शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग; कळवा, मुंब्य्रातील ७२५ घरांना नोटीस, मुंब्रा बायपासवरील ४५ कुटुंबाचे स्थलांतर

By अजित मांडके | Updated: July 28, 2023 16:55 IST

...या घटनेनंतर, याठिकाणीही इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू नये म्हणून ठाणे महापालिका आणि वनविभागाने येथील ४५ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर बाजूच्याच शाळा, मशीद आणि मंदिरात केले आहे.

ठाणे : मुंब्रा बायपास रोडवरील मुंब्रा देवीच्या भागात गुरुवारी भुस्कलन झाले. या घटनेनंतर, याठिकाणीही इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू नये म्हणून ठाणे महापालिका आणि वनविभागाने येथील ४५ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर बाजूच्याच शाळा, मशीद आणि मंदिरात केले आहे. परंतु यापुढेही जाऊन कळवा आणि मुंब्य्रातील डोंगराच्या पायथ्याशी आणि डोंगरावर वसलेल्या तब्बल ७२५ घरांना महापालिकेने पुन्हा नोटीस बजावून येथील रहिवाशांना पावसाळ्यात स्थलांतर होण्याचे आवाहन केले आहे.इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेला आज १० दिवस होऊन गेले. यात २७ जणांचे प्राण गेले असून ५७ जण अद्यापही बेपत्ता आहेत. परंतु या घटनेनंतर ठाण्यातील १४ दरड प्रवण क्षेत्रांचा प्रश्न देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यात कळवा, मुंब्रा आदी ठिकाणच्या भागांचा अधिक प्रमाणात समावेश आहे. त्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा बायपासवरील मुंब्रा देवी परिसरात भुस्कलन झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणत्याही जिवीत हानी झाली नसली तरी देखील ठाणे महापालिका आणि वनविभागाने खरबदारी घेत येथील ४५ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. दुसरीकडे येथे अतिजोखीमीच्या भागात असलेली ९ घरे सील करण्यात आल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले.यापुढे जाऊन आता महापालिका जागी झाली असून त्यांनी कळवा आणि मुंब्रा भागातील दरड प्रवण क्षेत्रात वास्तव्य करणाºया रहिवाशांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत येथील ७२५ घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यात कळव्यातील ५०० हून अधिक आणि मुंब्रा बायपासवरील २२५ घरांना नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. तसेच घरोघरी जाऊन येथील रहिवाशांना सर्तक राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. किमान पावसाळ्यापर्यंत तरी दुसरीकडे रहावे असे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.दुसरीकडे वनविभागाने देखील आता भुस्कलनाच्या घटनेनंतर जागे झाले असून, कळवा - मुंब्रा भागातील घोलाई नगर, आतकोनेश्वर नगर, कारगिल कोंडा आदी भागात पावसाचा जोर लक्षात घेत सर्तक राहण्याच्या सुचना करणारे फलक लावण्यात आले आहेत. तसेच येथील ८ ते १० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :mumbraमुंब्राthaneठाणे