शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

काशीमिरामध्ये आदिवासी वसतिगृह

By admin | Updated: April 10, 2017 05:37 IST

मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील नियोजित आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी

 भार्इंदर : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील नियोजित आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यावर ३० कोटी देण्यास आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत तत्वत: मंजुरी दिली. कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले. यामुळे मे महिन्यात वसतिगृहाच्या कामाला सुरूवात होण्याची शक्यता सरनाईक यांनी व्यक्त केली. बैठकीला आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा, आयुक्त राजीव जाधव, मीरा-भाईंदर पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. मीरा-भार्इंदर पालिका हद्दीला लागून असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह त्याच्या सीमेवर अनेक आदिवासी पाडे आहेत. त्यातील झोपडीवजा घरात आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो. त्यांना पक्क्या जागेत अभ्यास करता यावा यासाठी सरनाईक २०१३ पासून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. यानुसार काशीमिरा परिसरातील मुन्शी कंम्पाउंडच्या मीरागावच्या सर्र्वे क्र. १९३ (जुना) ८ (नवीन) मधील ६ हजार ६०० चौरसमीटर जागा महसूल विभागाची आहे. त्यातील २ हजार ३७१ चौरसमीटर जागेवर अतिक्रमण झाले असून उर्वरित जागेवर शाळा बांधण्यासाठी पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २०११ पासून पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने ही जागा देण्यापोटी पालिकेला १६ कोटी ८३ लाख जमा करण्यास सांगितले होते. या व्यवहारादरम्यान आदिवासी विभागाने ती जागा वसतिगृहाकरिता मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने २०१३ मध्ये विभागाला ४ हजार २२९ चौरसमीटर जागा मोफत दिली. जागा ताब्यात आल्यानंतर राज्य सरकारने त्या ठिकाणी आदिवासी मुलामुलींसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेत ते पालिकेने बांधण्याचे ठरविले. बांधकामासाठी येणारा खर्च राज्य सरकारच्या आदिवासी विभागाने देण्याचे निश्चित झाल्यानंतर तसे पत्र पालिकेला पाठविले. त्यानुसार ११ डिसेंबर २०१३ च्या महासभेत वसतिगृह ठरावाला मान्यता दिली. (प्रतिनिधी)१६४ खोल्या बांधण्यात येणारपालिकेने २० फेब्रुवारी २०१४ मध्ये २० कोटी ६० लाख ८७ हजार ७७८ खर्चाच्या बांधकामाचा प्रस्ताव आदिवासी विभागाकडे मान्यतेसाठी पाठविला. त्याला तत्कालिन आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी १९ आॅगस्ट २०१४ च्या बैठकीत मान्यता दिली. दरम्यान महागाईमुळे वसतिगृहाचा खर्च वाढल्याने तो ३० कोटीवर गेला. नियोजित वसतिगृह ४ हजार २२९.२० चौरसमीटर जागेवर बांधण्यात येणार असले तरी मंजूर १.५ चटई क्षेत्राप्रमाणे एकूण ६,०९३.७४ चौरसमीटर क्षेत्रावर ७ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. त्यात प्रत्येकी दोन मुलांची क्षमता असलेल्या १६१ चौरस फुटाच्या १६४ खोल्या बांधण्यात येणार आहेत. त्याचे भूमिपूजन २८ आॅगस्ट २०१४ मध्ये झाले.