शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रस्ता रुंदीकरणानंतर वाढीव बांधकाम केलेल्या वाणिज्य गाळेधराकांकडून रेडी रेक्नरनुसार भुईभाडे वसुल करणार ठाणे महापालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 15:11 IST

शासकीय जागेत वाढीव बांधकाम केल्याने आता ठाणे महापालिकेने रस्ता रुंदीकरणातील वाणिज्य गाळेधारकांना नोटीसा बजावण्याची मोहीम हाती घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार या गाळेधारकांकडून रेडीरेक्नर नुसार भाडे वसुल केले जाणार आहे.

ठळक मुद्देयेत्या दोन दिवसात नोटीसा बजावण्यास सुरवात१५० गाळेधारकांचा सर्व्हे झाला पूर्ण

ठाणे - ठाण्याच्या विविध भागात रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. विस्थापितांच्या विरोधाशिवाय ठाणे शहरात रस्ता रुंदीकरणाची मोहीम पार पडली. परंतु या रस्ता रुंदीकरणानंतर आता या रस्त्याच्या बाजूलाच अनेक वाणिज्य गाळेधारकांनी पालिकेची परवानगी न घेता, वाढीव बांधकाम केले आहे. त्यामुळे आता शासकीय जागेत वाढीव बांधकाम केल्याने आता त्यांच्याकडून रेडी रेक्नरनुसार भूईभाडे वसुल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार अशा वाणिज्य वापराच्या गाळेधारकांचा सर्व्हे पालिकेकडून सुरु झाला असून येत्या एक ते दोन दिवसात त्यांना नोटीसा बजावल्या जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.               ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्फत मागील काही महिन्यांपासून शहरातील विविध भागातील रस्त्यांचे रुंदीकरणाची मोहीम राबविली जात आहे. पोखरण रोड क्र मांक एकच्या रस्त्यावर तर अनेक व्यावसायीक गाळे आणि इमारतींवर कारवाई करून एवढा प्रशस्त रस्ता करताना कुठेही वाद उद्भवला नाही. या रस्त्या बरोबरच पोखरण २, तीन, सर्व्हीस रस्ते, ठाणे स्टेशन परिसरातील गजबजलेला मार्केट परिसर रस्ता, शास्त्री नगर, हत्तीपुल रस्ता, कळवा, मुंब्रा आदी भागातील रस्त्यांचे पालिकेने रुंदीकरण केले.                  एकूणच या सर्वच रुंदीकरणाच्या कारवाई करीत असतांना पालिकेला कोणत्याही प्रकारची अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली नाही. परंतु आता रस्ता रुंदीकरणानंतर काही वाणिज्य गाळेधराकांनी त्याच रस्त्यांमध्ये शिल्लक राहिलेल्या गाळ्यांवर वाढीव बांधकाम केले आहे. ते नियमाला धरुन नसल्याचे पालिकेचे म्हणने आहे. या व्यावसायिक गाळेधारकांकडून पालिका केवळ मालमत्ता कराचीच वसुली करीत आहे. परंतु आता त्यांच्याकडून भुई भाडे देखील वसुल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. संबधींत गाळेधारकांनी शासकीय जागेत बांधकाम केले असल्याने नियमानुसार आता त्यांच्याकडून रेडी रेक्नरनुसार भाडे वसुल केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार आतापर्यंत १५० गाळेधारकांचा सर्व्हे पूर्ण झाला असून अद्यापही हा सर्व्हे सुरुच आहे. त्यामुळे हा आकडा एक हजारांच्या आसपास किंवा त्याहीपेक्षा वाढण्याची चिन्हे असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यांच्याकडून आता एकदाच रेडीरेक्नरनुसार भुई भाडे वसुल केले जाणार संबधींतांना नोटीस बजावण्याची कारवाई येत्या एक ते दोन दिवसात सुरु होईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त