शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

काम पूर्ण होऊनही पाण्याअभावी योजना रखडली

By admin | Updated: March 22, 2016 02:04 IST

६९ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे २००८ साली मोठा गाजावाजा करून अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. सध्या योजनेची बहुतांश कामे मार्गी लागली असली

शशी करपे,  वसई६९ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे २००८ साली मोठा गाजावाजा करून अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. सध्या योजनेची बहुतांश कामे मार्गी लागली असली तर जोपर्यंत सूर्या टप्पा क्रमांक ३ च्या १०० एमएलडी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होत नाही तोपर्यंत ६९ गावांना पाणी पुरवठा करता येणार नाही, असे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा पूर्व पट्टीतील ग्रामीण भागात पाणी टंचाईची झळ जाणवू लागली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर दिलासा मिळणार असून त्यासाठी अजून काही महिने वाट पहावी लागणार आहे. तत्कालीन विरार, नालासोपारा, नवघर-माणिकपूर आणि वसई या चार नगरपालिकांच्या लगत असलेल्या ६९ गावांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी ८५ कोटी रुपये खर्चाची ६९ गाव पाणी पुरवठा योजना साकारली. चारही नगरपालिकांनी त्यांना मिळणाऱ्या पाण्यातील १७ एमएलडी पाणी ग्रामीण भागाला देण्याचे मान्य केले. सूर्या, उसगाव आणि पेल्हारमधून हे पाणी देण्याचे त्यावेळी ठरले होते. या योजनेसाठी ८५ कोटी खर्च अपेक्षित धरून लोकवर्गणीतून १० टक्के आणि उर्वरित ९० टक्के सरकारी अनुदानातून केला जाणार होता. त्यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी लोकवर्गणीची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर टाकून लोकवर्गणीतून लोकांची सुटका केली. सूर्या योजनेतून काशिदकोपर, कण्हेर, कोशिंंबे, टोकारे, दहीसर, कसराळी, खानिवडे, उमेळे, वडवली, किरवली. चोबारे, मुळगाव, खोचिवडे, नायगाव, पाली, चंदनसार, शिरगाव, गासकोपरी, सकवार या १९ गावांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पेल्हार धरणातून पेल्हार, सातीवली, चिंंचोटी, कोल्ही, कामण, मोरी, पोमण, शिलोत्तर, नागले, देवदळ, बापाणे, सारजा, ससुनवघर, धानीव, बिलालपाडा, राजीवली, जुचंद्र, चंद्रपाडा, वालीव, गोखीवरे या २० गावांना पाणी दिले जाणार आहे. उसगाव धरणातून मांडवी, चांदीप, उसगाव, शिवणसई, शिरसाड, खैरपाडा, चिखलडोंगरी, बोळींज, कोफराड, आगाशी, अर्नाळा, उमराळे, वटार, सत्पाळे, राजोडी, नाळे, वाघोली, मर्देस, नवाळे, निर्मळ, गास , कराडी, सांडोर, कौलार (खु), कौलार (बु.), वासळई, गिरीज, भुईगाव (खु.), भुईगाव (ब्रु.) आणि सालोली या तीस गावांना पाणी दिले जाणार आहे. यातील ५२ गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. या योजनेतील बहुतांश कामे पूर्ण झालेली आहेत. जुचंद्र-बापाणे रस्ता रुंदीकरणामुळे चार किलोमीटरची पाईपलाईन स्थलांतरीत करावी लागणार आहे. हे काम जुलै अखेरीस पूर्ण होणार आहे. मात्र, या योजनेतून पाणी पुरवठा सूर्या टप्पा क्रमांक ३ ची योजना कार्यान्वित झाल्यानंतर सुुुुरु होणार आहे. पालिका हद्दीत आधीच ९२ एमएलडी पाणी तुटवडा आहे. वाढीव १०० एमएलडी पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्ण झाल्यानंतर पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे महानगरपालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला लेखी कळवले आहे.