शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

चिखलोलीतून पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: March 19, 2016 00:44 IST

चिखलोली धरणातून दररोज १०० पेक्षा अधिक टँकर पाणी चोरले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार

अंबरनाथ : चिखलोली धरणातून दररोज १०० पेक्षा अधिक टँकर पाणी चोरले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. ते मिळताच या टँकरवर, पाणीचोरांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.चिखलोली धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जातो. या धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित असतानाही धरणाच्या मागील परिसरातून काही टँकरमाफिया कोणतीही परवानगी न घेता पाणी चोरत होते. एवढेच नव्हे, तर टँकर भरण्यासाठी धरणाच्या पात्रात पंपही बसवण्यात आले होते. दररोज १०० पेक्षा अधिक टँकर भरून बाहेर पाण्याची विक्री-काळाबाजार सुरू होता. कोणीच कारवाई करीत नसल्याने बदलापूर आणि उल्हासनगरहूनही अनेक टँकर येथे पाणी भरण्यासाठी येत होते. यासंदर्भात गुरुवारी ‘लोकमत’मध्ये छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध होताच जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी तत्काळ मुख्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. मुख्याधिकारी गणेश देशमुख आणि तहसीलदार प्रशांत जोशी हे धरणाच्या ठिकाणी कारवाईसाठी गेले.मात्र, ‘लोकमत’मधील बातमीनंतर घाबरगुंडी उडालेल्या टँकरमाफियांनी येथे टँकर भरण्याचे काम थांबवल्याचे दिसून आले. कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना तेथे एकही टँकर सापडला नाही. अखेर धरणात बसवलेले पंप जप्त करण्यात आले. तसेच धरणात कोणताही टँकर जाऊ नये, यासाठी रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला. कारवाईदरम्यान एकही टँकर सापडला नसला तरी बातमीमुळे टँकरमाफियांमध्ये घबराट उडाली. (प्रतिनिधी)