शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

ठाण्यातील अभिनय कट्टयावर शिवजयंती निमित्त साकारला गेला अफजलखान वध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 16:28 IST

ठाण्यातील अभिनय कट्टयावर शिवजयंती निमित्त अफजलखान वध साकारला गेला. यावेळी मोठ्या संख्येने रसिक वर्ग उपस्थित होता. 

ठळक मुद्दे अभिनय कट्ट्याच्या  माध्यमातून कलात्मकरीत्या  महाराजांना मानाचा मुजरा कट्ट्याचे अध्यक्ष  दिग्दर्शक किरण नाकती यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पणजय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी दुमदुमला संपूर्ण परिसर

ठाणे : रविवारी सर्वत्र शिवजयंतीची साजरी होत असतानाच  अभिनय कट्ट्याच्या  माध्यमातून कलात्मकरीत्या  महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. विविध कलाकृतींच्या माध्यमातून कलाकारांनी छत्रपतींना अभिवादन करत संपूर्ण कट्टा परिसर हा छत्रपतींच्या विचारांनी तेजोमय झाला होता. 

    प्रथेप्रमाणे प्रार्थनेने कट्ट्याची सुरवात झाली आणि त्या नंतर प्रेक्षक प्रतिनिधी मुकुंद सुळे आणि माधवी सुळे या दांपत्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन पार पडले. कट्ट्याचे अध्यक्ष  दिग्दर्शक किरण नाकती यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करण्यात आला. पूढे एकपात्रीद्वारा सादरीकरणात्मक कार्यक्रमास सुरवात झाली.यामध्ये बालकलाकारांनी आपली अदाकारी दाखवत रसिकांच्या टाळ्या लुटल्या ज्या मध्ये आर्य माळवे याने मनातल्या मनात,पूर्वा तटकरे हिने पतंगाची काटाकाट, अद्वैत मापगावकर याने एका रात्रीत हिरो,प्रांजल धरला हिने डोके दुखी आमची आणि टीचर्सची  वैष्णवी चेउलकर हिने मी आणि दात या एकपात्री सादर केल्या. मोठ्या गटातील शुभांगी गजरे हिने पेश केलेली राजमाता जिजाऊ ही नाट्य छटा लक्षवेधी ठरली.तर सई कदम हिने अफजल खानच्या वधावर आधारित पोवाडा दमदाररित्या वठवत वातावरण भगवे केले.पुढे चिन्मय मौर्य याने क्लास एके क्लास,निमिष पिंपरकर याने ग्रामर चले जावं, अखिलेश जाधव याने पुस्तक जत्रेत एक व्हीझिट तर प्रथम नाईक याने विमानातील धम्माल या एकपात्रीच्या माध्यमातून बच्चे  कंपनी सुद्धा कमी नाही हे पटवून दिले.

   या नंतर कट्ट्याचे अध्यक्ष दिग्दर्शक किरण नाकती यांनी प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी महाराजांना एका शेतकऱ्याच्या मुलाने लिहिलेले पत्रवाचन केले, पत्राच्या माध्यमातून आज महाराजांचे विचार आचरण करण्याची किती गरज आहे, फक्त महाराजांच्या नावावर होत असलेलं राजकारण, मावळ्यांची एकनिष्ठता अशा अनेक गोष्टींचा रोखठोक उलगडा करत  महाराजांची शिवजयंती साजरी करण्यामागची भावना व्यक्त  केली . तसेच  नितीन बानगुडे पाटील रचित मला शिवाजी व्हायचंय ह्या वर आधारित सादरीकरणाच्या माध्यमातून कट्ट्याच्या कलाकारांनी जनमानसांत महाराजांप्रति असलेले स्थान अधोरेखित केले.एका  मुस्लिम मुलीची  (विणा छत्रे) अब्रू धोक्यात असताना ती आसरा म्हणून एका अशा हिंदू मुलाच्या (पियुष भोंडे) घराचा आधार घेते ज्या घरात महाराजांची तसबीर असते व आजही छत्रपतींचा केवळ फोटो बघून महिलांना सुरक्षित वाटतं, इतका मोठा राजा महाराष्ट्राला लाभला होता हे सांगण्याचा प्रयत्न  कट्ट्याच्या कलाकारांमार्फत करण्यात आला. सादरीकरनातील 'शिवाजी हे फक्त नाव नाही  तर शिवाजी हे सर्वोच्चतेंच प्रतीक आहे...' ह्या वाक्या नंतर जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी  संपूर्ण परिसर  दुमदुमला. अभिनय कट्ट्याच्या शिवजयंतीचे विशेष आकर्षण म्हणजे अफजलखान वध ही कलाकृती पार पडली. कदिर शेख दिग्दर्शित या सादरीकरणामध्ये अफजल खानच्या शिताफीचा डाव छत्रपतींनी आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने  त्याच्यावरच कसा  उलटवला ह्याचे हुबेहूब चित्रण सर्वच पात्रांनी ताकदीने  निभवले . महाराज आणि अफजल खान भेटीसाठी उभारलेला शामियाना, महाराजांची गळाभेट, अफजल खानाचा फसलेला कपटी डाव आणि त्त्यानंतर छत्रपतींनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा.. हे सर्व पाहून इतिहासाचीच पुनरावृत्ती होत असल्याचा भास उपस्थितांना झाला. आणि सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज कि जय हा एकच जयघोष घुमू लागला. हे सादरीकरण प्रभावी पणे वठवण्याची कामगिरी कदिर शेख (शिवाजी महाराज),सुरज परब (अफजल खान), वैभव जाधव (जिवाजी महाल) ,  कुंदन भोसले (सय्यद बंडा ) व इतर  सहाय्यक कलाकारांनी  केली. कार्यक्रमाअंती कट्ट्याच्या बालकलाकारांनी सुरज परब दिग्दर्शित आम्ही मावळे मावळे या गाण्यावर सामूहिक नृत्य सादर करत रसिकांच्या टाळ्या लुटल्या. सरते शेवटी उपस्थित मान्यवरांचे अध्यक्ष किरण नाकती यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन  आदरातिथ्य करण्यात आले व किरण नाकती यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांना शुभेच्छा देत शिवजयंतीच्या या अनोख्या कार्यक्रमाचा  समारोप केला. सदर कट्ट्याच्या निवेदनाची धुरा कट्ट्याचे कलाकार माधुरी कोळी यांनी पार पाडली

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई