शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

बालनाट्य शिबिरात नुसता अभिनय महत्त्वाचा नाही तर उच्चारशास्त्र महत्त्वाचे : अशोक बागवे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 16:53 IST

विजू माने, निरंजन कुलकर्णी, अभिजित चव्हाण यांना गंधार युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

ठळक मुद्देबालनाट्य शिबिरात नुसता अभिनय महत्त्वाचा नाही तर उच्चारशास्त्र महत्त्वाचे : अशोक बागवे विजू माने, निरंजन कुलकर्णी, अभिजित चव्हाण यांना गंधार युवा पुरस्कारचकवा आणि आरपार या एकांकिकेचे सादरीकरण

ठाणे : बालनाट्य शिबिरात नुसता अभिनय महत्त्वाचा नाही तर उच्चारशास्त्र महत्त्वाचे आहे. गडकरी रंगायतनमध्ये आम्ही तालमीचे स्वातंत्र्य अनुभवले आहे, कोठेही तालमी करीत असय. हे स्वातंत्र्य नव्या पिढीने घ्यावे अशा भावना ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या. 

    गंधार कला संस्थाच्यावतीने  गडकरी रंगायतन येथे आयोजित गंधार युवा महोत्सवात दिगदर्शक विजू माने, निरंजन कुलकर्णी, अभिजित चव्हाण यांना गंधार युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी चकवा आणि आरपार या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी आ. संजय केळकर, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, प्रा. डॉ. विजय जोशी, प्रा. प्रदीप ढवळ, जयंत पवार, राजू आठवले, प्रकाश निमकर, राजेश उके, महेश सुभेदार, प्रशांत डिंगणकर, प्रा. मंदार टिल्लू, प्रा. संतोष गावडे, बाळकृष्ण ओडेकर, वैभव पटवर्धन व इतर उपस्थित होते. या सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा. प्रदीप ढवळ यांनी केले. त्यांनी प्रा. मंदार टिल्लू आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. डिजिटल युगात नाट्य, कला टिकवण्याचे काम कठीण आहे पण आजच्या पिढीवर हे संस्कार करण्याचे काम गंधार करीत आहे. गंधार कलावंत शोधण्याचे, कलावंत जपण्याचे काम करीत आहे. त्यांनतर लघुपट, बालनाट्यमध्ये काम केलेल्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. चकवा आणि आरपार या एकांकिकेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या आशुतोष बाविस्कर यांचाही गौरव करण्यात आला. सत्काराला  विजू माने, निरंजन कुलकर्णी, अभिजित चव्हाण यांनी उत्तर दिले. जयंत पवार आपल्या मनोगतात म्हणाले की, नाटकासाठी प्रामाणिक काम करणारी एकमेव संस्था म्हणजे गंधार. नाट्यक्षेत्राशी जोडतो तेव्हा आपोआप व्यक्तिमत्त्व विकास होतो त्यासाठी कोणत्याही व्यक्तिमत्त्व विकास शिबिराची गरज नाही. विजय जोशी म्हणाले, कोणतेही पारितोषिक हा मैलाचा दगड असतो तो बाजूला सारून पुढे जा असा सल्ला उपस्थित कलाकारांना दिला. अशोक बागवे म्हणाले, आ. संजय केळकर म्हणाले, ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे, अनेक कलाकार या शहरात आहे, बाहेरचे कलाकार देखील आता ठाण्यात येत आहेत. सांस्कृतिक वैभव गंधारच्या चळवळीतून वाढत जाणार आहे. पुरस्कार वितरणाच्या आधी चकवा आणि शेवटी आरपार ही एकांकिका सादर झाली. कार्यक्रमाचे निवेदन आकाश राऊत यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक