शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग; कळवा, मुंब्य्रातील ७२५ घरांना नोटीस, मुंब्रा बायपासवरील ४५ कुटुंबाचे स्थलांतर

By अजित मांडके | Updated: July 28, 2023 16:55 IST

...या घटनेनंतर, याठिकाणीही इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू नये म्हणून ठाणे महापालिका आणि वनविभागाने येथील ४५ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर बाजूच्याच शाळा, मशीद आणि मंदिरात केले आहे.

ठाणे : मुंब्रा बायपास रोडवरील मुंब्रा देवीच्या भागात गुरुवारी भुस्कलन झाले. या घटनेनंतर, याठिकाणीही इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू नये म्हणून ठाणे महापालिका आणि वनविभागाने येथील ४५ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर बाजूच्याच शाळा, मशीद आणि मंदिरात केले आहे. परंतु यापुढेही जाऊन कळवा आणि मुंब्य्रातील डोंगराच्या पायथ्याशी आणि डोंगरावर वसलेल्या तब्बल ७२५ घरांना महापालिकेने पुन्हा नोटीस बजावून येथील रहिवाशांना पावसाळ्यात स्थलांतर होण्याचे आवाहन केले आहे.इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेला आज १० दिवस होऊन गेले. यात २७ जणांचे प्राण गेले असून ५७ जण अद्यापही बेपत्ता आहेत. परंतु या घटनेनंतर ठाण्यातील १४ दरड प्रवण क्षेत्रांचा प्रश्न देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यात कळवा, मुंब्रा आदी ठिकाणच्या भागांचा अधिक प्रमाणात समावेश आहे. त्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा बायपासवरील मुंब्रा देवी परिसरात भुस्कलन झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणत्याही जिवीत हानी झाली नसली तरी देखील ठाणे महापालिका आणि वनविभागाने खरबदारी घेत येथील ४५ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. दुसरीकडे येथे अतिजोखीमीच्या भागात असलेली ९ घरे सील करण्यात आल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले.यापुढे जाऊन आता महापालिका जागी झाली असून त्यांनी कळवा आणि मुंब्रा भागातील दरड प्रवण क्षेत्रात वास्तव्य करणाºया रहिवाशांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत येथील ७२५ घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यात कळव्यातील ५०० हून अधिक आणि मुंब्रा बायपासवरील २२५ घरांना नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. तसेच घरोघरी जाऊन येथील रहिवाशांना सर्तक राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. किमान पावसाळ्यापर्यंत तरी दुसरीकडे रहावे असे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.दुसरीकडे वनविभागाने देखील आता भुस्कलनाच्या घटनेनंतर जागे झाले असून, कळवा - मुंब्रा भागातील घोलाई नगर, आतकोनेश्वर नगर, कारगिल कोंडा आदी भागात पावसाचा जोर लक्षात घेत सर्तक राहण्याच्या सुचना करणारे फलक लावण्यात आले आहेत. तसेच येथील ८ ते १० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :mumbraमुंब्राthaneठाणे