शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

कुंभमेळा यात्रेकरूंवर काळाचा घाला

By admin | Updated: September 29, 2015 23:41 IST

कुंभमेळ्यासाठी झारखंड येथून आलेल्या भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात २ ठार तर १४ जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास

कसारा : कुंभमेळ्यासाठी झारखंड येथून आलेल्या भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात २ ठार तर १४ जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा-उंबरमाळी पॉवर हाऊस येथे घडली.झारखंडमधील चैनपूर जिल्ह्यातून १५ जणांचा ग्रुप नाशिक येथे शाहीस्नानासाठी आला होता. २५ सप्टेंबरला शाहीस्रान आटोपून हे भाविक दुसऱ्या दिवशी शिर्डी-शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी गेले. त्यानंतर, रविवारी रात्री १० वा. शिर्डीहून साई निर्माण ट्रॅव्हल्सची मिनीबस भाड्याने घेऊन मुंबई दर्शनासाठी निघाले. मुंबई दर्शन करून मुंबईहूनच झारखंडसाठी परतीच्या प्रवासाचे तिकीट असलेल्या या भाविकांची बस भरधाव वेगात कसाऱ्याहून जात असताना चालक बाबुराव घोरपडे, रा. नगर यांचा गाडीवरील ताबा सुटला व ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या (बंद पडलेल्या) रेतीच्या ट्रकवर जाऊन आदळली. यात बसचा पूर्ण चक्काचूर झाला. यात बसमधील अमरप्रसाद गुप्ता (५२), गायत्रीदेवी गुप्ता (५०) हे पती-पत्नी जागीच ठार झाले, तर चालक बाबुराव घोरपडे यांच्यासह चंपादेवी, फुलवंतीदेवी, नवलकिशोर, गायत्रीदेवी, शारदा कुंवर, कलावतीदेवी, प्रदीप शर्मा, अवंतकुमार कुंवर, पार्वती कुंवर यांच्यासह अन्य चार जण गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना नाशिक सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. (वार्ताहर)