शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बालनाट्य शिबिरात नुसता अभिनय महत्त्वाचा नाही तर उच्चारशास्त्र महत्त्वाचे : अशोक बागवे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 16:53 IST

विजू माने, निरंजन कुलकर्णी, अभिजित चव्हाण यांना गंधार युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

ठळक मुद्देबालनाट्य शिबिरात नुसता अभिनय महत्त्वाचा नाही तर उच्चारशास्त्र महत्त्वाचे : अशोक बागवे विजू माने, निरंजन कुलकर्णी, अभिजित चव्हाण यांना गंधार युवा पुरस्कारचकवा आणि आरपार या एकांकिकेचे सादरीकरण

ठाणे : बालनाट्य शिबिरात नुसता अभिनय महत्त्वाचा नाही तर उच्चारशास्त्र महत्त्वाचे आहे. गडकरी रंगायतनमध्ये आम्ही तालमीचे स्वातंत्र्य अनुभवले आहे, कोठेही तालमी करीत असय. हे स्वातंत्र्य नव्या पिढीने घ्यावे अशा भावना ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या. 

    गंधार कला संस्थाच्यावतीने  गडकरी रंगायतन येथे आयोजित गंधार युवा महोत्सवात दिगदर्शक विजू माने, निरंजन कुलकर्णी, अभिजित चव्हाण यांना गंधार युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी चकवा आणि आरपार या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी आ. संजय केळकर, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, प्रा. डॉ. विजय जोशी, प्रा. प्रदीप ढवळ, जयंत पवार, राजू आठवले, प्रकाश निमकर, राजेश उके, महेश सुभेदार, प्रशांत डिंगणकर, प्रा. मंदार टिल्लू, प्रा. संतोष गावडे, बाळकृष्ण ओडेकर, वैभव पटवर्धन व इतर उपस्थित होते. या सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा. प्रदीप ढवळ यांनी केले. त्यांनी प्रा. मंदार टिल्लू आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. डिजिटल युगात नाट्य, कला टिकवण्याचे काम कठीण आहे पण आजच्या पिढीवर हे संस्कार करण्याचे काम गंधार करीत आहे. गंधार कलावंत शोधण्याचे, कलावंत जपण्याचे काम करीत आहे. त्यांनतर लघुपट, बालनाट्यमध्ये काम केलेल्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. चकवा आणि आरपार या एकांकिकेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या आशुतोष बाविस्कर यांचाही गौरव करण्यात आला. सत्काराला  विजू माने, निरंजन कुलकर्णी, अभिजित चव्हाण यांनी उत्तर दिले. जयंत पवार आपल्या मनोगतात म्हणाले की, नाटकासाठी प्रामाणिक काम करणारी एकमेव संस्था म्हणजे गंधार. नाट्यक्षेत्राशी जोडतो तेव्हा आपोआप व्यक्तिमत्त्व विकास होतो त्यासाठी कोणत्याही व्यक्तिमत्त्व विकास शिबिराची गरज नाही. विजय जोशी म्हणाले, कोणतेही पारितोषिक हा मैलाचा दगड असतो तो बाजूला सारून पुढे जा असा सल्ला उपस्थित कलाकारांना दिला. अशोक बागवे म्हणाले, आ. संजय केळकर म्हणाले, ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे, अनेक कलाकार या शहरात आहे, बाहेरचे कलाकार देखील आता ठाण्यात येत आहेत. सांस्कृतिक वैभव गंधारच्या चळवळीतून वाढत जाणार आहे. पुरस्कार वितरणाच्या आधी चकवा आणि शेवटी आरपार ही एकांकिका सादर झाली. कार्यक्रमाचे निवेदन आकाश राऊत यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक