शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शेतीला मत्स्योत्पादनाची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:38 IST

भातसानगर : शहापूर तालुक्यातील शेतकरी सध्या शेतीला मत्स्योत्पादनाची जोड देत असून, शेततळ्यांच्या मदतीने लाखोंचे उत्पादन घेऊ लागले आहेत. तालुक्यात ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील शेतकरी सध्या शेतीला मत्स्योत्पादनाची जोड देत असून, शेततळ्यांच्या मदतीने लाखोंचे उत्पादन घेऊ लागले आहेत.

तालुक्यात केवळ पावसाळ्यात शेती केली जाते. मात्र, अनेक प्रकारची संकटे येत असल्याने शेतकरी देशोधडीला लागलेला असतानाच आता त्यांनी शेतीला मत्स्य उत्पादनाची जोड दिली आहे.

तालुक्यातील वेहलोंढे या गावी जितेश विशे या शेतकऱ्याने आपल्या शेततळ्यातून सध्या लाखो रुपयांचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. सरकारी अनुदान मिळाले असून, या अनुदानातून त्यांनी शेततळे तयार केले आहे. यामध्ये रोहू कटला, मिर्गल यांसारख्या माशांचे बियाणे टाकले आहे. आजघडीला मासे एक किलोच्या वजनाचे झाले असून, त्यांना बाजारात मोठी मागणी आहे.

यामधून त्यांनी आतापर्यंत एक लाख रुपये उत्पन्न घेतले असून, आणखी दोन लाखापर्यंत उत्पन्न मिळेल, असा आशावाद विशे यांनी व्यक्त केला आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी अशा प्रकारची शेती केली तर निश्चितच त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आपल्या शेतामध्ये पाणीसुद्धा अडवले जाईल. त्यामुळे इतर पिकेही घेणे सहज शक्य होईल.

तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने शेततळी निर्माण झाली असून, यासाठी सरकार त्यांना अनुदान देत असल्याने त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. या शेतीतून आपल्याला कमी खर्चात अधिक उत्पादन घेता येते. अशा प्रकारची योजना ही खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

--------------------------------

फोटो ओळ : जितेश विशे यांनी सरकारी अनुदानातून शेततळे तयार केले आहे. (छाया : जनार्दन भेरे)