शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

प्रशासकीय मात केली : सत्ताकारणाचे काय?

By admin | Updated: September 7, 2015 22:56 IST

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे भाजपाने शिवसेनेवर प्रशासकीय मात केली असली तरीही राजकीय पटलावर या निर्णयामुळे नेमके कोणाचे वर्चस्व सिद्ध होते, हे बघणे औत्सुक्याचे आहे.

डोंबिवली : राज्य शासनाच्या या निर्णयामुळे भाजपाने शिवसेनेवर प्रशासकीय मात केली असली तरीही राजकीय पटलावर या निर्णयामुळे नेमके कोणाचे वर्चस्व सिद्ध होते, हे बघणे औत्सुक्याचे आहे. सध्या कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचा आमदार असून बहुतांशी ग्रामपंचायतीही शिवसेनेकडेच आहेत. केवळ दोन ग्रामपंचायती भाजपाकडे आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजपाला एकहाती वर्चस्व मिळवतांना नाकीनऊ येणार आहे. या सर्वांमध्ये संघर्ष समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार असून ते नेमके कोणाला सहकार्य करतात, ते महत्त्वाचे आहे.सूत्रांच्या माहितीनुसार संघर्ष समितीला वेगळी नगरपालिका, असा निर्णय देताना मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी भाजपाला सहकार्य करण्याचे सांगण्यात आले आहे. समितीनेही ते मान्य केल्याचे सांगण्यात आले. असे असेल झाले तर मात्र शिवसेनेची कोंडी होऊ शकते. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फटका सेनेला बसेल, या भ्रमामध्ये भाजपाचे नेते आहेत. तर, शिवसेनेने मात्र याबाबत कोणतीही भूमिका अथवा प्रतिक्रिया न देता अळीमिळी गुपचिळी धोरण स्वीकारले.पालकमंत्री भीमाशंकरला? : राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. ते भीमाशंकरा गेले असून त्यांचा फोन लागत नसल्याचे सांगितले. केडीएमसीत कोण बाजी मारणार? राज्य शासनाच्या या निर्णयामुळे केडीएमसीच्या निवडणुका वेळेवर होणार की नाही, हा पेच असून त्यात युती टिकेल की नाही, या चर्चेलाही उधाण आले आहे. एकीकडे भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते-पदाधिकारी आणि नेतेही वेगळे लढण्याची भाषा करत आहेत. अनेक वॉर्डांमध्ये त्या दृष्टीने तयारीही करण्यात आली असून उमेदवारही निश्चित करण्यात आले आहेत. तसे झाल्यास इथे कोण बाजी मारणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.पालकमंत्र्यांना ठेवले अंधारात :या निर्णयासंदर्भात शनिवारी झालेल्या बैठकीसह सोमवारच्या निर्णयापासूनही पालकमंत्र्यांना अंधारात ठेवले असल्याचे स्पष्ट झाले. डोंबिवलीत आज ते आले होते, तेव्हा २७ गावांबाबत त्यांनी भाष्य करत भाजपाला चिमटा काढला होता. मात्र, संध्याकाळीच हा निर्णय आल्याने त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रफुल्ल देशमुख यांनी याबाबत भाजपाचा महम्मद तुघलकी कारभार... अशा शब्दांत व्हॉट्सअ‍ॅपवर प्रतिक्रिया दिली. आता खुद्द भाजपामध्ये या निर्णयाच्या श्रेयासाठी साठमारी सुरू आहे. (प्रतिनिधी)