसांपूर्वीच महोत्सव भरवण्यासाठी बैठक घेऊन विविध समाजांतील मान्यवरांच्या सूचना विचारात घेतल्या आहेत. दरवर्षी अशी बैठक घेतली जाते. चांगले व यशस्वी आयोजन हेच विरोधकांच्या डोळ्यांत खुपत असल्याने त्यांनी विविध निराधार मुद्दे उपस्थित करून आयोजनावर बोट ठेवले आहे. हे चुकीचे आहे.’