शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
4
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
5
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
7
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
8
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
9
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
10
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
11
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
12
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
13
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
14
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
15
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
16
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
17
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
18
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
19
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
20
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर

ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात एकावेळी एका जोडप्याला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सोमवारपासून राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले असून ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात विवाहासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : सोमवारपासून राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले असून ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात विवाहासाठी येणाऱ्या जोडप्यांसाठीही कडक नियम लागू केले आहेत. यात एकावेळी एकाच जोडपे आणि त्यासोबत येणारे तीन साक्षीदार याशिवाय इतर नातेवाइकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, या कार्यालयात येण्याआधी जोडप्यांनी आधीच वेळ आरक्षित करणे बंधनकारक आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारला संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू करावे लागले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर अनेकांना आपले विवाह. सोहळे रद्द करावे लागले तर काहींना पुढे ढकलावे लागले होते. लॉकडाऊनचे नियम शिथिल केले असले तरी गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विवाहसोहळ्यातील उपस्थितींवर मर्यादा आणण्यात आली. त्यामुळे अनेकांनी थाटात लग्नसोहळे पार पाडण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याला पसंती दिली आणि त्याची संख्या लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात वाढली. परंतु, मार्च महिन्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट पाहता पुन्हा एकदा कडक नियम लागू करावे लागले आहेत. विवाहसोहळ्यासाठी येणाऱ्या जोडप्यांना या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यांना सोबत नातेवाईक आणता येणार नाही. गर्दी टाळण्यासाठी वधू, वर आणि तीन साक्षीदार यांनाच प्रवेश दिला जाईल. एका जोडप्याला विवाहाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास दिला जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी विवाहेच्छुक जोडप्यांनी वेळेची आगाऊ नोंदणी करणे बंधनकारक आहे. एखाद्या जोडप्याने एक वेळ आरक्षित केल्यास दुसऱ्या जोडप्याला ती वेळ घेता येणार नाही. जोडप्यांना केवळ फोटो काढण्यापुरतेच चेहऱ्यावरील मास्क काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. पक्षकारांनी स्वतःचे पेन वापरावे, इतरांकडे पेन मागू नये तसेच, कार्यालयात येताना दस्तऐवज आणि संबंधित कागदपत्रे याव्यतिरिक्त बॅग, पर्स नेण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती विवाह नोंदणी कार्यालयाचे यादव यांनी दिली. या व इतर सूचनांची माहिती देणारे फलक विवाह कार्यालयाच्या बाहेरदेखील लावले आहेत.