शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

‘मतदारयादी ‘आधार’ला जोडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:04 IST

मुरबाड मतदारसंघातील मुरबाड, कल्याण ग्रामीण आणि बदलापूर शहर या तिन्ही ठिकाणी जे मतदार आहेत त्यातील अनेक मतदारांची नावे ही दोन ते चार वेळा आली आहेत.

बदलापूर : मुरबाड मतदारसंघातील मुरबाड, कल्याण ग्रामीण आणि बदलापूर शहर या तिन्ही ठिकाणी जे मतदार आहेत त्यातील अनेक मतदारांची नावे ही दोन ते चार वेळा आली आहेत. दुबार मतदार आणि काही बोगस मतदारांचा आकडा पाहिल्यास सरासरी २५ हजाराहून अधिक आहे. या मतदारांना मतदारयादीतून वगळण्याची प्रक्रीया लांबणीवर पडत आहे. त्यामुळे आता मतदारयादी ही आधार कार्डसोबत जोडण्याची मागणी नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांनी केलीआहे.मुरबाड मतदारसंघातील मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोप दामले यांनी केला आहे. मतदारसंघातील एका व्यक्तीचे नाव शोधल्यावर त्या व्यक्तीचे त्याच मतदारसंघात इतरत्रही नाव सापडत आहेत. काही नावे असे आहेत की त्यांची याच मतदारसंघात तीन ते चार ठिकाणी नावे आहेत.बाहेरील मतदारांचीही नावे मुरबाड मतदारसंघात टाकण्यात आली आहेत. हे बोगस मतदार आणि दुबार नावे असलेल्या मतदारांना वगळण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. मतदारयादीतील घोळ हा वाढत असून या मतदारयादीतील घोळ कमी करण्यासाठी मतदारयादी थेट आधारकार्डाशी जोडण्याची मागणी दामले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाचे काम सुरू असले तरी मतदारांना आधार सोबतत जोडणे सक्तीचे करण्याची गरज आहे. यामुळे बोगस मतदान होणार नाही असे ते म्हणाले. मतदारयादीमध्ये फोटो बंधनकारक केल्यावर ९० टक्के फोटोचे काम झालेले आहे.