शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

झोपडपट्ट्यांतून जाहिरातींचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:31 IST

पालिका, रेल्वेचे नुकसान : अंबरनाथ स्थानक परिसरात बेकायदा फलक, दलालांसोबत आर्थिक हितसंबंध

अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या स्वामीनगर झोपडपट्टीत जाहिरातींचा व्यवसाय तेजीत आला आहे. स्थानकाला लागूनच झोपडपट्टी असल्याने अनेक झोपडपट्टीधारकांनी जाहिराती करणाऱ्या दलालांसोबत आर्थिक हितसंबंध तयार करून आपल्या झोपडीसमोर जाहिरातीचे फलक लावण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या जाहिरात फलकांवर जाहिरातीही प्रसिद्ध होत आहेत. जाहिरातींचा महसूल ना रेल्वेला, ना पालिकेला. त्यामुळे या बेकायदा जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

अंबरनाथ फलाट क्रमांक-१ आणि २ च्या समोरच स्वामीनगरची मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टी आणि स्थानकामध्ये काहीच नसल्याने स्थानकातून थेट या झोपड्या दिसतात. स्थानक परिसरातील जाहिरात फलकांवर रेल्वे लाखो रुपये उत्पन्न मिळवत आहे. त्यामुळे आता या भागातील झोपडपट्टीधारकांना हाताशी धरून काही दलालांनी जाहिरातीचा बेकायदा व्यवसाय सुरू केला आहे. रेल्वेस्थानकाला समांतर असलेल्या झोपड्यांसमोरच मोठे जाहिरातीचे फलक उभारण्यात आले आहेत. काही फलक झोपड्यांवर आहेत, तर काही झोपड्यांसमोर लावण्यात आले आहेत. हे फलक रेल्वेस्थानकात उभे राहणाºया सर्व प्रवाशांना दिसत असल्याने या बेकायदा फलकांवर जाहिरात करण्यासाठीही अनेक व्यावसायिक पुढे आले आहेत.

स्थानकासमोर चार ते पाच बेकायदा फलक उभारण्यात आले असून या सर्व फलकांवर बिल्डर, चाळींचे बांधकाम करणारे बिल्डर आणि डॉक्टरांच्या जाहिराती झळकत आहेत. या बेकायदा जाहिरात फलकांवर नियंत्रण मिळवण्याची गरज व्यक्त होत आहे. ज्या जाहिरातींचे फलक स्थानकाच्या परिसरात लावण्यात आले आहेत, ती जागा पालिकेच्या हद्दीत आहे. तर, त्याला लागूनच आता अंबरनाथ स्थानकात होम प्लॅटफॉर्म उभारला जात असल्याने या जाहिरातींना आणखी तेजी येणार आहे. त्यामुळे या जाहिरातींचे फलक उभारणाऱ्यांकडून दंडात्मक वसुली करण्याची मागणी केली जात आहे.

दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने जाहिरातींचे फलक मोठ्या प्रमाणात लावल्यामुळे स्थानकात येणाºया नैसर्गिक हवेचा मार्गच बंद केला आहे. हवेच्या मार्गामध्ये जाहिरात फलक येत असल्याने स्थानक आणि स्थानक परिसरातील काही फलक काढण्याची गरज व्यक्त होत आहे. चारही बाजूने जाहिरात फलकांचा विस्तार होत असून त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही.प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोकास्थानकात ज्या ठिकाणी प्रवासी उभे राहतात, तेथे त्यांच्या डोक्यावरही लहान फलक तारेने बांधून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे एखादा फलक प्रवाशांच्या डोक्यावर पडून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने तातडीने असे धोकादायक फलक काढावे अशी मागणी केली जात आहे.