शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

खड्डयांपाठोपाठ वाहतूक कोंडीने कल्याणकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:02 IST

खड्डयांच्या बळींमुळे कल्याणकर नागरिकांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेविरोधात संतापाची भावना आहे. त्यातच गेले आठवडाभर विविध कारणांमुळे कल्याणमध्ये दिवसंरात्र वाहतूक कोंडी असल्याने त्रस्त कल्याणकरांनी कोणाकोणाला जबाबदार धरायचे असा सवाल करत हतबलता व्यक्त केली. बुधवारीही सलग सहाव्या दिवशी कल्याणमधील वाहतूक कूर्मगतीने पुढे सरकल्याचा फटका अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना, महापालिकेच्या परिवहन विभागाला, तसेच खासगी वाहनचालकांना बसला.

ठळक मुद्दे परिवहनच्या उत्पन्नात प्रतीदिन दिड लाखांची घट  पत्रीपूलावर अवजड वाहनांच्या रांगाच रांगा

डोंबिवली: खड्डयांच्या बळींमुळे कल्याणकर नागरिकांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेविरोधात संतापाची भावना आहे. त्यातच गेले आठवडाभर विविध कारणांमुळे कल्याणमध्ये दिवसंरात्र वाहतूक कोंडी असल्याने त्रस्त कल्याणकरांनी कोणाकोणाला जबाबदार धरायचे असा सवाल करत हतबलता व्यक्त केली. बुधवारीही सलग सहाव्या दिवशी कल्याणमधील वाहतूक कूर्मगतीने पुढे सरकल्याचा फटका अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना, महापालिकेच्या परिवहन विभागाला, तसेच खासगी वाहनचालकांना बसला.वाहतूक नियंत्रण विभागासह आरटीओच्या दुर्लक्षामुळे कल्याणमध्ये वाहतूक कोंडी होत असल्याची टिका वाहनचालकांनी केली. नियमबाह्य वाहतूकीवर यंत्रणेचा प्रतिबंध नसल्याने त्याचा त्रास कल्याणकरांना होत आहे. मुंब्रा बायपासची वाहतूक कल्याणमार्गे वळवल्याने कल्याणमध्ये वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. आग्रा रोड, सहजानंद चौक, गोविंदवाडी बायपास, दुर्गाडी चौक , भिवंडी रोड, वायले नगर यासह जून्या कल्याणमधील चिंचोळया रस्त्यांच्या परिसरात सर्वत्र वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कल्याण रेल्वे स्थानकानजीक असलेल्या राज्य परिवहनच्या बस स्टँडमध्ये ये-जा करणा-या बस चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे लागले. त्यामध्ये रिक्षा टेम्पो, मोठे टेम्पो, ट्रक टेम्पो, ट्रक, डंपर यासह अन्य राज्य परिवहन व खासगी बसेस, रिक्षा, चार चाकी वाहने, दुचाकीस्वार आदींमुळे पत्रीपूल ते शिवाजी चौक, पुढे महापालिका मुख्यालय, आग्रा रोड गाठण्यासाठी तासभराचा अवधी लागला.* वाहतूक कोंडीचा सर्वात जास्त फटका महापलिकेच्या परिवहन विभागाला बसला आहे. परिवहनचे उत्पन्न ६ लाखांवरून आता थेट साडेचार लाखांवर आले आहे. पंधरवड्यापासून ही समस्या प्रकर्षाने भेडसावत आहे. त्यामुळे दिवासाला लाख-दिड लाखांची तूट होत आहे. जेथे दिवसाला परिवहनच्या ७० बसेस विविध मार्गावर १६ हजार कि.मी. धावयाला हवीत ती कोंडीमुळे १२ ते १३ हजार कि.मी धावत असल्याची माहिती परिवहनचे नियोजन अधिकारी संदीप भोसले यांनी ‘लोकमत’ला दिली. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणTrafficवाहतूक कोंडी