शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

खड्डयांपाठोपाठ वाहतूक कोंडीने कल्याणकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:02 IST

खड्डयांच्या बळींमुळे कल्याणकर नागरिकांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेविरोधात संतापाची भावना आहे. त्यातच गेले आठवडाभर विविध कारणांमुळे कल्याणमध्ये दिवसंरात्र वाहतूक कोंडी असल्याने त्रस्त कल्याणकरांनी कोणाकोणाला जबाबदार धरायचे असा सवाल करत हतबलता व्यक्त केली. बुधवारीही सलग सहाव्या दिवशी कल्याणमधील वाहतूक कूर्मगतीने पुढे सरकल्याचा फटका अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना, महापालिकेच्या परिवहन विभागाला, तसेच खासगी वाहनचालकांना बसला.

ठळक मुद्दे परिवहनच्या उत्पन्नात प्रतीदिन दिड लाखांची घट  पत्रीपूलावर अवजड वाहनांच्या रांगाच रांगा

डोंबिवली: खड्डयांच्या बळींमुळे कल्याणकर नागरिकांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेविरोधात संतापाची भावना आहे. त्यातच गेले आठवडाभर विविध कारणांमुळे कल्याणमध्ये दिवसंरात्र वाहतूक कोंडी असल्याने त्रस्त कल्याणकरांनी कोणाकोणाला जबाबदार धरायचे असा सवाल करत हतबलता व्यक्त केली. बुधवारीही सलग सहाव्या दिवशी कल्याणमधील वाहतूक कूर्मगतीने पुढे सरकल्याचा फटका अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना, महापालिकेच्या परिवहन विभागाला, तसेच खासगी वाहनचालकांना बसला.वाहतूक नियंत्रण विभागासह आरटीओच्या दुर्लक्षामुळे कल्याणमध्ये वाहतूक कोंडी होत असल्याची टिका वाहनचालकांनी केली. नियमबाह्य वाहतूकीवर यंत्रणेचा प्रतिबंध नसल्याने त्याचा त्रास कल्याणकरांना होत आहे. मुंब्रा बायपासची वाहतूक कल्याणमार्गे वळवल्याने कल्याणमध्ये वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. आग्रा रोड, सहजानंद चौक, गोविंदवाडी बायपास, दुर्गाडी चौक , भिवंडी रोड, वायले नगर यासह जून्या कल्याणमधील चिंचोळया रस्त्यांच्या परिसरात सर्वत्र वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कल्याण रेल्वे स्थानकानजीक असलेल्या राज्य परिवहनच्या बस स्टँडमध्ये ये-जा करणा-या बस चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे लागले. त्यामध्ये रिक्षा टेम्पो, मोठे टेम्पो, ट्रक टेम्पो, ट्रक, डंपर यासह अन्य राज्य परिवहन व खासगी बसेस, रिक्षा, चार चाकी वाहने, दुचाकीस्वार आदींमुळे पत्रीपूल ते शिवाजी चौक, पुढे महापालिका मुख्यालय, आग्रा रोड गाठण्यासाठी तासभराचा अवधी लागला.* वाहतूक कोंडीचा सर्वात जास्त फटका महापलिकेच्या परिवहन विभागाला बसला आहे. परिवहनचे उत्पन्न ६ लाखांवरून आता थेट साडेचार लाखांवर आले आहे. पंधरवड्यापासून ही समस्या प्रकर्षाने भेडसावत आहे. त्यामुळे दिवासाला लाख-दिड लाखांची तूट होत आहे. जेथे दिवसाला परिवहनच्या ७० बसेस विविध मार्गावर १६ हजार कि.मी. धावयाला हवीत ती कोंडीमुळे १२ ते १३ हजार कि.मी धावत असल्याची माहिती परिवहनचे नियोजन अधिकारी संदीप भोसले यांनी ‘लोकमत’ला दिली. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणTrafficवाहतूक कोंडी