शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

कोरोना मृतांमध्ये ‘संशयितांच्या’ अहवालाची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:06 IST

कल्याण : सध्या कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी काही दिवसांपासून ...

कल्याण : सध्या कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी काही दिवसांपासून मृतांची संख्या आठ ते तेरा आहे. ही वाढलेली संख्या चिंताजनक असली तरी मृत्युमुखी पडणारे रुग्ण केवळ २४ तासांतील नाहीत. जे रुग्ण कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल होतात आणि मृत पावतात त्यांच्या कोरोना चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल दोन ते तीन दिवसांनी मिळतो. त्यामुळे या अहवालानुसार त्या मृतांचाही यात समावेश केला जात असल्याने मृतांचा आकडा काहीसा वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

केडीएमसी हद्दीत आजवर एक लाख २२ हजार ७७३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक हजार ४६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख ११ हजार ३८० रुग्ण बरे झाले आहेत. तर सोमवारपर्यंतचा आढावा घेता सध्या नऊ हजार ९३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केला. या महिन्यात कोरोनाचे ४१ हजार ५५१ नवे रुग्ण आढळले आहेत. ३७ हजार ६२० रुग्ण महिनाभरात उपचाराअंती बरे झाले असले तरी १७८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सध्या कोरोनाच्या नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये काहीशी घट झाली असली तरी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत चार ते पाच रुग्णांचा मृत्यू व्हायचा; परंतु २१ एप्रिलपासून यात वाढ होऊन मृतांचा आकडा आठ ते १० पर्यंत गेला. ३० एप्रिलला तर १३ जणांचा मृत्यू झाला होता. ही आजवरची मृतांची सर्वोच्च संख्या आहे. सध्या मृतांचे प्रमाण आठ ते १० च्या आसपास आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मनपा हद्दीतील मृत्यूदर १.६७ टक्के इतका होता. तिसऱ्या आठवड्यात तो १.२६ टक्क्यापर्यंत कमी झाला तर सध्या मृतांची संख्या वाढलेली दिसत असली तरी मृत्यूदर १.१९ टक्के इतका आहे.

सुरुवातीपासूनच मृत्यूदर कमी

रूक्मिणीबाई रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांपैकी काही जण उपचारादरम्यान मृत्यू पावतात. अशा रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी गेलेले असतात. त्याचा रिपोर्ट अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर एमसीआरकडून आलेल्या अहवालानुसारच त्याची ‘कोरोनाने मृत्यू’ अशी नोंद केली जाते. हे अहवाल दोन ते तीन दिवसांच्या फरकाने उपलब्ध होतात. त्यांचाही समावेश दैनंदिन जाहीर केल्या जात असलेल्या मृतांच्या आकडेवारीत केला जातो. त्यामुळे सर्वच मृत रुग्ण हे २४ तासांतीलच असतात असे नाही, तसेच आपल्याकडे सुरुवातीपासूनच मृत्यूदर हा कमी आहे, ही समाधानाची बाब आहे, असे केडीएमसीच्या साथरोग नियंत्रक विभागाच्या अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.

--------------------