शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

पर्यटनातून ‘भारत जोडो’

By admin | Updated: November 17, 2016 06:56 IST

पर्यटन क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी आम्ही लडाखमध्ये विविध प्रयत्न केले. हे प्रयत्न कधीच व्यावसायिक दृष्टिकोनातून केले नाही.

कल्याण : पर्यटन क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी आम्ही लडाखमध्ये विविध प्रयत्न केले. हे प्रयत्न कधीच व्यावसायिक दृष्टिकोनातून केले नाही. सामाजिक बांधीलकीतून हे काम हाती घेतले आणि आता त्याचा परिणामही दिसत असल्याचे आत्माराम परब यांनी सांगितले. सुभेदारवाडा कट्ट्यातर्फे ‘देशभक्तीपर पर्यटन’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इतिहास संशोधक सदाशिव टिटविलकर, अतुल गुरू, संस्थेचे दीपक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. परब यांनी लेह-लडाख येथे १०० हून अधिक वेळा सहली आयोजित क रून २५ हजारांपेक्षा अधिक पर्यटकांना सहल घडवून आणली आहे. व्यवसाय करणे, हे उद्दिष्ट असते तर नोकरी कधीच सोडली नसती. वेगळं काहीतरी करायचं एवढंच मनात होते. त्यातूनच, हिवाळ्यातील हे पर्यटन आम्ही विकसित केले. त्यामुळे लडाख येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. सर्वांनी एकदा तरी लडाखला भेट द्यावी, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली. परब पुढे म्हणाले, मला फिरण्याची खूप आवड होती. उन्ह्याळ्याच्या सुटीत मामाच्या गावी जात असे. त्यातूनच निसर्गात भटकण्याची आवड निर्माण झाली. नोकरी करीत असताना ट्रेकिंगला जात असे. यातूनच या पर्यटन व्यवसायात आलो. त्यातून आवड जोपासता आली. कोणत्याही परिस्थितीत स्वत:चे नुकसान झाले तरी टूर रद्द करायची नाही, हे तत्त्व ठरवले होते. लडाखला जात असताना येथील आर्मीशी संबंध आला. त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. सैनिकांकडून आम्हाला वाचण्यासाठी काहीतरी आणून द्या, अशी मागणी होऊ लागली तेव्हा रक्षाबंधनाला पुस्तके भेट म्हणून दिली. प्रथम मराठी पुस्तके दिल्याने अमराठी सैनिकांना ती वाचण्यास त्रासदायक ठरली. म्हणून मग त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक आणि भाषिक पुस्तके उपलब्ध करून दिली. पुढील काळात सैनिकांसाठी नाटकांचे प्रयोग ठेवले जाणार आहेत. आपण जे काम करू, त्यातून समाजहित जोपासले पाहिजे. पर्यटनातून ‘भारत जोडो’ साध्य करण्यास मदत होते. (प्रतिनिधी)