शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

तब्बल ५ शस्त्रक्रिया आणि २० डायलिसीसनंतर कामगाराचा वाचला पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 18:42 IST

सिमेंट मिक्सर ट्रक पायावरुन गेल्याने एका बांधकाम कामगाराच्या निकामी होणाऱ्या पायावर तब्बल ५ शस्त्रक्रिया व अपघातामुळे किडन्यांवर झालेल्या संसर्गाला रोखण्यासाठी २० डायलिसीस केल्यानंतर त्याचा पाय वाचविण्यात मीरारोडच्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले

भाईंदर - सिमेंट मिक्सर ट्रक पायावरुन गेल्याने एका बांधकाम कामगाराच्या निकामी होणाऱ्या पायावर तब्बल ५ शस्त्रक्रिया व अपघातामुळे किडन्यांवर झालेल्या संसर्गाला रोखण्यासाठी २० डायलिसीस केल्यानंतर त्याचा पाय वाचविण्यात मीरारोडच्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. सध्या त्या कामगाराची प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. 

कोलकत्ता येथून कामासाठी आलेल्या ३८ वर्षीय रणजीत शील हा मीरारोड येथील एका इमारतीच्या साईटवर काम करीत होता. १ नोव्हेंबर २०१८ रोजी त्याच्या उजव्या पायावरून सिमेंट मिक्सर ट्रक गेल्याने त्याच्या पायाची हाडे मोडली होती. त्यावेळी त्याला परिसरातीलच एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर फ्रॅक्चर फिक्सेशन व रक्तवाहिन्या दुरुस्तीचा उपचार करण्यात आला. पण त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न होता त्याच्या किडनी व यकृतामध्ये जंतू संसर्ग होऊन दोन्ही किडन्या निकामी होऊ लागल्या. त्याची प्रकृती गंभीर होऊ लागल्याने त्याला तेथीलच एका अद्यावत खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी रुग्णालयाचे अस्थीव्यंग शल्यविशारद डॉ. निखिल अग्रवाल यांनी रणजीतची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना त्याची किडनी व यकृताला जंतुसंसर्ग होऊन ते निकामी होण्याच्या मार्गावर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रणजीतचा जीव वाचवायचा असेल तर त्याचा पाय कापून तेथून होणारा जंतुसंसर्ग थांबविणे गरजेचे असल्याचे मत डॉ. अग्रवाल यांनी  व्यक्त केले. परंतु, त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करुन तो पुन्हा जैसे थे करण्याचे आव्हान स्वीकारुन डॉ. अग्रवाल यांनी त्याच्या नातेवाईकांसोबत चर्चा केली. त्याला होकार मिळाल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने रणजीतच्या वैद्यकीय अहवालाचा अभ्यास करून त्याचा पाय वाचविण्याची प्रक्रीया सुरु केली.

सुरुवातीला त्याची किडनी पुर्वपदावर आणण्यासाठी तब्बल २० वेळा त्याच्यावर डायलिसीस करीत त्याला ९ बाटल्या रक्त चढविण्यात आले. त्यासोबत आधुनिक वैद्यकीय उपचार करून त्यांची किडनी व यकृत वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. दरम्यान त्याच्या इतर अवयवांमध्ये कोणताही संसर्ग न होता एक महिन्यात त्याची किडनी व यकृत पुर्वपदावर आली. यावेळी त्याचा पाय वाचविण्यासाठी देखील डॉक्टरांकडून उपचार केले जात होता. तब्बल ५ वेळा डॉक्टरांना शस्त्रक्रिया केल्यानंतर दोन महिन्यांच्या उपचारानंतर त्याचा पाय वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असुन तो वॉकरच्या सहाय्याने चालण्याचा प्रयत्न करीत आहे. येत्या दोन महिन्यांत रणजीत व्यवस्थित चालू शकेल, असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. अशा अपघातांमध्ये अनेकवेळा हाताला अथवा पायाला गंभीर दुखापत झाल्याने शरीरात जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी तो अवयव कापण्याचा निर्णय घेतला जातो. परंतु, सध्या आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असल्याने त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करुन रुग्णाचा अवयव शाबूत ठेवता येत असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMira Bhayanderमीरा-भाईंदर