शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
5
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
6
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
7
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
8
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
9
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
10
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
11
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
12
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
13
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
14
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
15
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
16
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
17
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
18
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
19
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
20
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले

अदानी समूहाला एनआरसी कंपनीच्या जागेचा संपूर्ण ताबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST

कल्याण : आंबिवलीनजीक असलेल्या एनआरसी कंपनीची ४४० एकर जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. या जागेवर लॉजिस्टिक पार्क उभारला ...

कल्याण : आंबिवलीनजीक असलेल्या एनआरसी कंपनीची ४४० एकर जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. या जागेवर लॉजिस्टिक पार्क उभारला जाणार असून, त्यासाठी जमीन अधिग्रहित केली जात आहे. मात्र, अदानी समूहाला कंपनीच्या जागेचा संपूर्ण ताबा अद्याप मिळालेला नाही. कंपनीची जागा अधिग्रहित करण्यासाठी अदानी समूहाने आतापर्यंत २०० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती अदानी समूहाच्या सूत्रांनी सोमवारी दिली.

एनआरसी कंपनी सुरू होती, तेव्हा कामगारांना राहण्यासाठी क्वार्टर्स दिले होते. हे क्वार्टर्स अद्याप कामगारांच्या ताब्यात आहेत. अदानी समूहाने जमिनीची कायदेशीर खरेदी केली आहे. एनसीएलटी (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) च्या आदेशानुसार कामगारांना ६८ कोटी देण्याची तयारी दर्शविली होती. त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याची तयारी अदानी समूहाने दाखविली होती. मात्र, ही मागणी कामगारांना मान्य नाही. एनआरसी कंपनीच्या ४५ कामगारांनी औद्योगिक न्यायालयाकडे दाद मागितली होती. क्वार्टर्सचा ताबा कामगारांना देण्यात यावा. मे २०२१ मध्ये न्यायालयाने अंतरिम आदेश देत क्वार्टर्सचा ताबा कामगारांकडेच ठेवण्यास परवानगी दिली होती. हा आदेश चुकीचा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर न्यायालयाने १७ ऑगस्ट २०२१ रोजी दिलेल्या आदेशानुसार क्वार्टर्सचा ताबा कामगारांकडे ठेवण्यास दिलेली परवानगी रद्दबातल ठरविली. हा खटला त्यांच्या अखत्यारित येत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. हा खटला आयबीसीच्या २०१६ नुसारच्या कायद्यांतर्गत येतो. त्यामुळे अदानी समूहाने क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या कामगारांना घरे खाली करण्याच्या नोटिसा देणे हे बेकायदेशीर ठरत नसल्याचे स्पष्ट होत आहे. न्यायालयाने कामगार वास्तव्याची परवानगी देण्याचा निर्णय रद्दबातल ठरविला नसून खटलाच फेटाळून लावल्याची माहिती अदानी समूहाच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, एनसीएलटी दिल्ली येथे कामगार अपिलात गेले आहेत. त्यांचे अपील न्यायप्रविष्ट आहे. औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयामुळे एनसीएलटीकडे पुढील सुनावणीदरम्यान काय निर्णय घेतला जाऊ शकतो याकडे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर एनआरसी कंपनीच्या आवारातील क्वार्टर्स धोकादायक झाले आहेत. ते तोडण्यासाठी नोटिसा बजावल्या असून, ही घरे तोडण्यास कामगारांचा विरोध आहे. या धोकादायक इमारतीत वास्तव्य करणाऱ्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो, असे एनआरसी कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

--------------------------