शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अवमान याचिकेच्या बाताच!, फेरीवालाविरोधी पथक, ‘मनसे’ही थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 04:00 IST

उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. केडीएमसी हद्दीतील अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांवर इतरत्र कारवाई सुरू असताना डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात मात्र फेरीवाल्यांची मुजोरी कायम आहे.

- प्रशांत माने डोंबिवली : उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. केडीएमसी हद्दीतील अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांवर इतरत्र कारवाई सुरू असताना डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात मात्र फेरीवाल्यांची मुजोरी कायम आहे. यात महापालिकेच्या पथकांसह फेरीवाला हटवण्यासाठी आग्रही असलेली मनसेही थंड पडल्याचे चित्र आहे. केडीएमसीविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची मनसेची घोषणा अद्यापही कागदोपत्रीच राहिली आहे. त्यामुळे ठोस कृतीअभावी अवमान याचिकेची मनसेची वल्गना केवळ ‘बाता’ च ठरली आहे.महापालिका पर्यायी जागा देत नाही, तोपर्यंत स्थानक परिसरातच व्यवसाय करणार, असा पवित्रा फेरीवाल्यांनी घेतला आहे. इतर ठिकाणी फेरीवाला हटाव कारवाई जोमाने सुरू असताना डोंबिवली पूर्वेकडील भागात फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम आहे. ते हटविण्यात स्थानिक प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटविण्यात हयगय करणाºया नऊ कर्मचाºयांना आयुक्त पी. वेलरासू यांनी निलंबित केले होते. वेलरासू यांनी डोंबिवलीतही फेरफटका मारून वास्तव पहावे, अशी मागणी होत आहे.फेरीवाल्यांची मुजोरी इतकी वाढली आहे, की पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी हुज्जत आणि त्यांना धक्काबुक्की करण्याचे प्रताप फेरीवाल्यांकडून वारंवार घडत आहेत. मात्र, फेरीवाला हटवण्याची कारवाई प्रभावीपणे होत नसल्याने मनसेने आयुक्त वेलरासू यांना अवमान नोटीस बजावली आहे. मनसेने डोंबिवली, ठाकुर्ली आणि कोपर रेल्वेस्थानक प्रबंधकांनाही सूचना पत्र देऊन यापुढे जर फेरीवाले हटवले नाहीत अथवा तुमच्या कामात हयगय केल्याचे आढळल्यास आपणावर अवमान याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही दिला आहे. परंतु, अवमान याचिकेची नोटीस देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने केडीएमसीविरोधात आठवडाभरात अवमान याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याचे भाष्य मनसेचे महापालिकेतील विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनी जानेवारीत केले होते. आमच्याकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवक रच याचिका दाखल केली जाईल, असेही ते म्हणाले होते. परंतु, अद्यापही याला मुहूर्त मिळालेला नाही. याबाबतची अधिक माहिती घेता कायदेशीर प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती मिळत आहे.एकीकडे रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाला अतिक्रमणाचे चित्र दिवसागणिक बकाल होत असताना दुसरीकडे मनसेच्या थंड पवित्र्याबाबतच शंका उपस्थित होत आहे. ‘डोंबिवली हे घाणेरडे शहर आहे,’ असे वक्तव्य नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. याबाबत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपावर तोंडसुख घेण्यात विरोधीपक्ष मनसेने कुठलीही कसर ठेवली नसताना फेरीवाला अतिक्रमणावर अवमान याचिका दाखल करण्याबाबत इतकी उदासीनता का?, असा सवाल केला जात आहे. याप्रकरणात मनसेच्या ज्येष्ठ पदाधिकाºयांची बोटचेपी भूमिकाही तितकीच कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे.>लवकरच याचिकाया संदर्भात मनसे कल्याण जिल्हा चिटणीस प्रकाश माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फेरीवाला अतिक्रमणावर ठोस तोडगा निघण्याच्या दृष्टीने आम्ही काही कागदपत्रांची जमवाजमव करत आहोत. बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही बाबींची पूर्तता व्हायची आहे. ती देखील लवकरच पूर्ण होऊन येत्या चार ते आठ दिवसांत अवमान याचिका दाखल केली जाईल, असा दावा त्यांनी केला.