शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

खड्डयांपाठोपाठ वाहतूक कोंडीने कल्याणकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:02 IST

खड्डयांच्या बळींमुळे कल्याणकर नागरिकांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेविरोधात संतापाची भावना आहे. त्यातच गेले आठवडाभर विविध कारणांमुळे कल्याणमध्ये दिवसंरात्र वाहतूक कोंडी असल्याने त्रस्त कल्याणकरांनी कोणाकोणाला जबाबदार धरायचे असा सवाल करत हतबलता व्यक्त केली. बुधवारीही सलग सहाव्या दिवशी कल्याणमधील वाहतूक कूर्मगतीने पुढे सरकल्याचा फटका अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना, महापालिकेच्या परिवहन विभागाला, तसेच खासगी वाहनचालकांना बसला.

ठळक मुद्दे परिवहनच्या उत्पन्नात प्रतीदिन दिड लाखांची घट  पत्रीपूलावर अवजड वाहनांच्या रांगाच रांगा

डोंबिवली: खड्डयांच्या बळींमुळे कल्याणकर नागरिकांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेविरोधात संतापाची भावना आहे. त्यातच गेले आठवडाभर विविध कारणांमुळे कल्याणमध्ये दिवसंरात्र वाहतूक कोंडी असल्याने त्रस्त कल्याणकरांनी कोणाकोणाला जबाबदार धरायचे असा सवाल करत हतबलता व्यक्त केली. बुधवारीही सलग सहाव्या दिवशी कल्याणमधील वाहतूक कूर्मगतीने पुढे सरकल्याचा फटका अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना, महापालिकेच्या परिवहन विभागाला, तसेच खासगी वाहनचालकांना बसला.वाहतूक नियंत्रण विभागासह आरटीओच्या दुर्लक्षामुळे कल्याणमध्ये वाहतूक कोंडी होत असल्याची टिका वाहनचालकांनी केली. नियमबाह्य वाहतूकीवर यंत्रणेचा प्रतिबंध नसल्याने त्याचा त्रास कल्याणकरांना होत आहे. मुंब्रा बायपासची वाहतूक कल्याणमार्गे वळवल्याने कल्याणमध्ये वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. आग्रा रोड, सहजानंद चौक, गोविंदवाडी बायपास, दुर्गाडी चौक , भिवंडी रोड, वायले नगर यासह जून्या कल्याणमधील चिंचोळया रस्त्यांच्या परिसरात सर्वत्र वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कल्याण रेल्वे स्थानकानजीक असलेल्या राज्य परिवहनच्या बस स्टँडमध्ये ये-जा करणा-या बस चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे लागले. त्यामध्ये रिक्षा टेम्पो, मोठे टेम्पो, ट्रक टेम्पो, ट्रक, डंपर यासह अन्य राज्य परिवहन व खासगी बसेस, रिक्षा, चार चाकी वाहने, दुचाकीस्वार आदींमुळे पत्रीपूल ते शिवाजी चौक, पुढे महापालिका मुख्यालय, आग्रा रोड गाठण्यासाठी तासभराचा अवधी लागला.* वाहतूक कोंडीचा सर्वात जास्त फटका महापलिकेच्या परिवहन विभागाला बसला आहे. परिवहनचे उत्पन्न ६ लाखांवरून आता थेट साडेचार लाखांवर आले आहे. पंधरवड्यापासून ही समस्या प्रकर्षाने भेडसावत आहे. त्यामुळे दिवासाला लाख-दिड लाखांची तूट होत आहे. जेथे दिवसाला परिवहनच्या ७० बसेस विविध मार्गावर १६ हजार कि.मी. धावयाला हवीत ती कोंडीमुळे १२ ते १३ हजार कि.मी धावत असल्याची माहिती परिवहनचे नियोजन अधिकारी संदीप भोसले यांनी ‘लोकमत’ला दिली. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणTrafficवाहतूक कोंडी