शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

स्मार्ट सिटीच्या रखडपट्टीवरून प्रशासनाला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST

ठाणे : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून किती प्रकल्प पूर्ण झाले, केंद्राकडून किती निधी आला, नवीन स्टेशनची अद्यापही उभारणी का झाली ...

ठाणे : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून किती प्रकल्प पूर्ण झाले, केंद्राकडून किती निधी आला, नवीन स्टेशनची अद्यापही उभारणी का झाली नाही, २०१२ मध्ये जी लोकसंख्या अपेक्षित धरली होती, त्यात आता किती पटीने वाढ झाली आहे, त्या अनुषंगाने या प्रकल्पात काही बदल केले आहेत का या व अशा मुद्द्यावरून स्मार्ट सिटीच्या सदस्यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासनाला अडचणीत आणले. अखेर पुढील बैठकीत या सर्व प्रश्नांची लेखी माहिती दिली जाईल, असे आश्वासन देऊन प्रशासनाने वेळ मारून नेली.

सोमवारी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात स्मार्ट सिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी स्मार्ट सिटीच्या कामांच्या सद्य:स्थितीचा अहवाल मागितला. नवीन स्टेशनचे कामकाज २०१२ पासून आजही अपूर्ण आहे. त्यावेळेस ठाणे आणि मुलुंडचा काही अंशी भार हलका होईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु, आज २०२१ संपत आले तरीदेखील हा प्रकल्प सुरू झालेला नाही. त्यामुळे या मधल्या काळात जी लोकसंख्या वाढली, त्या अनुषंगाने प्रकल्पात काही बदल करण्यात आले आहेत का, असा सवाल चव्हाण यांनी केला. तसेच ठाणे पूर्वेकडील सॅंटीसबाबतही अशीच रखडपट्टी झाल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. त्या अनुषंगाने त्याचे नव्याने नियोजन करण्यात आले आहे का, असा सवाल त्यांनी केला.

शानू पठाण यांनी पारसिक चौपाटीचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित ३० टक्के काम पूर्ण करण्यात काय अडचण आहे, असा सवाल केला. तसेच इतर प्रकल्पांची कामे मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार या कामांची माहिती लेखी स्वरूपात पुढील बैठकीत दिली जाईल, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

...........