शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मुंब्य्रातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:45 IST

फेरीवाले झाले हद्दपार : ठामपाची कारवाई

ठाणे : राजकीय इच्छा शक्ती आणि प्रशासनाचे पाठबळ असेल तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण सध्या मुंब्य्रातील रस्त्यांकडे पाहिल्यास मिळू शकते. गेली ३० वर्षे फेरीवाल्यांनी व्यापलेल्या येथील मुंबई -पुणे रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. दोन महिन्यांपासून येथील फेरीवाल्यांवर कारवाई सुरूअसल्यामुळेच आज खऱ्या अर्थाने हा रस्ता मोकळा झाला असून वाहतूककोंडीतूनही मुंब्रावासीयांची सुटका झाली आहे.

फेरीवाला ही संपूर्ण ठाण्याला सतावणारी समस्या आहे. शहरातील स्टेशन परिसर असो किंवा घोडबंदर भाग, वागळेपट्टा आज प्रत्येक रस्त्यावर, फुटपाथवर त्यांचे प्रस्थ वाढलेले दिसत आहे. त्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने कारवाई करतांनासुद्धा प्रशासन फारसे पुढे येतांना दिसत नाही. दुसरीकडे मुंब्य्रासारख्या परिसरात तर कारवाई करतांना अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार सहन करावा लागला आहे.

दोन महिन्यांपूर्वीच अशा प्रकारे कारवाई करणाºया पालिकेच्या एका कर्मचाºयाला जबर मारहाण झाली होती. असे असतांनाही मुंब्य्रातील रस्ते फेरीवाला मुक्त करण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जोरदार पावले उचलल्यानेच आणि त्याला राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ मिळाल्याने येथील रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. रमजानचा महिना असतांनाही या भागातील रस्त्यांवर एकही फेरीवाला दिसत नाही. महापालिकेच्या वतीने सांयकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत येथे जागता पाहरा सुरू आहे. या काळात नजरचुकीने लागत असलेल्या हातगाड्यांवर कारवाईचा धडाका आजही सुरूच आहे. दोन महिन्यात येथील सुमारे ४ हजाराहून अधिक फेरीवाल्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या मदतीने कोणाचीही तमा न बाळगता कारवाई केली आहे.

आतापर्यंत झालेली कारवाई१ नोव्हेंबर २०१८ ते आजपर्यंत मुंब्य्रातील ४०६४ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर ४२७१ बॅनर पोस्टर काढण्यात आले असून, ६६ गाळे, ३८० झोपड्या, ६२ इमारती, नव्याने उभ्या राहत असलेल्या ११ प्लिंथचे बांधकामे तोडण्यात आली आहेत. शिवाय ३२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ३५३ अंतर्गत अन्य तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रस्ता झाला मोकळा...पूर्वी मुंब्रा ते पुढे शीळफाट्याला जाण्यासाठी फेरीवाल्यांनी रस्ता अडविल्यामुळे एक ते दीड तासांचा कालावधी वाहनचालकांना लागत होता. परंतुख आता फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याने हा रस्ता मोकळा झाला असून अवघ्या १० मिनिटांत हे अंतर कापणे शक्य झाले आहे.

रुंदीकरणाचाही झाला फायदामहापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असतांनाच येथील रुंदीकरणाची मोहीम राबविल्याने येथील रस्ता आता चौपदरी झाला आहे. त्यामुळे सुद्धा वाहनांचा वेग वाढला आहे. 

राजकीय इच्छा शक्ती असेल तर प्रशासन सुद्धा योग्य पद्धतीने आपले काम करत असते. यामुळे आम्हीही प्रशासनाला या कारवाईत आडकाठी आणली नाही, यामुळेच आज मुंब्य्रातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.- जितेंद्र आव्हाड,स्थानिक आमदार, राष्टÑवादीफेरीवाल्यांचे पुनर्वसन सुरूरस्ता फुटपाथ अडवून व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांसाठी गुलाब पार्क मार्केट हलवून ते मित्तलच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात हलविण्यात आले आहे. शिवाय येथील आणखी एका जागेतही फेरीवाल्यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिवाय ईद येत असल्याने आणखी जागेची मागणी वाढली असल्याने त्यानुसार तन्वरनगर भागात तात्पुरत्या स्वरुपात गाळे उभारण्यात येऊन, त्याठिकाणी वीजेची आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून येथे २९० गाळ्यांचे वाटप केले जाणार आहे.- महेश आहेर, सहाय्यक आयुक्त, मुंब्रा, प्रभाग समिती