शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उपायुक्त दौऱ्यानंतरही ‘कचरा’कोंडी "

By admin | Updated: June 23, 2017 05:42 IST

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरसकर यांनी डोंबिवली पूर्वेतील म्हात्रेनगर आणि स्वा. सावरकर रोड या दोन प्रभागांचा गेल्या आठवड्यात पाहणी दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरसकर यांनी डोंबिवली पूर्वेतील म्हात्रेनगर आणि स्वा. सावरकर रोड या दोन प्रभागांचा गेल्या आठवड्यात पाहणी दौरा केला होता. मात्र त्यांच्या दौऱ्यानंतरही ‘कचरा कोंडी’ कायम असल्याचे सांगत नगरसेवकांनी ‘लोकमत’जवळ नाराजी व्यक्त केली. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कचरा विल्हेवाटीच्या नियोजनाचा अभाव असल्यामुळे शहरांना आलेली बकाली आणि त्यामुळे देशभरातील गलिच्छ शहरांमध्ये महापालिकेची गणती झाल्याबद्दल सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर टिकेची झोड घेतली होती. त्याची दखल घेत उपायुक्तांनी दौरा केला होता.तोरसकर यांच्या पाहणी दौऱ्यात सहायक सार्वजनिक आरोग्याधिकारी विलास जोशी, प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत, मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत देगलुकरकर यांना फैलावर घेत अस्वच्छतेच्या कारणावरून कानउघाडणी केली होती. त्यांनी दुर्गंधी आणि घाणीबद्दल नाराजी व्यक्त करत कचरा टाकणाऱ्यांना नोटीस द्या, असे आदेश दिले होते. मंगळवारी पुन्हा येणार असल्याचे उपायुक्त म्हणाले होते, परंतु महासभेमुळे ते येऊ शकले नाहीत. मात्र तोरसकर यांच्या आदेशानंतरही अद्यापपर्यंत कोणालाही नोटीस बजावली नसल्याची माहिती ग प्रभाग समितीचे सभापती आणि नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. कोणाला नोटीस दिली आहे का? यासंदर्भात जोशी यांना विचारणा केली असता, आतापर्यंत दंडात्मक कारवाई मात्र कोणावरही झालेली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनीच उपायुक्तांच्या आदेशाकडे कानाडोळा केला का, असा सवाल पेडणेकर यांनी केला. म्हात्रेनगरसंदर्भात उपायुक्तांच्या दौऱ्यानंतर कोणताही विशेष बदल झाला नसल्याचे सांगण्यात आले. तेच मत स्वा. सावरकर रोड या प्रभागाचे नगरसेवक संदीप पुराणिक यांनीही व्यक्त केले. वरिष्ठांची जरी इच्छाशक्ती असली तरी प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीचा आभाव असल्याने सर्व समस्या असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. दत्तनगर, संगितावाडी आदी प्रभागांमध्ये खासगी सफाई कामगारांकडून प्रभागातील गटारे, ड्रेनेज आदीची स्वच्छता करण्यात येत आहे. हे वॉर्ड महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांच्यासह नगरसेविका भारती मोरे यांचे आहेत. पण तरीही दिवसाला हजारो रुपये खर्च करून गेले आठवडाभर वॉर्डांमध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे. जिथे तक्रार तिथे कामगार :यासंदर्भात राजेश मोरे म्हणाले की, दुसरा इलाजच नाही. खासगी कामगारांना आधी रोख रक्कम द्यावी लागते. प्रभागांमधील नागरिकांची मागणीच असल्याने स्वच्छतेची सुविधा द्यायलाच लागते. शहरात डेंग्यूच्या घटना आधी घडल्या आहेत. त्यात दत्तनगरमधील रहिवाश्यांचाही समावेश होता. त्यात आता पावसाळा सुरू झाला आहे, साथरोगांसह अन्य रोग होऊ नयेत, सगळ्यांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. कमी अधिक पावसाच्या सरींमुळे जिथे पाणी साचते, त्यातून रोगराई वाढण्याची शक्यता आहे. ते होऊ नये याची खबरदारी घेत महापालिकेच्या सफाई कामगारांची प्रतीक्षा न करता खासगी कामगारांकडून स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. दिवसाला दहा ते पंधरा खासगी सफाई कामगार प्रभागांमध्ये कार्यरत असून, जिथे तक्रार तिथे कामगार असे धोरण अवलंबण्यात आल्याचे मोरे म्हणाले.