शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

काशीमिरामध्ये आदिवासी वसतिगृह

By admin | Updated: April 10, 2017 05:37 IST

मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील नियोजित आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी

 भार्इंदर : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील नियोजित आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यावर ३० कोटी देण्यास आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत तत्वत: मंजुरी दिली. कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले. यामुळे मे महिन्यात वसतिगृहाच्या कामाला सुरूवात होण्याची शक्यता सरनाईक यांनी व्यक्त केली. बैठकीला आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा, आयुक्त राजीव जाधव, मीरा-भाईंदर पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. मीरा-भार्इंदर पालिका हद्दीला लागून असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह त्याच्या सीमेवर अनेक आदिवासी पाडे आहेत. त्यातील झोपडीवजा घरात आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो. त्यांना पक्क्या जागेत अभ्यास करता यावा यासाठी सरनाईक २०१३ पासून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. यानुसार काशीमिरा परिसरातील मुन्शी कंम्पाउंडच्या मीरागावच्या सर्र्वे क्र. १९३ (जुना) ८ (नवीन) मधील ६ हजार ६०० चौरसमीटर जागा महसूल विभागाची आहे. त्यातील २ हजार ३७१ चौरसमीटर जागेवर अतिक्रमण झाले असून उर्वरित जागेवर शाळा बांधण्यासाठी पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २०११ पासून पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने ही जागा देण्यापोटी पालिकेला १६ कोटी ८३ लाख जमा करण्यास सांगितले होते. या व्यवहारादरम्यान आदिवासी विभागाने ती जागा वसतिगृहाकरिता मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने २०१३ मध्ये विभागाला ४ हजार २२९ चौरसमीटर जागा मोफत दिली. जागा ताब्यात आल्यानंतर राज्य सरकारने त्या ठिकाणी आदिवासी मुलामुलींसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेत ते पालिकेने बांधण्याचे ठरविले. बांधकामासाठी येणारा खर्च राज्य सरकारच्या आदिवासी विभागाने देण्याचे निश्चित झाल्यानंतर तसे पत्र पालिकेला पाठविले. त्यानुसार ११ डिसेंबर २०१३ च्या महासभेत वसतिगृह ठरावाला मान्यता दिली. (प्रतिनिधी)१६४ खोल्या बांधण्यात येणारपालिकेने २० फेब्रुवारी २०१४ मध्ये २० कोटी ६० लाख ८७ हजार ७७८ खर्चाच्या बांधकामाचा प्रस्ताव आदिवासी विभागाकडे मान्यतेसाठी पाठविला. त्याला तत्कालिन आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी १९ आॅगस्ट २०१४ च्या बैठकीत मान्यता दिली. दरम्यान महागाईमुळे वसतिगृहाचा खर्च वाढल्याने तो ३० कोटीवर गेला. नियोजित वसतिगृह ४ हजार २२९.२० चौरसमीटर जागेवर बांधण्यात येणार असले तरी मंजूर १.५ चटई क्षेत्राप्रमाणे एकूण ६,०९३.७४ चौरसमीटर क्षेत्रावर ७ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. त्यात प्रत्येकी दोन मुलांची क्षमता असलेल्या १६१ चौरस फुटाच्या १६४ खोल्या बांधण्यात येणार आहेत. त्याचे भूमिपूजन २८ आॅगस्ट २०१४ मध्ये झाले.