शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
2
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
3
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
6
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
7
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
8
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
9
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
10
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
11
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
12
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
13
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
14
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
15
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
16
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
17
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
18
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
19
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
20
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
Daily Top 2Weekly Top 5

अदानी समूहाला एनआरसी कंपनीच्या जागेचा संपूर्ण ताबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST

कल्याण : आंबिवलीनजीक असलेल्या एनआरसी कंपनीची ४४० एकर जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. या जागेवर लॉजिस्टिक पार्क उभारला ...

कल्याण : आंबिवलीनजीक असलेल्या एनआरसी कंपनीची ४४० एकर जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. या जागेवर लॉजिस्टिक पार्क उभारला जाणार असून, त्यासाठी जमीन अधिग्रहित केली जात आहे. मात्र, अदानी समूहाला कंपनीच्या जागेचा संपूर्ण ताबा अद्याप मिळालेला नाही. कंपनीची जागा अधिग्रहित करण्यासाठी अदानी समूहाने आतापर्यंत २०० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती अदानी समूहाच्या सूत्रांनी सोमवारी दिली.

एनआरसी कंपनी सुरू होती, तेव्हा कामगारांना राहण्यासाठी क्वार्टर्स दिले होते. हे क्वार्टर्स अद्याप कामगारांच्या ताब्यात आहेत. अदानी समूहाने जमिनीची कायदेशीर खरेदी केली आहे. एनसीएलटी (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) च्या आदेशानुसार कामगारांना ६८ कोटी देण्याची तयारी दर्शविली होती. त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याची तयारी अदानी समूहाने दाखविली होती. मात्र, ही मागणी कामगारांना मान्य नाही. एनआरसी कंपनीच्या ४५ कामगारांनी औद्योगिक न्यायालयाकडे दाद मागितली होती. क्वार्टर्सचा ताबा कामगारांना देण्यात यावा. मे २०२१ मध्ये न्यायालयाने अंतरिम आदेश देत क्वार्टर्सचा ताबा कामगारांकडेच ठेवण्यास परवानगी दिली होती. हा आदेश चुकीचा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर न्यायालयाने १७ ऑगस्ट २०२१ रोजी दिलेल्या आदेशानुसार क्वार्टर्सचा ताबा कामगारांकडे ठेवण्यास दिलेली परवानगी रद्दबातल ठरविली. हा खटला त्यांच्या अखत्यारित येत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. हा खटला आयबीसीच्या २०१६ नुसारच्या कायद्यांतर्गत येतो. त्यामुळे अदानी समूहाने क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या कामगारांना घरे खाली करण्याच्या नोटिसा देणे हे बेकायदेशीर ठरत नसल्याचे स्पष्ट होत आहे. न्यायालयाने कामगार वास्तव्याची परवानगी देण्याचा निर्णय रद्दबातल ठरविला नसून खटलाच फेटाळून लावल्याची माहिती अदानी समूहाच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, एनसीएलटी दिल्ली येथे कामगार अपिलात गेले आहेत. त्यांचे अपील न्यायप्रविष्ट आहे. औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयामुळे एनसीएलटीकडे पुढील सुनावणीदरम्यान काय निर्णय घेतला जाऊ शकतो याकडे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर एनआरसी कंपनीच्या आवारातील क्वार्टर्स धोकादायक झाले आहेत. ते तोडण्यासाठी नोटिसा बजावल्या असून, ही घरे तोडण्यास कामगारांचा विरोध आहे. या धोकादायक इमारतीत वास्तव्य करणाऱ्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो, असे एनआरसी कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

--------------------------