शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

"मी ठाण्यातून लढण्यास तयार, सत्तेत आल्यास विराेधक तुरुंगात"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 08:53 IST

आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. याच ठाण्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढायला मी तयार आहे.  मी लढणार आणि जिंकूनही दाखवणार, असे खुले आव्हान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिले. पुन्हा आमचे सरकार आल्यावर विरोधकांना जेलभरो यात्रा घडविण्याचा इशारा त्यांनी दिला.

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ बुधवारी ठाण्यात महाविकास आघाडीतर्फे ‘जनप्रक्षोभ मोर्चा’ काढण्यात आला. यानंतर शक्तिस्थळावर झालेल्या सभेत ते बोलत होते. आदित्य म्हणाले, ठाण्यात महिलेवर अत्याचार होत असताना मुख्यमंत्री एक शब्द बोलत नाही, याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे मी इथे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी नव्हे, तर त्यांचे कौतुक करण्यासाठी आलो आहे, असा उपरोधिक सूर त्यांनी लावला. मिंधेंच्या चिंधीचोरांनी एका महिलेला मारहाण केली. मात्र, तिची तक्रार घेतली नाही. उलट तिच्याविरोधातच गुन्हा दाखल होतो, हा कोणता न्याय आहे, असा सवालही त्यांनी केला. 

आदित्य म्हणाले की, सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे यांच्याविषयी गलिच्छ भाषेत बोलले जाते; पण त्या नेत्यांवर कारवाई होत नाही. उलट त्यांच्या पाठीवर मुख्यमंत्री कौतुकाची थाप मारतात हे दुर्दैवी आहे. गुंडांना पाठबळ दिले जात आहे, यातून फडणवीसांचे नाव खराब होत आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामामुळेच त्यांना कुटुंबप्रमुख म्हणून बोलले जाते.

तुम्हारा नाम भुला देंगे- राज्यातील सरकारला ‘चले जाव’ करायची वेळ आली आहे. हमारा नामोनिशाण मिटाने चले हो, माझे नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे आहे. त्यामुळे सामने आओ हम तुम्हारा नाम भुला देंगे, असा इशाराही त्यांनी दिला.

चोरांच्या टोळीचे कृत्य- तक्रार करण्यासाठी गेलो असता, पोलिस आयुक्तही पळून जातात; पण याबद्दल कोणाला काय बोलणार? ज्यांच्या पक्षाचे सरकार आहे, त्यांनी पक्ष चोरलेला आहे, त्यामुळे चोरांची टोळी हे कृत्य करू शकते, असेही ते म्हणाले.

आमचे सरकार येणार, विसरू नका- सध्या तुम्हाला आमच्यावर किती गुन्हे दाखल करायचे ते करा. मात्र, पुन्हा आमचे सरकार येणार आहे, हे विसरू नका. जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा तुम्हा सर्वांना ‘जेलभरो यात्रा’ घडविली नाही तर बघा, असा इशारा आदित्य यांनी दिला. आम्ही आता ‘मविआ’ची वज्रमूठ केली आहे. ठाणेकरांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन केले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे