शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

टीडीसीवर कारवाई - मुख्यमंत्री,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:00 IST

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या पदोन्नती, घोटाळ्याची व भ्रष्टाचाराच्या आरोपांची सहकारमंत्र्यानी चौकशी करून उचित कारवाई करावी असे निर्देश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी दिले आहेत.

हितेन नाईक ।पालघर : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या पदोन्नती, घोटाळ्याची व भ्रष्टाचाराच्या आरोपांची सहकारमंत्र्यानी चौकशी करून उचित कारवाई करावी असे निर्देश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी दिले आहेत. तर याच भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी विकासमंचाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापकांनी कर्मचारी पदोन्नती मध्ये मोठा भ्रष्टाचार केला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार डहाणूचे आमदार पास्कल धनारे ह्यांच्यासह खासदार चिंतामण वनगा, यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, उपनिबंधक, ठाणे ह्यांच्या कडे केली आहे. ह्या संदर्भात जिल्हा उपनिबंधक ठाणे ह्यानी उचित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथम सहकारमंत्री सुभाष देशमुख ह्यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. मात्र या टीडीसी बँकेत मोठा गैरव्यवहार होत असून अनियमितताही दिसून येत असल्याने त्याचा मोठा फटका स्थानिक सुशिक्षित तरुण, मच्छिमार, शेतकरी व बँकेचे पात्र कर्मचारी यांना बसणार असल्याने खुद्द मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आमदार धनारे यांच्या तक्रारीबाबत सहकार मंत्र्यांनाच उचित कार्यवाही करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.जून मध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा गैरव्यवहार झाला असून संचालक मंडळ व व्यवस्थापकांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून स्वत:च्या नातेवाईक कर्मचाºयांना पदोन्नती दिल्याची अनेक प्रकरणे नावांसाहित जिजाऊ शैक्षणकि संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी जाहीर केली आहेत.कोणतीही सेवा ज्येष्ठता व शैक्षणिक पात्रता नसतांना व संपूर्ण बँक हि संगणक प्रणालीनुसार सुरु असतांना पदोन्नतीसाठी मात्र कुठल्याही संगणक प्रणालीचा वापर करण्यात आला नसल्याची बाब तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.संचालकांचे नातेवाईक हे १२ वी पर्यंत शिक्षित असतांनाही त्यांच्यावर बँकेने पदोन्नत्यांचा सातत्याने वर्षाव केला आहे. तसेच व्यवस्थापक व संचालक मंडळाच्या व काही लोकप्रतिनिधींच्या अशा सुमारे ३४ नातेवाईक कर्मचाºयांनाच गेल्या १५ वर्षात सातत्याने पदोन्नती मिळाल्याची गंभीर तक्र ार आहे. त्यामुळे गरीब व प्रामाणिक काम करणाºया कर्मचाºयांना पदोन्नती पासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या बेकायदेशीर पदोन्नत्या तात्काळ रद्द कराव्यात तसेच निकष डावलून देण्यात आलेल्या ११७ कर्मचाºयांच्या पदोन्नत्या रद्द करण्याचे आदेश संबंधितांना द्यावे अशी मागणी आ.धनारे, खासदार वनगा यांनी केली होती.