शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नियम डावलणाऱ्या मंडळांवर आजपासून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 02:41 IST

गणेशोत्सवासाठी केडीएमसीने गुरुवारपर्यंत १९२ सार्वजनिक मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे.

कल्याण : गणेशोत्सवासाठी केडीएमसीने गुरुवारपर्यंत १९२ सार्वजनिक मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. तर, अन्य २४ मंडळांच्या परवानगीबाबत कार्यवाही सुरू आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाºया मंडळांवर कारवाई करण्यासाठी स्थापन केलेली प्रभागनिहाय विशेष पथके शनिवारपासून सर्वेक्षण करणार आहेत. त्यामुळे नियमबाह्य आणि बेकायदा मंडप उभारणाºयांचे धाबे दणाणले आहेत.केडीएमसी हद्दीत साधारण ९०० च्या आसपास मंडळे आहेत. सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज आणि कमानी उभारण्यासाठी मंडळांनी केडीएमसीकडे अर्ज केले आहेत. महापालिकेने २५ आॅगस्टपासून त्यांना परवानगी देण्यास सुरुवात केली. परवानगीसाठी महापालिकेसह वाहतूक शाखा, पोलीस आणि अग्निशमन दलाचा नाहरकत दाखला आवश्यक होता. मात्र, परवानग्या मिळण्यासाठी लागणारा विलंब पाहता गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही केडीएमसीने एक खिडकी योजना राबवली. महापालिका क्षेत्रातील आठ पोलीस ठाण्यांमध्ये ही खिडकी उघडण्यात आली.परवानगीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ सप्टेंबर होती. परंतु, गोपाळकाल्यानंतर खºया अर्थाने गणेशोत्सवाच्या तयारीला वेग येत असल्याने कालावधी अत्यल्प असल्याकडे गणेश मंडळांनी लक्ष वेधले होते. त्यामुळे गोपाळकाला उत्सवानंतर आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी अधिक मिळावा, अशी मागणी मंडळांनी केली होती. त्यामुळे ही मुदत तीन दिवसांनी म्हणजेच ६ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. अखेर, मुदतीअंती २१६ मंडळांनी मंडपासाठी अर्ज केले. त्यातील १९२ मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली. उर्वरित २४ मंडळांनी परवानगीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी सुरू असल्याची माहिती बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागाने दिली. यंदाच्या वर्षी मंडपाबरोबर कमानीसाठीही परवानगी घेणे बंधनकारक आहे.>खोदकाम जोमातमंडपासाठी रस्ता खोदल्यास १० हजारांचा दंड वसूल करण्याचा निर्णय केडीएमसीने घेतला आहे. परंतु, डोंबिवली पश्चिमेत काही ठिकाणी या नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्याचबरोबर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, असेही मंडप थाटले आहेत. त्यावर विशेष पथके काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.>आगमन खड्ड्यांतूनचगणेशोत्सवाच्या धर्तीवर शहरात रस्त्यांची डागडुजी सुरू आहे. डांबरीकरणाचीही कामे सुरू आहेत. परंतु, काही मंडपांच्या समोरच खड्डे आहेत. त्यामुळे बाप्पांचे आगमन खड्ड्यांतूनच होण्याची दाट शक्यता आहे. रविवारपासूनच सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे आगमन होणार आहे. त्यामुळे तातडीने खड्डे भरावेत, अशी मागणी होत आहे.>मंडळांची संख्या रोडावलीकल्याण-डोंबिवली शहरात गेल्या वर्षी ३६९ मंडळांनी परवानग्या घेतल्या होत्या. परंतु, यंदा सार्वजनिक मंडळांची संख्या रोडावली आहे.खाजगी जागेत, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मंडप अथवा कमानी उभारण्यासाठी यंदा परवानगीची आवश्यकता नसल्याने मंडपांची संख्या घटल्याचे बोलले जात आहे.