शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

कोरोना मृतांमध्ये ‘संशयितांच्या’ अहवालाची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:06 IST

कल्याण : सध्या कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी काही दिवसांपासून ...

कल्याण : सध्या कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी काही दिवसांपासून मृतांची संख्या आठ ते तेरा आहे. ही वाढलेली संख्या चिंताजनक असली तरी मृत्युमुखी पडणारे रुग्ण केवळ २४ तासांतील नाहीत. जे रुग्ण कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल होतात आणि मृत पावतात त्यांच्या कोरोना चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल दोन ते तीन दिवसांनी मिळतो. त्यामुळे या अहवालानुसार त्या मृतांचाही यात समावेश केला जात असल्याने मृतांचा आकडा काहीसा वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

केडीएमसी हद्दीत आजवर एक लाख २२ हजार ७७३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक हजार ४६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख ११ हजार ३८० रुग्ण बरे झाले आहेत. तर सोमवारपर्यंतचा आढावा घेता सध्या नऊ हजार ९३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केला. या महिन्यात कोरोनाचे ४१ हजार ५५१ नवे रुग्ण आढळले आहेत. ३७ हजार ६२० रुग्ण महिनाभरात उपचाराअंती बरे झाले असले तरी १७८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सध्या कोरोनाच्या नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये काहीशी घट झाली असली तरी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत चार ते पाच रुग्णांचा मृत्यू व्हायचा; परंतु २१ एप्रिलपासून यात वाढ होऊन मृतांचा आकडा आठ ते १० पर्यंत गेला. ३० एप्रिलला तर १३ जणांचा मृत्यू झाला होता. ही आजवरची मृतांची सर्वोच्च संख्या आहे. सध्या मृतांचे प्रमाण आठ ते १० च्या आसपास आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मनपा हद्दीतील मृत्यूदर १.६७ टक्के इतका होता. तिसऱ्या आठवड्यात तो १.२६ टक्क्यापर्यंत कमी झाला तर सध्या मृतांची संख्या वाढलेली दिसत असली तरी मृत्यूदर १.१९ टक्के इतका आहे.

सुरुवातीपासूनच मृत्यूदर कमी

रूक्मिणीबाई रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांपैकी काही जण उपचारादरम्यान मृत्यू पावतात. अशा रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी गेलेले असतात. त्याचा रिपोर्ट अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर एमसीआरकडून आलेल्या अहवालानुसारच त्याची ‘कोरोनाने मृत्यू’ अशी नोंद केली जाते. हे अहवाल दोन ते तीन दिवसांच्या फरकाने उपलब्ध होतात. त्यांचाही समावेश दैनंदिन जाहीर केल्या जात असलेल्या मृतांच्या आकडेवारीत केला जातो. त्यामुळे सर्वच मृत रुग्ण हे २४ तासांतीलच असतात असे नाही, तसेच आपल्याकडे सुरुवातीपासूनच मृत्यूदर हा कमी आहे, ही समाधानाची बाब आहे, असे केडीएमसीच्या साथरोग नियंत्रक विभागाच्या अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.

--------------------