शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

आठवीनंतरच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: May 31, 2016 03:00 IST

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचे केले गेले असले तरी वाढत्या निकालाच्या तुलनेत नव्या अनुदानीत तुकड्यांना मान्यता

हुसेन मेमन ल्ल जव्हारप्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचे केले गेले असले तरी वाढत्या निकालाच्या तुलनेत नव्या अनुदानीत तुकड्यांना मान्यता दिली जात नसल्याने पालघर जिल्ह्यात आठवी नंतरच्या प्रवेशाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.तालुक्यासह जिल्ह्यात अनेक शासकीय व अनुदानित आश्रमशाळा आहेत. तिथेही एका एका वर्गात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबले आहेत. सालाबादप्रमाणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी ८ वी पास झाल्यानंतर त्यांचा ९ वी प्रवेशाचा गंभीर प्रश्न उपस्थित होत असतो. विनाअनुदानित व अनुदानित आश्रमशाळा त्यांना प्रवेश देऊ शकत नाहीत. पालक व विद्यार्थी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रवेश मिळावा म्हणून उंबरे झिजवतात परंतु अखेर प्रवेश न मिळाल्याने हजारो विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून मोलमजुरीकडे वळतात. त्यांना जर पुढील शिक्षण मिळावे, असे जर खरोखर वाटत असेल तर जि.प. शिक्षण विभागाने १० वी पर्यंतच्या तुकड्या वाढवून द्याव्यात तसेच काही शाळांना नव्याने वर्ग सुरू करण्याची अनुमती द्यावी अशी पालकांची मागणी आहे. या तालुक्याचा प्रश्न खूप वेगळा आहे. अस्तित्वात असलेल्या सर्व तुकड्यांमध्ये आताच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. विनाअनुदानीत तत्त्वावरील तुकड्यांना मान्यता मिळाली तरी कुणीही शिक्षक मिळत नाही, कारण इतक्या अल्प पगारात तिथे काम करणे कोणालाही शक्य होत नाही. त्यामुळे सरकारने तुकड्या वाढवून दिल्या तरी त्याने समस्या सुटत नाहीत यावर एकच इलाज आहे.तो म्हणजे अनुदानीत तत्वावर शाळांना तुकड्या वाढवून देणे व ज्या ठिकाणी शाळांमध्ये या तुकड्या अस्तित्वाच नाही त्यांना या तुकड्या नव्याने सुरू करण्याची अनुमती देणे अनेक शाळांत पटसंख्या कमी असून शिक्षक जास्त आहेत त्यांचे समायोजन करून हा प्रश्न सोडविला जाऊ शकतो. परंतु तेवढी कल्पता कुणी दाखवत नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री कधी पुढाकार घेतील याकडे जनता डोळे लावून बसली आहे.तालुक्याचेच उदाहरण द्यायचे झाल्यास काही गावपाड्यात पहिली ते ४ थी , पहिली ते ५ वी , पहिली ते ७ वी तर काही ठिकाणी पहिली ते ८ वी पर्यंत ऐकून २४३ प्राथमिक शाळा आहेत. शासन निर्णय दि.२८ आॅगस्ट २०१५ व ८ जाने. २०१६ नुसार संचमान्यता निकष ठरविण्यात आले. त्यात पटसंख्येनुसार शिक्षक असतील असे धोरण आहे. परंतु शासनाने शिक्षक भरती न केल्यामुळे जिल्ह्यात अपुरा शिक्षकवर्ग क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिकविण्याची कसरत करताना दिसतो. शिकवण्याबरोबरच शिक्षकाला इतर शासकीय कामांचा अतिरिक्त भार टाकणे व त्याला घाण्याला जुंपल्यासारखे राबवून घेणे हे शासनाचे जणू आद्यकर्तव्यच! शिवाय शाळाबाह्य विद्यार्थी आढळले तर त्यास शिक्षकालाच जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाईची बडगा उगारला जातो.