शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग; कळवा, मुंब्य्रातील ७२५ घरांना नोटीस, मुंब्रा बायपासवरील ४५ कुटुंबाचे स्थलांतर

By अजित मांडके | Updated: July 28, 2023 16:55 IST

...या घटनेनंतर, याठिकाणीही इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू नये म्हणून ठाणे महापालिका आणि वनविभागाने येथील ४५ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर बाजूच्याच शाळा, मशीद आणि मंदिरात केले आहे.

ठाणे : मुंब्रा बायपास रोडवरील मुंब्रा देवीच्या भागात गुरुवारी भुस्कलन झाले. या घटनेनंतर, याठिकाणीही इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू नये म्हणून ठाणे महापालिका आणि वनविभागाने येथील ४५ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर बाजूच्याच शाळा, मशीद आणि मंदिरात केले आहे. परंतु यापुढेही जाऊन कळवा आणि मुंब्य्रातील डोंगराच्या पायथ्याशी आणि डोंगरावर वसलेल्या तब्बल ७२५ घरांना महापालिकेने पुन्हा नोटीस बजावून येथील रहिवाशांना पावसाळ्यात स्थलांतर होण्याचे आवाहन केले आहे.इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेला आज १० दिवस होऊन गेले. यात २७ जणांचे प्राण गेले असून ५७ जण अद्यापही बेपत्ता आहेत. परंतु या घटनेनंतर ठाण्यातील १४ दरड प्रवण क्षेत्रांचा प्रश्न देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यात कळवा, मुंब्रा आदी ठिकाणच्या भागांचा अधिक प्रमाणात समावेश आहे. त्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा बायपासवरील मुंब्रा देवी परिसरात भुस्कलन झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणत्याही जिवीत हानी झाली नसली तरी देखील ठाणे महापालिका आणि वनविभागाने खरबदारी घेत येथील ४५ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. दुसरीकडे येथे अतिजोखीमीच्या भागात असलेली ९ घरे सील करण्यात आल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले.यापुढे जाऊन आता महापालिका जागी झाली असून त्यांनी कळवा आणि मुंब्रा भागातील दरड प्रवण क्षेत्रात वास्तव्य करणाºया रहिवाशांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत येथील ७२५ घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यात कळव्यातील ५०० हून अधिक आणि मुंब्रा बायपासवरील २२५ घरांना नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. तसेच घरोघरी जाऊन येथील रहिवाशांना सर्तक राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. किमान पावसाळ्यापर्यंत तरी दुसरीकडे रहावे असे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.दुसरीकडे वनविभागाने देखील आता भुस्कलनाच्या घटनेनंतर जागे झाले असून, कळवा - मुंब्रा भागातील घोलाई नगर, आतकोनेश्वर नगर, कारगिल कोंडा आदी भागात पावसाचा जोर लक्षात घेत सर्तक राहण्याच्या सुचना करणारे फलक लावण्यात आले आहेत. तसेच येथील ८ ते १० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :mumbraमुंब्राthaneठाणे