शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
6
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
7
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
8
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
9
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
10
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
11
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
12
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
13
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
14
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
15
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
16
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
17
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
18
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
19
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
20
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मृतांमध्ये ‘संशयितांच्या’ अहवालाची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:06 IST

कल्याण : सध्या कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी काही दिवसांपासून ...

कल्याण : सध्या कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी काही दिवसांपासून मृतांची संख्या आठ ते तेरा आहे. ही वाढलेली संख्या चिंताजनक असली तरी मृत्युमुखी पडणारे रुग्ण केवळ २४ तासांतील नाहीत. जे रुग्ण कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल होतात आणि मृत पावतात त्यांच्या कोरोना चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल दोन ते तीन दिवसांनी मिळतो. त्यामुळे या अहवालानुसार त्या मृतांचाही यात समावेश केला जात असल्याने मृतांचा आकडा काहीसा वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

केडीएमसी हद्दीत आजवर एक लाख २२ हजार ७७३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक हजार ४६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख ११ हजार ३८० रुग्ण बरे झाले आहेत. तर सोमवारपर्यंतचा आढावा घेता सध्या नऊ हजार ९३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केला. या महिन्यात कोरोनाचे ४१ हजार ५५१ नवे रुग्ण आढळले आहेत. ३७ हजार ६२० रुग्ण महिनाभरात उपचाराअंती बरे झाले असले तरी १७८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सध्या कोरोनाच्या नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये काहीशी घट झाली असली तरी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत चार ते पाच रुग्णांचा मृत्यू व्हायचा; परंतु २१ एप्रिलपासून यात वाढ होऊन मृतांचा आकडा आठ ते १० पर्यंत गेला. ३० एप्रिलला तर १३ जणांचा मृत्यू झाला होता. ही आजवरची मृतांची सर्वोच्च संख्या आहे. सध्या मृतांचे प्रमाण आठ ते १० च्या आसपास आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मनपा हद्दीतील मृत्यूदर १.६७ टक्के इतका होता. तिसऱ्या आठवड्यात तो १.२६ टक्क्यापर्यंत कमी झाला तर सध्या मृतांची संख्या वाढलेली दिसत असली तरी मृत्यूदर १.१९ टक्के इतका आहे.

सुरुवातीपासूनच मृत्यूदर कमी

रूक्मिणीबाई रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांपैकी काही जण उपचारादरम्यान मृत्यू पावतात. अशा रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी गेलेले असतात. त्याचा रिपोर्ट अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर एमसीआरकडून आलेल्या अहवालानुसारच त्याची ‘कोरोनाने मृत्यू’ अशी नोंद केली जाते. हे अहवाल दोन ते तीन दिवसांच्या फरकाने उपलब्ध होतात. त्यांचाही समावेश दैनंदिन जाहीर केल्या जात असलेल्या मृतांच्या आकडेवारीत केला जातो. त्यामुळे सर्वच मृत रुग्ण हे २४ तासांतीलच असतात असे नाही, तसेच आपल्याकडे सुरुवातीपासूनच मृत्यूदर हा कमी आहे, ही समाधानाची बाब आहे, असे केडीएमसीच्या साथरोग नियंत्रक विभागाच्या अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.

--------------------