शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

नोटाबंदीने विस्कटलेले संसार सावरलेच नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 03:35 IST

भुलेश्वरच्या खासगी कंपनीत कामाला असलेले दीपक नरोत्तमदास शहा हे दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीनंतर १६ नोव्हेंबर रोजी बॅसिन कॅथलिक बँकेच्या समोरील लांबलचक रांगेत उन्हातान्हात तब्बल दोन तास उभे असताना कोसळले आणि मरण पावले.

- धीरज परब  मीरा रोड : भुलेश्वरच्या खासगी कंपनीत कामाला असलेले दीपक नरोत्तमदास शहा हे दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीनंतर १६ नोव्हेंबर रोजी बॅसिनकॅथलिक बँकेच्या समोरील लांबलचक रांगेत उन्हातान्हात तब्बल दोन तास उभे असताना कोसळले आणि मरण पावले. शहा यांचे कुटुंबत्या आघातातून आजही सावरलेले नाही. छत्तीस वर्षांचे कार्तिक शहा यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांच्याकडील जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांनी उपचाराविना तडफडत प्राण सोडले. सध्या त्यांचा मेव्हणा शहाचालवत असलेली शालेय विद्यार्थ्यांना सोडणारी स्कूल व्हॅन चालवून त्यांच्या पत्नी व दोन मुलांचा सांभाळ करीत आहे.भार्इंदर पश्चिमेतील देवचंद नगरातील श्रीपालनगर येथील दीपक शहा यांचे घर गाठले. दीपक यांच्या पत्नी अश्विना तर धाकटी मुलगी दिशा या राजस्थानला नातलगांकडे गेल्याचे समजले. दिवाळीत शहा कुटुंब गेली दोन वर्षे घरी राहत नाही. त्यामुळे आजूबाजूची घरे दिव्यांची रोषणाई व कंदील यांनी उजळली असताना शहा यांचे घर काळोखात बुडून गेले होते. त्यांच्या काही शेजाऱ्यापाजाºयांकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, शहा हे मनमिळावू स्वभावाचे व शांत गृहस्थ होते. नोटाबंदी झाल्यानंतर ते त्रस्त होते. बँकेतून नोटा बदलून घेण्यासाठी किंवा पैसे काढण्याकरिता ते १६ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता गेले. दोन ते अडीच तासांनंतर त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली. दीपक हेच शहा कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती. नुकतेच त्या वेळी त्यांच्या मोठ्या मुलीचे जैनाचे लग्न झाले होते.गेली २५ वर्षे हे कुटुंब तेथेच वास्तव्य करीत आहे. शहा कुटुंबाचा चरितार्थ वडिलांनी केलेल्या गुंतवणुकीवर तसेच त्यांच्या मृत्यूपश्चात मिळालेल्या प्रॉव्हिडंट फंड व ग्रॅच्युईटीच्या पैशावर चालत असावा, असा अंदाज शेजाºयांनी व्यक्त केला. शहा यांचा मृत्यू नोटाबंदीमुळे झाला, अशी नोंद करून घ्यायलाही पोलिसांनी शेवटपर्यंत नकार दिला. त्यांच्या कुटुंबाला सरकारने मदत वगैरे देणे तर दूरच राहिले. शहा यांच्यासारखी शेकडो कुटुंबे नोटाबंदीच्या निर्णयानंतर कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने पोरकी झाली. मात्र सरकारने कुणाचीहीजबाबदारी घेतली नाही. उलट नोटाबंदी हीच कशी हितावह आहे, याची लंबीचौडी भाषणे दिली, याबद्दल शहा यांच्या शेजाºयांनी तीव्रनापसंती व्यक्त केली. भार्इंदर पश्चिमेतील शिवसेना गल्लीतील हमीरमल कुटीरमध्ये राहणारे कार्तिक शहा हे घराजवळील जिन्यापाशी कोसळले. शेजाºयांनी त्यांना तातडीने डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी आपल्या ७०० रुपयांच्या फीकरिता जुन्या नोटा स्वीकारण्यासनकार दिला. त्यामुळे कार्तिक यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचे निधन झाले. कार्तिक हे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारी व्हॅन चालवून कुटुंबाची जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या पश्चात पत्नी डिंपल, एक १४ वर्षांची मुलगी व १० वर्षांचा पुत्र वर्धमान असा परिवार आहे. कार्तिक यांचे मेव्हणे माहिपाल पटेल यांनी आता या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे. कार्तिक यांची स्कूल व्हॅनचालवून ते या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. कार्तिक यांच्यावर उपचार करण्यास नकार देणाºया डॉक्टरवर कारवाई करण्याची शहा कुटुंबाची मागणी अदखलपात्र राहिली. नोटाबंदी झालेली नसती तर कार्तिक यांच्यावर वेळीच उपचार झाले असते व कदाचित ते वाचले असते, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. नोटाबंदीमुळे अनेक कुटुंबाची अपरिमित हानी झाली. ती कोण भरून देणार, असा सवाल शहा यांच्या निकटवर्तीयांनी केला.नोटाबंदीचा त्रासलोकप्रतिनिधी व बड्यानेत्यांना झाल्याचे दिसतनाही. रांगा लावून मरणपावली ती सामान्यमाणसंच. नोकºया गेल्या,रोजगार बुडाला, महागाईवाढली. नोटाबंदीचाफायदा झालाच असेलतर तो बडे नेते,लोकप्रतिनिधी आणि बडेउद्योजक यांनाच झालाआहे. भ्रष्टाचार कमीझालेला नाही. सामान्यलोकांच्या यातना काहीकमी झालेल्या नाहीत.- दीपिका अ. पाटील,तरु णीदोन वर्षांपूर्वीदेशात अचानक नोटाबंदी लागू करण्यात आली.माझ्यासारख्या रिक्षाचालकाला मनातून वाटले की,चला देशातील काळा पैसा बाहेर येईल.श्रीमंतांची गोची करणारा सरकारचा निर्णयचांगला आहे. मात्र दोनच दिवसांत हा निर्णयकिती घातक आहे, याची प्रचिती आली. दोनवर्षे उलटून गेली तरी त्याच्या झळा नागरिकांनाबसत आहेत. विशेषकरून आमच्यासारख्यारिक्षाचालकांना एखाद्या प्रवाशाने दोन हजाररुपयांची नोट दिली की, सुट्टे पैसे कुठूनआणायचे असा प्रश्न पडतो. अन्य नोटाहीबाजारात हळूहळू आल्या. हा निर्णय चुकीचाहोता. - नरेंद्र घुगे, रिक्षाचालकनोटाबंदीचा फटका केवळ सामान्यांना बसलानाही. तर उद्योजकांनाही बसला. अनेकउद्योजकांनी त्या वेळी प्रतिक्रियादिल्या होत्या की, नोटाबंदीमुळे धंदा घाट्यातआला. जास्त फटका सामान्यांनी सहन केलाअसेल तर त्याच्या पाठोपाठ उद्योजकांनाहीबसला. नोटाबंदीमुळे पगार थकले होते.अनेक उद्योजकांची नोटाबंदीत घसरलेलीगाडी अद्याप रुळावर आलेली नाही.सगळ्याच अर्थव्यवस्थेला मोठा फटकाबसला. भारत कॅशलेस न होता बेसलेसझाला तेही अर्थकारणाच्या बाबतीत. याच्याझळा भाजपाला २०१९ च्या निवडणुकीत बसूशकतात. -स्वप्निल पवार, इंजिनीअर

टॅग्स :Note BanनोटाबंदीDemonetisationनिश्चलनीकरण