शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
5
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
6
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
7
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
8
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
9
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
10
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
11
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
12
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
13
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
14
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
15
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
16
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
17
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
18
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
19
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
20
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका

पुन्हा होरपळ, काहिली आणि तगमग

By admin | Updated: April 17, 2017 04:55 IST

राज्यातील उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसल्याने ठाणे जिल्ह्यातील तापमानानेही ४२ अंशांपर्यंत मजल मारली. वाऱ्यांचा वेग कमी असला

ठाणे : राज्यातील उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसल्याने ठाणे जिल्ह्यातील तापमानानेही ४२ अंशांपर्यंत मजल मारली. वाऱ्यांचा वेग कमी असला, तरी दुपारी उष्ण वारेही सोबतीला असल्याने काहिलीत भर पडली. ठाण्याचे तापमान ४१ अंशांवर तर ग्रामीण भागांचे तापमान ४२ अंशांवर पोचले होते. ठाणे जिल्ह्यात गेले दोन दिवस रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. ते सरासरी ३० ते ३१ अंशांदरम्यान गेल्याने रात्रीही या काहिलीतून दिलासा मिळत नाही. उत्तर भारतातून खास करून राजस्थानचे वाळवंट आणि कच्छच्या रणातून उष्ण वारे वाहात आहेत. त्यामुळे राज्यात उष्णतेची लाट आली आहे. ती अजून तीन दिवस तरी कायम राहण्याची शक्यता आहे. परिणामी ठाणे जिल्हाही तापला आहे. यंदा मार्च महिन्याची अखेर आणि एप्रिल महिन्यात किमान दोन वेळा तापमान ४२ अंशावर पोचले होते. त्याचीच पुनरावृत्ती दोन दिवस झाली. ठाणे, कल्याणमध्ये जरी पारा ४१ अंशांवर असला तरी डोंबिवली, बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूरमध्ये तो किमान एका अंशाने अधिक असल्याचे हवामानाच्या नोंदीवरून दिसून आले.या शहरांतील वृक्षतोड जशी याला कारणीभूत आहे, तसेच वाढते औद्योगिकरण आणि नागरीकरणही त्याला जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. तापमानाचा पारा वाढल्याचा तडाखा दुपारच्या प्रवासाला बसतो आहे, तसाच बाजारपेठांनाही बसतो आहे. तापमान जरी सकाळी ११.३० ते दुपारी २.३० या वेळेत अधिक असले तरी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत बहुतांश परिसरात रहदारी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)