शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

७५० वर्षे उलटूनही ज्ञानोबा आणि तुकाराम महाराजांची ही विचार परंपरा महाराष्ट्रात टिकून - बोधले महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 17:53 IST

संतांची वाणी आणि पत्रकारांची लेखणी एकत्र येते तेव्हा समाजात क्रांती घडल्याशिवाय राहत नाही असे बोधले महाराज म्हणाले.

ठळक मुद्देज्ञानोबा आणि तुकाराम महाराजांची ही विचार परंपरा महाराष्ट्रात टिकून - बोधले महाराजकै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प बोधले महाराजांनी गुंफलेसंतांची वाणी आणि पत्रकारांची लेखणी एकत्र येते तेव्हा समाजात क्रांती घडल्याशिवाय राहत नाही

ठाणे: आजच्या काळात धर्म ही अफूची गोळी आहे, पुण्य भूलथाप आहे तर पाप ही धमकी आहे असा प्रकारच्या विचाराला पुरोगामी समजून प्रगत समाजव्यवस्थेत गेलो आहे असा कुठेतरी विचार व्यक्त करणारी मंडळी आपल्याला दिसतात. त्यामुळे ७५० वर्षे उलटूनही ज्ञानोबा आणि तुकाराम महाराजांची ही विचार परंपरा महाराष्ट्रात टिकून आहे असे मत ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांनी ठाण्यात मांडले.          कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प बोधले महाराजांनी गुंफले. ज्ञानोबा आणि तुकाराम महाराजांची ही विचार परंपरा ७०० - ७५० वर्षे उलटूनही कशी टिकली यावर सांगताना बोधले महाराज म्हणाले की, दहा वर्षांनतर समाजात एक माणूस चालत नाही. परंतू ज्यावेळी माणूस तिसऱ्यावेळीही निवडून येतो त्यावेळी त्याने हॅटट्रीक साधली असे म्हणतात. दहा वर्षांनंतर समाज एका व्यक्तीला मानत नाही हे समाजाचे सूत्र आहे पण ती व्यक्ती दहा वषार्नंतरही निवडून आली तर याचा अर्थ त्यातील खुबी, नस कळाली आहे. याचे कारण त्याच्या विचारांची, कार्याची समाजाला गरज वाटली किंवा समाजाच्या प्रश्नाचा त्यांच्याकडून सखोल अभ्यास आणि कार्य झालेले आहे म्हणूनच त्यांना तिसऱ्यांदा संधई दिलेली आहे. दहा वर्षे झाल्यावर माणसे माणसाला स्वीकारत नाहीत. पण ७५० वषार्नंतरही ज्ञानोबा तुकाराम मंत्र हा महाराष्ट्राच्या जीवनातील मूलमंत्र ठरतोय. या मूलमंत्राने महाराष्ट्राच्या मातीला काही दिले म्हणून आजही हा मंत्र आपल्या कानांत, मनात गुंजतोय. माणूस जातीने नव्हे तर कर्तबगारीने मोठा ठरतो हा मूलमंत्र संतांनी दिला. संतांनी नेहमी समतेचा विचार मांडला. स्त्री ही पुरूषापेक्षा उच्च वाटू नये म्हणून जुन्या काळात दक्षता घेतली जात. परंतू ज्या देशात स्त्री विकासाच्या प्रवासात नाही तो देश कधीच प्रगतीच्या वाटेने जाऊ शकत नाही आणि हा मूलमंत्र संतांनी लक्षात घेतला होता. उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सीस दी ब्रिटो यांनी चांगले भाषण केले. त्यांनी आणि मी गेली नऊ वर्षे श्री संत ज्ञानदेव तुकाराम पुरस्कार समितीवर काम केले आहे. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, मला जर साहित्याची गोडी ज्ञानदेव तुकारामांच्या वाड्.मयामुळे लागली. इतके स्पष्ट बोलणारे, पुरोगामीत्वाचे विचार समाजाला देणारे, खºया अर्थाने मानवतेचे विचारात घेऊन जाणारे ही संत मंडळी होती. एका ख्रिश्चन धर्मगुरूने संतवाड्.मयातील सिद्धांताची ही सरिता निखळ वाहती ठेवावी, त्याच्यापेक्षा संत वाड.मयातील मोठेपणा आपण कोणत्या बाजूने पहावा. मुळात आपण त्या दृष्टीकोनातून पाहतच नाही. जाती धर्माच्या पलिकडे चांगले आरोग्य आणि चांगले विचार या दोन्ही गोष्टी समाजाला आवश्यक आहे. आरोग्य नष्ट झाले तर अस्तीत्व संपेल आणि विचार विकृत झाले तर व्यक्तीसह समाजव्यवस्था अडचणीत येईल हे सांगत ते म्हणाले समाजाला संस्कार देण्याचे काम संतांनी केले असेही त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे, आ. संजय केळकर आणि प्रा. कीर्ती आगाशे उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक