शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पंधरा दिवस झाले तरी टॅँकरचे प्रस्ताव पडूनच

By admin | Updated: April 7, 2016 01:07 IST

८५ हजार लोकसंख्या असलेल्या मोखाडा तालुक्यात सरकारी आकडेवारीनुसार ४० गावपाड्यांना अवघ्या १० टँकरने पाणीपुरवठा सुरू असून केवनाळा, वांगणपाडा, सप्रेवाडी गोलवडवाडी

मोखाडा : ८५ हजार लोकसंख्या असलेल्या मोखाडा तालुक्यात सरकारी आकडेवारीनुसार ४० गावपाड्यांना अवघ्या १० टँकरने पाणीपुरवठा सुरू असून केवनाळा, वांगणपाडा, सप्रेवाडी गोलवडवाडी, पाथर्डी, डोगरवाडी, ठाकरपाडा यांच्यासह १५ गावपाड्यांचे टॅँकर पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव १५ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे पडून आहेत. उन्हाळ्यात शहरी भागातही पाण्याची बोंब असते. मग, आदिवासी तालुक्यांबाबत बोलायलाच नको. तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. पाणी उपलब्ध नाही, म्हणून तर नियोजनाअभावी धरणे उशाला कोरड मात्र घशाला, अशी येथे स्थिती आहे.तालुक्यात मारुतीचीवाडी, कारेगाव, खोच, पळसपाडा, मध्य वैतरणा अशी पाच धरणे आहेत. शहरी भागाला पाणीपुरवठा व्हावा, यासाठी कोट्यवधींचा निधी खर्चून या ठिकाणी धरणांचे बांधकाम झाले. पाणी ही मूलभूत गरज असताना भूमिपुत्रांनाच त्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार झाल्याने मोखाडावासीयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निवडणूक काळात सर्वच पक्ष-अपक्षांकडून नागरिकांची दिशाभूल केली जाते. त्यानंतर, पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच स्थिती निर्माण होते.तालुक्यातील पाड्यांवर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाण्याची मोठी चणचण निर्माण झाली. महिलांना कळशीभर पाण्यासाठी तान्ह्या बाळांना कडेवर घेऊन उन्हातान्हात वणवण करावी लागत आहे. अशी भयानक स्थिती येथील असूनसुद्धा पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रयत्न होताना दिसत नाही. प्रशासनाने मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी कोचाळे या ठिकाणी मध्य वैतरणा प्रकल्पाच्या माध्यमातून १२० किमी लांबीच्या अंतरावर पाणी पोहोचवले, मात्र याच धरणाच्या परीसरातील गावपाड्यांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी डोंगरदऱ्या तुडवाव्या लागत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे. ५० पेक्षा अधिक गावपाड्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दिवसागणिक टंचाईग्रस्त गावपाड्यांच्या संख्येत होणारी वाढ यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत मे महिन्यात काय होईल हा प्रश्न आहे. (वार्ताहर)